शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

सेवाशुल्क कायदेशीर, ते आम्ही आकारणारच

By admin | Updated: January 4, 2017 05:55 IST

रेस्टॉरंटस आणि हॉटेलमध्ये खाद्यपदार्थांच्या बिलावरील सेवाशुल्क कायदेशीर आधारेच वसूल केले जाते. ग्राहक संरक्षण कायद्यातही तसा स्पष्ट उल्लेख आहे, असा दावा नॅशनल रेस्टॉरंट

- सुरेश भटेवरा,  नवी दिल्लीरेस्टॉरंटस आणि हॉटेलमध्ये खाद्यपदार्थांच्या बिलावरील सेवाशुल्क कायदेशीर आधारेच वसूल केले जाते. ग्राहक संरक्षण कायद्यातही तसा स्पष्ट उल्लेख आहे, असा दावा नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन आॅफ इंडियाने केला आहे. ग्राहक मंत्रालयाच्या सोमवारच्या परिपत्रकाला स्पष्ट विरोध नोंदवत, असोसिएशनचे अध्यक्ष रियाज अमलानी यांनी थेट ग्राहकांनाच आवाहन केले की, हे शुल्क भरण्याची इच्छा नसलेल्या ग्राहकांनी जिथे ते आकारत नाहीत, अशा रेस्टॉरंटस्चा पर्याय निवडावा. तक्रारींच्या आधारे ग्राहक मंत्रालयाने राज्यांना सोमवारी पाठवलेले परिपत्रकच संभ्रमात टाकणारे आहे. रेस्टॉरंटमध्ये बिल हाती पडताच, ग्राहकाची नजर जाते ती लावलेल्या करांच्या व सेवाशुल्काच्या रकमेवर. त्यात राज्य सरकारांचा व्हॅटही असतो. देशभर केंद्र सरकारचा सर्व्हिस टॅक्स सध्या १४ + १ टक्का सेस = १५ टक्के आहे. विविध राज्यांत व्हॅट ५ ते २0 टक्क्यांपर्यंत आहे. हे दोन प्रकारचे कर रेस्टारंटचे मालक ग्राहकांकडून वसूल करून, केंद्र व राज्याला देतात. तिसरी रक्कम सेवाशुल्काच्या नावाने वसूल केली जाते. त्याचा आशय टिप असा आहे. गोळा झालेले हे शुल्क हॉटेलचे वेटर्स, मॅनेजर्स व सफाई कर्मचाऱ्यांना अतिरिक्त बोनस म्हणून वाटली जाते. कायद्याची स्पष्ट तरतूद असायला हवीआपल्या गुणवत्तेनुसार रेस्टॉरंटस् ५ ते २0 टक्क्यांपर्यंत सेवाशुल्क आकारतात, ही जगभरची पद्धत आहे. त्यामुळे मेन्यू कार्डवरच त्याचा स्पष्ट उल्लेख असतो, म्हणूनच तो अनुचित व्यवहार ठरत नाही.केंद्राने परिपत्रकात काढलेला निष्कर्ष चुकीचा आहे, असे नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशनचे म्हणणे आहे. फेडरेशन आॅफ हॉटेल अँड रेस्टॉरंटस् असोसिएशनने मात्र, भ्रम दूर करून वाद टाळण्यासाठी व हक्कांसाठी दाद मागण्याकरिता ग्राहक मंत्रालयाचे दार ठोठावण्याचे ठरवले आहे.करतज्ज्ञांच्या मते रेस्टॉरंटने सेवाशुल्क आकारावे की नाही, याची कायदेशीर तरतूद हवी. ग्राहक संरक्षण नियम स्पष्ट असतील, तरच ग्राहकाला सेवाशुल्काच्या नावाखाली वसूल करण्यात येणाऱ्या रकमेची तक्रार करता येणे शक्य होईल.