शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
3
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
4
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
5
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
6
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
7
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
8
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
9
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
10
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
11
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
12
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
13
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
14
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
15
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
16
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
17
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
18
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
19
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश

CoronaVirus: “सरकार इतकं निर्दयी कसं असू शकतं?” रवीश कुमारांची PM मोदींवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 11:02 IST

CoronaVirus: रवीश कुमार (Ravish Kumar) यांनीही पंतप्रधान मोदींवर (PM Narendra Modi) टीका केली आहे.

ठळक मुद्देपंतप्रधान मोदींवर टीकास्त्रसरकार इतकं निर्दयी कसं असू शकतंसोशल पोस्ट व्हायरल

नवी दिल्ली: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस नवीन उच्चांक गाठत असून, कोरोनाच्या मृत्यूचे प्रमाणही वाढताना पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.  कोरोनाच्या उद्रेकामुळे ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, कोरोना लस यांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर आता ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार (Ravish Kumar) यांनीही पंतप्रधान मोदींवर (PM Narendra Modi) टीका केली असून, कोणतेही सरकार इतके निर्दयी कसे असू शकते, अशी विचारणा केली आहे. (senior journalist ravish kumar criticises pm modi over corona situation in country) 

रवीश कुमार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये देशातील कोरोनाची बिकट परिस्थिती, वाढती बेरोजगारी यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.  या पोस्टवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. गेल्या सलग दिवसांपासून देशभरातील कोरोनाबाधितांचा आकडा ४ लाखांवर गेल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाचा मृत्यूदरही वाढताना दिसत आहे. देशाला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. तर, दुसऱ्या बाजूला अनेकांच्या नोकऱ्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर रवीश कुमार यांची पोस्ट व्हायरल होत असून, चर्चेचा विषय ठरत आहे. 

“मोदी सरकारने आपले काम योग्य पद्धतीने केले असते, तर ही वेळच आली नसती”

सरकार इतकं निर्दयी कसं असू शकतं?

सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या ताज्या अहवालानुसार, केवळ एप्रिल महिन्यात ३४ लाखांहून अधिक जणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. या ३४ लाख लोकांवर काय वेळ आली असेल, हे आम्हांला माहिती नाही. नोकरी गेलेल्यांच्या घरी आजारी व्यक्ती असेल, तर त्यांच्यावर काय परिणाम झाला असेल, अशातच उपचारांचा खर्च करण्याबाबत त्यांचा आत्मविश्वास ढासळला असेल. कारण अशा परिस्थितीत कोणीही मदत करत नाही आणि बँकेकडूनही सूट मिळत नाही. नागरिकांना आता काहीच नकोय, असे सरकारने मान्य केले आहे का? कोणतेही सरकार इतके निर्दयी कसे असू शकते? हे अतिशय खेदजनक आहे. छोट्या व्यवसायिकांपुढे तर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. एप्रिलमध्ये ७३ लाख नोकऱ्या गेल्या आहेत, असे रवीश कुमार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

लसीकरण धोरणात सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करू नये; केंद्राचे प्रतिज्ञापत्र सादर

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे ३,२९,९४२ नवे रुग्ण आढळून आले असून, ३,८७६ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी ३७,१५,२२१ रुग्णांवर उपचार सुरू असून, गेल्या २४ तासांत ३,५६,०८२ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत १७ कोटी २७ लाख १० हजार ०६६ जणांचे कोरोना लसीकरण करण्यात आले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीjobनोकरीCentral Governmentकेंद्र सरकार