शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: “सरकार इतकं निर्दयी कसं असू शकतं?” रवीश कुमारांची PM मोदींवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 11:02 IST

CoronaVirus: रवीश कुमार (Ravish Kumar) यांनीही पंतप्रधान मोदींवर (PM Narendra Modi) टीका केली आहे.

ठळक मुद्देपंतप्रधान मोदींवर टीकास्त्रसरकार इतकं निर्दयी कसं असू शकतंसोशल पोस्ट व्हायरल

नवी दिल्ली: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस नवीन उच्चांक गाठत असून, कोरोनाच्या मृत्यूचे प्रमाणही वाढताना पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.  कोरोनाच्या उद्रेकामुळे ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, कोरोना लस यांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर आता ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार (Ravish Kumar) यांनीही पंतप्रधान मोदींवर (PM Narendra Modi) टीका केली असून, कोणतेही सरकार इतके निर्दयी कसे असू शकते, अशी विचारणा केली आहे. (senior journalist ravish kumar criticises pm modi over corona situation in country) 

रवीश कुमार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये देशातील कोरोनाची बिकट परिस्थिती, वाढती बेरोजगारी यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.  या पोस्टवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. गेल्या सलग दिवसांपासून देशभरातील कोरोनाबाधितांचा आकडा ४ लाखांवर गेल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाचा मृत्यूदरही वाढताना दिसत आहे. देशाला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. तर, दुसऱ्या बाजूला अनेकांच्या नोकऱ्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर रवीश कुमार यांची पोस्ट व्हायरल होत असून, चर्चेचा विषय ठरत आहे. 

“मोदी सरकारने आपले काम योग्य पद्धतीने केले असते, तर ही वेळच आली नसती”

सरकार इतकं निर्दयी कसं असू शकतं?

सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या ताज्या अहवालानुसार, केवळ एप्रिल महिन्यात ३४ लाखांहून अधिक जणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. या ३४ लाख लोकांवर काय वेळ आली असेल, हे आम्हांला माहिती नाही. नोकरी गेलेल्यांच्या घरी आजारी व्यक्ती असेल, तर त्यांच्यावर काय परिणाम झाला असेल, अशातच उपचारांचा खर्च करण्याबाबत त्यांचा आत्मविश्वास ढासळला असेल. कारण अशा परिस्थितीत कोणीही मदत करत नाही आणि बँकेकडूनही सूट मिळत नाही. नागरिकांना आता काहीच नकोय, असे सरकारने मान्य केले आहे का? कोणतेही सरकार इतके निर्दयी कसे असू शकते? हे अतिशय खेदजनक आहे. छोट्या व्यवसायिकांपुढे तर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. एप्रिलमध्ये ७३ लाख नोकऱ्या गेल्या आहेत, असे रवीश कुमार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

लसीकरण धोरणात सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करू नये; केंद्राचे प्रतिज्ञापत्र सादर

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे ३,२९,९४२ नवे रुग्ण आढळून आले असून, ३,८७६ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी ३७,१५,२२१ रुग्णांवर उपचार सुरू असून, गेल्या २४ तासांत ३,५६,०८२ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत १७ कोटी २७ लाख १० हजार ०६६ जणांचे कोरोना लसीकरण करण्यात आले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीjobनोकरीCentral Governmentकेंद्र सरकार