शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

निदान मायदेशी तरी पाठवा; परदेशी तब्लिगींची सर्वोच्च न्यायालयास विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2020 00:32 IST

केंद्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले, एखाद्या परदेशी व्यक्तीला देशात येण्यासाठी व्हिसा देणे अथवा न देणे हा सरकारच्या अधिकाराचा भाग आहे.

नवी दिल्ली :भारत सरकारने आमचे व्हिसा रद्द केले असले तरी आम्हाला निदान आमच्या देशांत तरी परत पाठवावे, अशी विनंती दिल्लीतील निजामुद्दीन येथे मार्चमध्ये झालेल्या ‘तब्लिगी जमात’साठी आलेल्या परदेशी प्रतिनिधींनी सर्वोच्च न्यायालयास गुरुवारी केली.परदेशातून आलेल्या ३४ तब्लिगींनी व्हिसा रद्द करून त्यांना कायमचे काळ्या यादीत टाकण्याच्या भारत सरकारच्या निर्णयाविरुद्ध याचिका केली आहे.

न्या. अजय खानविलकर यांच्या नेतृत्वाखाली या याचिकेवर सुनावणी झाली तेव्हा या तब्लिगींचे ज्येष्ठ वकील सी. यू. सिंग म्हणाले की, काळ्या यादीत टाकणे याचा अर्थ या परदेशी नागरिकांना भविष्यात भारतात येण्यास कायमचा मज्जाव करणे. हे लोक कोरोनाचे निर्बंध लागू होण्याआधी भारतात आले होते व येथील वास्तव्यात त्यांनी भारताची सुरक्षा धेक्यात येईल, असा कोणताही गुन्हा केलेला नाही. तरीही सरकारला व्हिसा रद्द करायचा असेल तर ठीक आहे; पण व्हिसाच्या अटींचे उल्लंघन करणाऱ्यांना त्यांच्या देशात परत पाठविले जाते. तसे आम्हालाही आमच्या मायदेशी पाठवून द्यावे.केंद्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले, एखाद्या परदेशी व्यक्तीला देशात येण्यासाठी व्हिसा देणे अथवा न देणे हा सरकारच्या अधिकाराचा भाग आहे. कोणीही हक्क म्हणून व्हिसा मागू शकत नाही. तसेच परदेशातील सरकारने काही झाले तरी मला मायदेशी परत जाऊ दिलेच पाहिजे, असा हक्कही कोणी सांगू शकत नाही. परदेशी नागरिकाने व्हिसावर भारतात येऊन काही गुन्हे केले तर त्यास मायदेशी परत जाऊ द्यायचे की नाही, हे ठरविणे सरकारचा विशेषाधिकार आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयcorona virusकोरोना वायरस बातम्या