शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

निदान मायदेशी तरी पाठवा; परदेशी तब्लिगींची सर्वोच्च न्यायालयास विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2020 00:32 IST

केंद्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले, एखाद्या परदेशी व्यक्तीला देशात येण्यासाठी व्हिसा देणे अथवा न देणे हा सरकारच्या अधिकाराचा भाग आहे.

नवी दिल्ली :भारत सरकारने आमचे व्हिसा रद्द केले असले तरी आम्हाला निदान आमच्या देशांत तरी परत पाठवावे, अशी विनंती दिल्लीतील निजामुद्दीन येथे मार्चमध्ये झालेल्या ‘तब्लिगी जमात’साठी आलेल्या परदेशी प्रतिनिधींनी सर्वोच्च न्यायालयास गुरुवारी केली.परदेशातून आलेल्या ३४ तब्लिगींनी व्हिसा रद्द करून त्यांना कायमचे काळ्या यादीत टाकण्याच्या भारत सरकारच्या निर्णयाविरुद्ध याचिका केली आहे.

न्या. अजय खानविलकर यांच्या नेतृत्वाखाली या याचिकेवर सुनावणी झाली तेव्हा या तब्लिगींचे ज्येष्ठ वकील सी. यू. सिंग म्हणाले की, काळ्या यादीत टाकणे याचा अर्थ या परदेशी नागरिकांना भविष्यात भारतात येण्यास कायमचा मज्जाव करणे. हे लोक कोरोनाचे निर्बंध लागू होण्याआधी भारतात आले होते व येथील वास्तव्यात त्यांनी भारताची सुरक्षा धेक्यात येईल, असा कोणताही गुन्हा केलेला नाही. तरीही सरकारला व्हिसा रद्द करायचा असेल तर ठीक आहे; पण व्हिसाच्या अटींचे उल्लंघन करणाऱ्यांना त्यांच्या देशात परत पाठविले जाते. तसे आम्हालाही आमच्या मायदेशी पाठवून द्यावे.केंद्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले, एखाद्या परदेशी व्यक्तीला देशात येण्यासाठी व्हिसा देणे अथवा न देणे हा सरकारच्या अधिकाराचा भाग आहे. कोणीही हक्क म्हणून व्हिसा मागू शकत नाही. तसेच परदेशातील सरकारने काही झाले तरी मला मायदेशी परत जाऊ दिलेच पाहिजे, असा हक्कही कोणी सांगू शकत नाही. परदेशी नागरिकाने व्हिसावर भारतात येऊन काही गुन्हे केले तर त्यास मायदेशी परत जाऊ द्यायचे की नाही, हे ठरविणे सरकारचा विशेषाधिकार आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयcorona virusकोरोना वायरस बातम्या