शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
5
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
6
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
7
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
8
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
9
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
10
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
11
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
12
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
13
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
14
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
15
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
16
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
17
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
18
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
19
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
20
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी

दोन लाख ६५ हजार कोटी रुपयांच्या पॅकेजचा कोणत्या क्षेत्राला काय लाभ मिळणार?; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2020 06:57 IST

या पॅकेजचा अर्थव्यस्थेेतील कोणत्या क्षेत्राला काय लाभ होणार, याचा घेतलेला आढावा...

कोरोनामुळे मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी सरकारतर्फे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून नुकतेच दोन लाख ६५ हजार कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर झाले. या पॅकेजचा अर्थव्यस्थेेतील कोणत्या क्षेत्राला काय लाभ होणार, याचा घेतलेला आढावा...

गृहनिर्माण क्षेत्र- नेमकी योजना काय ?घरखरेदीचा जो करार होईल ती किंमत आणि सर्कल रेट यांच्यातील अंतर १० टक्क्यांवरून २० टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आले आहे.त्यामुळे कोणाचा फायदा होणार?

घर खरेदी करणाऱ्यास आणि बिल्डरला कसा होणार फायदा?

समजा एखाद्या शहरात घराचे बाजारमूल्य १ कोटी रुपये आहे. ते आतापर्यंत बिल्डर कमीतकमी ९० लाखांपर्यंत विकू शकत होता. ९० लाखांहून कमी किमतीला विकले तर बिल्डरला सरकारकडे त्याचे स्पष्टीकरण द्यावे लागत होते. मात्र, आता बिल्डर तीच मालमत्ता ८० लाखांना विकू शकेल. त्यामुळे ग्राहकाला घर स्वस्तात मिळेल तसेच २० लाख रुपयांवरील स्टॅम्प ड्यूटी कमी लागेल. म्हणजे स्टॅम्प ड्यूटी ६ टक्के असेल तर ग्राहकाचे सव्वा लाख रुपये वाचतील. प्राप्तिकरही वाचेल.

बिल्डरला काय फायदा होईल?

घरांची विक्री जोर धरेल. त्याला प्राप्तिकरही कमी भरावा लागेल. गृहकर्जाची मागणी वाढून अर्थव्यवस्था वेग पकडेल.

बांधकाम आणि पायाभूत सुविधा कोणाचा फायदा होणार?  बांधकाम कंपन्यांचा

काय फायदा होणार? बांधकाम आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपन्यांना भांडवल आणि बँक हमी यांत अडचणी येत होत्या. बँक हमीसाठी त्यांना १० टक्के परफॉर्मन्स सिक्युरिटी (कामगिरी अनामत) भरावी लागत होती. मात्र आता फक्त ३ टक्के एवढीच द्यावी लागेल. जेणेकरून कंपन्यांकडे काम करण्यासाठी पैसा शिल्लक राहील. ज्या कंपन्यांची न्यायप्रविष्ट प्रकरणे नसतील त्यांनाच हा नियम लागू होईल. ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत ही योजना लागू राहील.

भविष्य निर्वाह निधीत (पीएफ) सबसिडी

कोणाचा फायदा होणार?ज्या कर्मचाऱ्यांचा मासिक पगार १५ हजार रुपये किंवा त्याहून कमी आहे. त्यांच्या पीएफ खात्यात सरकार त्यांच्या मूळ वेतनाच्या १२ टक्के योगदान देईल. कोरोनाकाळात रोजगार गमावलेल्यांना परंतु ज्यांना १ ऑक्टोबरपासून पुन्हा नव्याने नोकरी मिळाली आहे त्यांच्यासाठी ही योजना असेल. सरकार दोन वर्षांपर्यंत १२ टक्के योगदान भरत राहील.

कंपन्यांचा काय फायदा?

ज्या कंपन्यांमध्ये १ हजार कर्मचारी आहेत त्या कंपन्या आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पीएफमध्ये सरकार १२ टक्के योगदान देईल. १ हजारांहून अधिक कर्मचारी असलेल्या कंपन्यांच्या केवळ कर्मचाऱ्यांच्या १२ टक्के पीएफचे योगदान सरकार देईल. ही सबसिडी आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या पीएफ खात्यांत जमा होईल.

कृषी-खते - खतांवरील सबसिडीसाठी ६५ हजार कोटी रुपये

कोणाचा फायदा होणार?शेतकऱ्यांना खते स्वस्तात प्राप्त होतील. त्यामुळे खतांवरील गुंतवणूक कमी होऊन पीक उत्पादन स्वस्त होईल. खतांचा अधिक वापर केल्यास पीकसमृद्धी येईल.

सरकारला काय फायदा होईल?खतांवरील सबसिडीने पिकांचे उत्पादन वाढून ग्रामीण अर्थव्यवस्था तेजीत येईल.

टॅग्स :IndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकार