शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाख ६५ हजार कोटी रुपयांच्या पॅकेजचा कोणत्या क्षेत्राला काय लाभ मिळणार?; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2020 06:57 IST

या पॅकेजचा अर्थव्यस्थेेतील कोणत्या क्षेत्राला काय लाभ होणार, याचा घेतलेला आढावा...

कोरोनामुळे मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी सरकारतर्फे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून नुकतेच दोन लाख ६५ हजार कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर झाले. या पॅकेजचा अर्थव्यस्थेेतील कोणत्या क्षेत्राला काय लाभ होणार, याचा घेतलेला आढावा...

गृहनिर्माण क्षेत्र- नेमकी योजना काय ?घरखरेदीचा जो करार होईल ती किंमत आणि सर्कल रेट यांच्यातील अंतर १० टक्क्यांवरून २० टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आले आहे.त्यामुळे कोणाचा फायदा होणार?

घर खरेदी करणाऱ्यास आणि बिल्डरला कसा होणार फायदा?

समजा एखाद्या शहरात घराचे बाजारमूल्य १ कोटी रुपये आहे. ते आतापर्यंत बिल्डर कमीतकमी ९० लाखांपर्यंत विकू शकत होता. ९० लाखांहून कमी किमतीला विकले तर बिल्डरला सरकारकडे त्याचे स्पष्टीकरण द्यावे लागत होते. मात्र, आता बिल्डर तीच मालमत्ता ८० लाखांना विकू शकेल. त्यामुळे ग्राहकाला घर स्वस्तात मिळेल तसेच २० लाख रुपयांवरील स्टॅम्प ड्यूटी कमी लागेल. म्हणजे स्टॅम्प ड्यूटी ६ टक्के असेल तर ग्राहकाचे सव्वा लाख रुपये वाचतील. प्राप्तिकरही वाचेल.

बिल्डरला काय फायदा होईल?

घरांची विक्री जोर धरेल. त्याला प्राप्तिकरही कमी भरावा लागेल. गृहकर्जाची मागणी वाढून अर्थव्यवस्था वेग पकडेल.

बांधकाम आणि पायाभूत सुविधा कोणाचा फायदा होणार?  बांधकाम कंपन्यांचा

काय फायदा होणार? बांधकाम आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपन्यांना भांडवल आणि बँक हमी यांत अडचणी येत होत्या. बँक हमीसाठी त्यांना १० टक्के परफॉर्मन्स सिक्युरिटी (कामगिरी अनामत) भरावी लागत होती. मात्र आता फक्त ३ टक्के एवढीच द्यावी लागेल. जेणेकरून कंपन्यांकडे काम करण्यासाठी पैसा शिल्लक राहील. ज्या कंपन्यांची न्यायप्रविष्ट प्रकरणे नसतील त्यांनाच हा नियम लागू होईल. ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत ही योजना लागू राहील.

भविष्य निर्वाह निधीत (पीएफ) सबसिडी

कोणाचा फायदा होणार?ज्या कर्मचाऱ्यांचा मासिक पगार १५ हजार रुपये किंवा त्याहून कमी आहे. त्यांच्या पीएफ खात्यात सरकार त्यांच्या मूळ वेतनाच्या १२ टक्के योगदान देईल. कोरोनाकाळात रोजगार गमावलेल्यांना परंतु ज्यांना १ ऑक्टोबरपासून पुन्हा नव्याने नोकरी मिळाली आहे त्यांच्यासाठी ही योजना असेल. सरकार दोन वर्षांपर्यंत १२ टक्के योगदान भरत राहील.

कंपन्यांचा काय फायदा?

ज्या कंपन्यांमध्ये १ हजार कर्मचारी आहेत त्या कंपन्या आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पीएफमध्ये सरकार १२ टक्के योगदान देईल. १ हजारांहून अधिक कर्मचारी असलेल्या कंपन्यांच्या केवळ कर्मचाऱ्यांच्या १२ टक्के पीएफचे योगदान सरकार देईल. ही सबसिडी आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या पीएफ खात्यांत जमा होईल.

कृषी-खते - खतांवरील सबसिडीसाठी ६५ हजार कोटी रुपये

कोणाचा फायदा होणार?शेतकऱ्यांना खते स्वस्तात प्राप्त होतील. त्यामुळे खतांवरील गुंतवणूक कमी होऊन पीक उत्पादन स्वस्त होईल. खतांचा अधिक वापर केल्यास पीकसमृद्धी येईल.

सरकारला काय फायदा होईल?खतांवरील सबसिडीने पिकांचे उत्पादन वाढून ग्रामीण अर्थव्यवस्था तेजीत येईल.

टॅग्स :IndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकार