शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

"त्यांना समजलं असतं की, हिंदू..."; अंजूच्या पाकिस्तानी तरुणासोबतच्या निकाहावर काय म्हणाली सीमा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 13:06 IST

अंजूने निकाहापूर्वी धर्म बदलत इस्लाम धर्म स्वीकारला आणि स्वतःचे नाव फातिमा ठेवले आहे.

एकीकडे पाकिस्तानातून आपल्या प्रियकरासाठी (सचिन) भारतात आलेल्या सीमा हैदरची चर्चा सुरू असतानाच, दुसरीकडे भारतातूनपाकिस्तानात जाऊन अंजू नावाच्या महिलेने आपला फेसबुक फ्रेंड असलेल्या नसरुल्लाहसोबत निकाह केला आहे. अंजूने निकाहापूर्वी धर्म बदलत इस्लाम धर्म स्वीकारला आणि स्वतःचे नाव फातिमा ठेवले आहे.

अंजूने निकाहनामाच्या प्रतिज्ञापत्रात स्वत:च्या इच्छेने इस्लाम स्वीकारल्याचे आणि नसरुल्लाला कायदेशीर पती मानत असल्याचे म्हटले आहे. यातच, एका टीव्ही इंटरव्ह्यूमध्ये बोलताना अंजूच्या पाकिस्तानात जाण्यावरही भाष्य करत सीमा म्हणाली, भारत एक असा देश आहे, जेथे मनुष्य सर्वकाही करू शकतो. सीमा हैदर अवैध रित्या सीमा ओलांडून नेपाळ मार्गे भारतात आली आहे आणि एटीएस सीमाची चौकशी करत आहे.

अंजूसंदर्भात काय म्हणाली सीमा? -जेव्हा सीमा हैदरला विचारण्यात आले की, भारताची अंजू पाकिस्तानात गेली. मात्र ती सर्व कायदेशीर प्रक्रिया फॉलो करत तेथे गेली. यावर काय सांगशील? यावर सीमा म्हणाली, "ती (अंजू) भारतात राहत होती. भारत एक असा देश आहे जेथे माणूस सर्व काही करू शकतो. तर पाकिस्तान एक असा देश आहे, जेथे सीमा बाहेर गेली आहे अथवा काही करत आहे, असे कुणाला समजले असते, तर माझ्यासोबत अत्यंत वाईट झाले असते. जर हैदरला समजले असते की, मी एखाद्या हिंदू मुलासोबत प्रेम करते, तर त्याने मला मारून टाकले असते."

"सिंध आणि बलुचिस्तानात महिलांना थोडाही आदर नाही."जेव्हा सीमाला विचारण्यात आले, भारत आणि पाकिस्तानात महिलांच्या स्थितीत काय फरक जाणवतो? यावर ती म्हणाली, "सिंध आणि बलुचिस्तानात महिलांना थोडाही आदर नाही. सिंधमध्ये आमच्या वयाची एकही मुलगी शिकलेली नाही. डोक्यावरील दुपट्टा चुकून जरी खाली पडला तरी शिवीगाळ होते. तेथे अत्यंत बंधनं आहेत. घरातून बाहेर पडताना डोळ्यांपर्यंत बुरखा घालावा लागतो. तर भारतात मला खूप आदर मिळत आहे. येथील लोक फार छान आहेत. इथे महिलांप्रति अत्यंत आदर आहे.

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टPakistanपाकिस्तानIndiaभारतmarriageलग्न