शहरं
Join us  
Trending Stories
1
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणीचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला, मृत्यू नेमका कशामुळे?
3
Video: ७ महिन्याच्या गर्भवतीनं उचललं तब्बल १४५ किलो वजन; कसा अन् कुणी केला हा पराक्रम?
4
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
5
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? एसबीआय करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
6
अस्थिर बाजारात 'सुझलॉन'ची मोठी झेप! तिमाही निकालापूर्वीच भाव वाढला; दुसऱ्यांदा मल्टीबॅगर ठरणार?
7
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
8
‘त्यांनी आपल्या २ मुली पळवल्या तर तुम्ही त्यांच्या १० जणीं घेऊन या’, भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान  
9
अर्जुन तेंडुलकर चमकला; पण 'या' गोलंदाजाने दिला त्रास! रन काढू दिलीच नाही, विकेटही घेतली...
10
महागडे मोबाइल अन् मोठे टीव्हीच हवेत; या दिवाळीत 'प्रीमियम' खरेदीचा नवा पॅटर्न समोर
11
कोण आहे रंजना प्रकाश देसाई?; ज्यांना ८ व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदाची मिळाली जबाबदारी
12
रणबीरच्या 'रामायण'मध्ये विवेक ओबेरॉयचीही भूमिका, अभिनेत्याने दान केलं मानधन; म्हणाला...
13
बाजारात मोठी अस्थिरता! सेंसेक्स-निफ्टी सपाट पातळीवर बंद; महिंद्रा-बजाजसह 'हे' शेअर्स आपटले
14
प्रणित मोरे ऐकत नाय! क्रिकेटपटूच्या बहिणीसोबत वाढतेय जवळीक? 'बिग बॉस'च्या घरातील व्हिडीओ पाहून चाहतेही अवाक्
15
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
16
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
17
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
18
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
19
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
20
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण

नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 08:59 IST

भाजप हाय कमांडने सर्व मंत्री, नेते आणि इतरांना अनौपचारिक निर्देश दिले आहेत की, नेपाळमधील स्थितीवर भाष्य करण्यापूर्वी परवानगी घ्यावी.

- हरीश गुप्ता, नवी दिल्लीबिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी नेपाळमधील सध्याच्या स्थितीबाबत केलेल्या वक्तव्यानंतर भाजप नेतृत्वाने पक्षाच्या नेत्यांना नेपाळबाबत काहीही बोलण्यापूर्वी परवानगी घेण्याचे निर्देश दिले आहेत.

भाजप हाय कमांडने सर्व मंत्री, नेते आणि इतरांना अनौपचारिक निर्देश दिले आहेत की, नेपाळमधील स्थितीवर भाष्य करण्यापूर्वी परवानगी घ्यावी. हे निर्देश सोशल मीडिया आणि इतर प्लॅटफॉर्म हाताळणाऱ्यांनाही लागू आहेत. 

पंतप्रधानांनी केंद्रीय मंत्र्यांना आधीच सांगितले आहे की, त्यांनी आपापल्या मंत्रालयांबाबतच भाष्य करावे. भारत नेपाळमधील स्थितीवर भाष्य करण्याचे टाळत आहे. परराष्ट्र मंत्रालयानेही या घडामोडींचा संदर्भघेताना खूपच काळजी घेतली आहे. ही अत्यंत नाजूक स्थिती असून, भारत कोणताही वाद निर्माण करू इच्छित नाही.

सीमावर्ती राज्यांमधील पक्ष कार्यकर्त्यांना सल्ला

भाजपने आपल्या निर्देशात स्पष्टपणे म्हटले आहे की, पक्षाच्या नेत्यांनी याबाबत कोणतीही टिप्पणी करण्यापूर्वी भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. हा आदेश राज्यांतील नेत्यांसह मंत्र्यांना लागू आहे. उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आदी सीमावर्ती राज्यांमधील पक्ष कार्यकर्त्यांना अत्यंत काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

चौधरी काय म्हणाले ?

नेपाळ हा भारताचा भाग असता तर शांततेत आणि आनंदात राहिला असता, असे वक्तव्य सम्राट चौधरी यांनी केल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. त्यांनी नेपाळमधील सध्याच्या स्थितीला काँग्रेसला जबाबदार धरून हे वक्तव्य केले. ते म्हणाले होते की, ही सर्व काँग्रेसची चूक आहे. काँग्रेसने दोन देशांना वेगळे ठेवले म्हणून तेथे अराजकता आहे. नेपाळ भारताचा भाग असता तर तेथेही शांतता आणि आनंदमय वातावरण असते.

पळालेल्या ६० कैद्यांची भारतीय सुरक्षा दलाकडून धरपकड

भारत-नेपाळ सीमारेषेचे रक्षण करणाऱ्या सशस्त्र सीमा बल (एसएसबी) या सुरक्षा दलाने आंतरराष्ट्रीय सीमेजवळील विविध ठिकाणांहून सुमारे ६० जणांना पकडले असून, त्यांत बहुतांश नेपाळी नागरिक आहेत. नेपाळमध्ये निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेच्या वातावरणात तुरुंग फोडून फरार झालेले हे कैदी असल्याचा भारतीय सुरक्षा दलाला संशय आहे.

एसएसबीच्या जवानांनी गेल्या दोन दिवसांत उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमधील सीमावर्ती भागांतून या लोकांना पकडले आहे. त्यांना संबंधित राज्यांच्या पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पकडण्यात आलेल्यांपैकी दोन-तीन जणांनी आपण भारतीय नागरिक असल्याचे सांगितले आहे.

टॅग्स :NepalनेपाळBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीCorruptionभ्रष्टाचारSocial Mediaसोशल मीडिया