शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
2
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
3
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
4
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
6
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
7
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
8
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
9
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
10
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
11
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
12
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
13
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
15
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
16
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
17
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
18
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
19
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
20
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले

नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 08:59 IST

भाजप हाय कमांडने सर्व मंत्री, नेते आणि इतरांना अनौपचारिक निर्देश दिले आहेत की, नेपाळमधील स्थितीवर भाष्य करण्यापूर्वी परवानगी घ्यावी.

- हरीश गुप्ता, नवी दिल्लीबिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी नेपाळमधील सध्याच्या स्थितीबाबत केलेल्या वक्तव्यानंतर भाजप नेतृत्वाने पक्षाच्या नेत्यांना नेपाळबाबत काहीही बोलण्यापूर्वी परवानगी घेण्याचे निर्देश दिले आहेत.

भाजप हाय कमांडने सर्व मंत्री, नेते आणि इतरांना अनौपचारिक निर्देश दिले आहेत की, नेपाळमधील स्थितीवर भाष्य करण्यापूर्वी परवानगी घ्यावी. हे निर्देश सोशल मीडिया आणि इतर प्लॅटफॉर्म हाताळणाऱ्यांनाही लागू आहेत. 

पंतप्रधानांनी केंद्रीय मंत्र्यांना आधीच सांगितले आहे की, त्यांनी आपापल्या मंत्रालयांबाबतच भाष्य करावे. भारत नेपाळमधील स्थितीवर भाष्य करण्याचे टाळत आहे. परराष्ट्र मंत्रालयानेही या घडामोडींचा संदर्भघेताना खूपच काळजी घेतली आहे. ही अत्यंत नाजूक स्थिती असून, भारत कोणताही वाद निर्माण करू इच्छित नाही.

सीमावर्ती राज्यांमधील पक्ष कार्यकर्त्यांना सल्ला

भाजपने आपल्या निर्देशात स्पष्टपणे म्हटले आहे की, पक्षाच्या नेत्यांनी याबाबत कोणतीही टिप्पणी करण्यापूर्वी भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. हा आदेश राज्यांतील नेत्यांसह मंत्र्यांना लागू आहे. उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आदी सीमावर्ती राज्यांमधील पक्ष कार्यकर्त्यांना अत्यंत काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

चौधरी काय म्हणाले ?

नेपाळ हा भारताचा भाग असता तर शांततेत आणि आनंदात राहिला असता, असे वक्तव्य सम्राट चौधरी यांनी केल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. त्यांनी नेपाळमधील सध्याच्या स्थितीला काँग्रेसला जबाबदार धरून हे वक्तव्य केले. ते म्हणाले होते की, ही सर्व काँग्रेसची चूक आहे. काँग्रेसने दोन देशांना वेगळे ठेवले म्हणून तेथे अराजकता आहे. नेपाळ भारताचा भाग असता तर तेथेही शांतता आणि आनंदमय वातावरण असते.

पळालेल्या ६० कैद्यांची भारतीय सुरक्षा दलाकडून धरपकड

भारत-नेपाळ सीमारेषेचे रक्षण करणाऱ्या सशस्त्र सीमा बल (एसएसबी) या सुरक्षा दलाने आंतरराष्ट्रीय सीमेजवळील विविध ठिकाणांहून सुमारे ६० जणांना पकडले असून, त्यांत बहुतांश नेपाळी नागरिक आहेत. नेपाळमध्ये निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेच्या वातावरणात तुरुंग फोडून फरार झालेले हे कैदी असल्याचा भारतीय सुरक्षा दलाला संशय आहे.

एसएसबीच्या जवानांनी गेल्या दोन दिवसांत उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमधील सीमावर्ती भागांतून या लोकांना पकडले आहे. त्यांना संबंधित राज्यांच्या पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पकडण्यात आलेल्यांपैकी दोन-तीन जणांनी आपण भारतीय नागरिक असल्याचे सांगितले आहे.

टॅग्स :NepalनेपाळBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीCorruptionभ्रष्टाचारSocial Mediaसोशल मीडिया