शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

मजुरांच्या हत्येनंतर काश्मीरमध्ये सुरक्षा कडक; ८७ व्या दिवशीही बाजारपेठा बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 02:51 IST

चुकीच्या धोरणांमुळे परिस्थिती बिघडली -काँग्रेसचा आरोप

श्रीनगर : कुलगाम जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांनी पाच मजुरांची हत्या केल्यानंतर काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. ३७० कलम रद्द केल्यानंतर ८७व्या दिवशी, बुधवारीही काश्मीरमधील बाजारपेठा, सार्वजनिक वाहतूकसेवा बंद राहिल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.

दहशतवाद्यांना अटकाव करण्यासाठी सुरक्षा दलांची फ्लाइंग स्क्वाड तैनात करण्यात आली आहेत. दक्षिण काश्मीरमध्ये अधिकदक्षता बाळगण्यात येत आहे. बिगरकाश्मिरींवर हल्ल्यांचे दहशतवाद्यांचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी सुरक्षा जवान सज्ज झाले आहेत. काश्मीरमध्ये मंगळवारी अनेक ठिकाणी जमाव हिंसक झाला होता. त्यावेळी झालेल्या चकमकीत काही जण जखमी झाले आहेत.बाजारपेठा बंद असल्याने फेरीवाल्यांकडून वस्तू खरेदी करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. मात्र गेले दोन दिवस फेरीवाल्यांनीही आपला व्यवसाय बंद ठेवला आहे. मात्र १० वी व १२वीच्या परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणे पार पडल्या. काश्मीरमध्ये लँडलाइन व पोस्टपेड मोबाइल सेवा सुरू झाली असली तरी इंटरनेट सेवा अद्यापही बंदच आहे.

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या पाच मजुरांची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. त्यावेळी जखमी झालेल्या एका मजूरावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती सुधारत आहे, असे पोलिसांनी सांगितले. हा मजूर मरण पावल्याचे चुकीचे वक्तव्य पोलिसांनी आधी केले होते. 

सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवा : काँग्रेसनरेंद्र मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे काश्मीरमधील स्थिती आणखी बिघडली आहे, अशी टीका काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीर चौधरी यांनी बुधवारी केली आहे. काश्मीरमध्ये नेमकी स्थिती काय आहे हे सरकार जनतेपासून दडवू पाहत आहे.पाच लाख भरपाईकाश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी हत्या केलेल्या पाच मजूरांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची भरपाई देण्याची घोषणा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. या हल्ल्यामागचे खरे सत्य काय आहे याचा कसून शोध घ्या, अशी मागणी त्यांनी केली आहे. या मजुरांच्या हत्येचा ममता बॅनर्जी व राज्यपाल धनखर यांनी निषेध केला आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370