शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

मजुरांच्या हत्येनंतर काश्मीरमध्ये सुरक्षा कडक; ८७ व्या दिवशीही बाजारपेठा बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 02:51 IST

चुकीच्या धोरणांमुळे परिस्थिती बिघडली -काँग्रेसचा आरोप

श्रीनगर : कुलगाम जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांनी पाच मजुरांची हत्या केल्यानंतर काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. ३७० कलम रद्द केल्यानंतर ८७व्या दिवशी, बुधवारीही काश्मीरमधील बाजारपेठा, सार्वजनिक वाहतूकसेवा बंद राहिल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.

दहशतवाद्यांना अटकाव करण्यासाठी सुरक्षा दलांची फ्लाइंग स्क्वाड तैनात करण्यात आली आहेत. दक्षिण काश्मीरमध्ये अधिकदक्षता बाळगण्यात येत आहे. बिगरकाश्मिरींवर हल्ल्यांचे दहशतवाद्यांचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी सुरक्षा जवान सज्ज झाले आहेत. काश्मीरमध्ये मंगळवारी अनेक ठिकाणी जमाव हिंसक झाला होता. त्यावेळी झालेल्या चकमकीत काही जण जखमी झाले आहेत.बाजारपेठा बंद असल्याने फेरीवाल्यांकडून वस्तू खरेदी करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. मात्र गेले दोन दिवस फेरीवाल्यांनीही आपला व्यवसाय बंद ठेवला आहे. मात्र १० वी व १२वीच्या परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणे पार पडल्या. काश्मीरमध्ये लँडलाइन व पोस्टपेड मोबाइल सेवा सुरू झाली असली तरी इंटरनेट सेवा अद्यापही बंदच आहे.

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या पाच मजुरांची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. त्यावेळी जखमी झालेल्या एका मजूरावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती सुधारत आहे, असे पोलिसांनी सांगितले. हा मजूर मरण पावल्याचे चुकीचे वक्तव्य पोलिसांनी आधी केले होते. 

सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवा : काँग्रेसनरेंद्र मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे काश्मीरमधील स्थिती आणखी बिघडली आहे, अशी टीका काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीर चौधरी यांनी बुधवारी केली आहे. काश्मीरमध्ये नेमकी स्थिती काय आहे हे सरकार जनतेपासून दडवू पाहत आहे.पाच लाख भरपाईकाश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी हत्या केलेल्या पाच मजूरांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची भरपाई देण्याची घोषणा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. या हल्ल्यामागचे खरे सत्य काय आहे याचा कसून शोध घ्या, अशी मागणी त्यांनी केली आहे. या मजुरांच्या हत्येचा ममता बॅनर्जी व राज्यपाल धनखर यांनी निषेध केला आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370