शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

'सैन्यदलातील कपात म्हणजे सुरक्षेशी तडजोड'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2018 06:36 IST

राष्ट्रीय सुरक्षेशी समझोता या शीर्षकाखाली एकापाठोपाठ एक असे तीन ट्वीट करून त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात तिखट प्रतिक्रिया नोंदवली.

नवी दिल्ली : ‘भारतीय सैन्यदल जगातल्या ५ मोठ्या सैन्यदलांपैकी एक आहे. इतकेच नव्हे तर देशाविषयी समर्पणाची भावना अन् संरक्षण सिद्धतेबाबत विशेष कौशल्याचे व कार्यक्षमतेचे दर्शन या सैन्यदलाने साऱ्या जगाला वेळोवेळी घडवले आहे, अशा सैन्यदलाबद्दल प्रत्येक भारतीयाला गर्व व अभिमान आहे. आता खर्च कमी करण्यासाठी सैन्यदलात मोठ्या प्रमाणावर कपात करण्याचा केंद्र सरकारचा जो प्रस्ताव चर्चेत आहे, तो राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड करणारा आहे, अशा आशयाचे तीन ट्वीट भाजपचे बंडखोर खासदार व अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी गुरुवारी केले.प्रसारमाध्यमातील ज्या वृत्तांशी संबंधित हे ट्वीट शत्रुघ्न सिन्हांनी केले, त्या बातम्यांमध्ये ५ ते ७ हजार कोटींच्या संरक्षण खरेदीसाठी सैन्यदलात सुमारे दीड लाख जवानांची मोठी कपात करण्याचा सरकारचा इरादा असल्याचे नमूद केले होते. संरक्षण व्यवस्थेवर होणारा अफाट खर्च कमी करण्याबाबत असा तर्क मांडला गेला की, भारतीय संरक्षण व्यवस्थेसाठी सध्या १.२ लाख कोटी रुपयांचे बजेट आहे. त्यातला ८३ टक्के खर्च केवळ संरक्षण व्यवस्थेचा महसुली खर्च (एस्टॅब्लिशमेंट कॉस्ट) व सैन्यदलाचे वेतन यासाठी खर्च होतो. सैन्यदलाला मिळणाºया बजेटपैकी फक्त १७ टक्के म्हणजे २६ हजार ८२८ कोटी संरक्षण सिद्धतेसाठी लागणाºया साधनसामग्रीवर खर्च होतो. या बजेटवर सैन्यदल अगोदरच नाराज आहे. आगामी काळात सैन्यदलात व्यापक कपात करून जे ३१ हजार ८२६ ते ३३ हजार ८२६ कोटी हाती येतील त्यातून ५ ते ७ हजार कोटींच्या शस्त्रास्त्रांची खरेदी भारताच्या संरक्षणासाठी करण्याचा सरकारचा इरादा आहे. याच वृत्तावर सिन्हा भडकले व राष्ट्रीय सुरक्षेशी समझोता या शीर्षकाखाली एकापाठोपाठ एक असे तीन ट्वीट करून त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात तिखट प्रतिक्रिया नोंदवली.दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया यांच्यासह शहादरा येथे सफाई मजुरांना विशेष संदेश देण्यासाठी आयोजित सरकारी कार्यक्रमात शत्रुघ्न सिन्हा गेले तेव्हा भाजप कार्यर्क्त्यांनी काळे झेंडे दाखवून सिन्हांचा जोरदार निषेध केला. वाजपेयी मंत्रिमंडळात शत्रुघ्न सिन्हा मंत्री असताना शहादराचे विद्यमान जिल्हाधिकारी त्यांचे वैयक्तिक सचिव या नात्याने जबाबदारी सांभाळीत होते.मी बोलतो ती ‘दिल की बात’भाजप कार्यकर्त्यांकडून सुरू असलेल्या निषेध घोषणांच्या पार्श्वभूमीवर शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, ‘मन की बात’ करण्याचे पेटंट काही माझ्यापाशी नाही. मी जे काही बोलतो ती दिल की बात असते. देशात पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किमती वाढत असल्यामुळे जनता निराश आहे. मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून गॅसच्या किमतीत दुप्पट वाढ झाली आहे. इंधनाचे भाव आकाशाला भिडले आहेत, सैन्यदलात कपात करण्याचा प्रस्ताव तर धक्कादायक आहे. अशा वेळी इतरांना सल्ले देण्याऐवजी केंद्र सरकार आपल्या मंत्रिमंडळावर होणाºया खर्चात कपात का करीत नाही.’

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानNarendra Modiनरेंद्र मोदीShatrughan Sinhaशत्रुघ्न सिन्हा