शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

अनंतनागमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा केला खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 07:54 IST

जम्मू-काश्मीरमधल्या अनंतनागमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

श्रीनगरः जम्मू-काश्मीरमधल्या अनंतनागमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. अनंतनागमधल्या बिजबेहरामध्ये सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये मध्यरात्री चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. लष्कराच्या 3 आरआर आणि एसओजीच्या संयुक्त टीमनं गुरुवारी सकाळी हाऊन बंदर मोहल्ला परिसरात सर्च ऑपरेशन राबवलं.या टीमला दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. जेव्हा सुरक्षा दलाच्या जवानांची संयुक्त टीम सर्च ऑपरेशन राबवत होती, त्याच दरम्यान दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. दोन्ही बाजूनं गोळीबार सुरू होता. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा जवानांना यश आलं. दहशतवाद्यांच्या मृतदेहाजवळून शस्त्रास्त्र आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. सध्या दहशतवाद्यांची ओळख पटवली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दोन्ही दहशतवादी हे हिजबुल मुजाहिद्दीन या संघटनेशी संबंधित आहेत.सुरक्षा दलाच्या जवानांचं ऑपरेशन ऑलआऊट जारीतत्पूर्वी 20 एप्रिलला दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक झाली. सोपोरमधल्या वाटरगाममध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला होता. 13 एप्रिलला शोपियानमध्ये लष्करानं दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं होतं. 6 एप्रिलला शोपियानमधल्या इमाम साहिब भागातही दोन दहशतवाद्यांना मारलं होतं. 28 मार्चलाही सुरक्षा दलाच्या जवानांनी शोपियान आणि हंदवाडामध्ये पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवानTerrorismदहशतवादterroristदहशतवादी