शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

अनंतनागमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा केला खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 07:54 IST

जम्मू-काश्मीरमधल्या अनंतनागमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

श्रीनगरः जम्मू-काश्मीरमधल्या अनंतनागमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. अनंतनागमधल्या बिजबेहरामध्ये सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये मध्यरात्री चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. लष्कराच्या 3 आरआर आणि एसओजीच्या संयुक्त टीमनं गुरुवारी सकाळी हाऊन बंदर मोहल्ला परिसरात सर्च ऑपरेशन राबवलं.या टीमला दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. जेव्हा सुरक्षा दलाच्या जवानांची संयुक्त टीम सर्च ऑपरेशन राबवत होती, त्याच दरम्यान दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. दोन्ही बाजूनं गोळीबार सुरू होता. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा जवानांना यश आलं. दहशतवाद्यांच्या मृतदेहाजवळून शस्त्रास्त्र आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. सध्या दहशतवाद्यांची ओळख पटवली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दोन्ही दहशतवादी हे हिजबुल मुजाहिद्दीन या संघटनेशी संबंधित आहेत.सुरक्षा दलाच्या जवानांचं ऑपरेशन ऑलआऊट जारीतत्पूर्वी 20 एप्रिलला दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक झाली. सोपोरमधल्या वाटरगाममध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला होता. 13 एप्रिलला शोपियानमध्ये लष्करानं दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं होतं. 6 एप्रिलला शोपियानमधल्या इमाम साहिब भागातही दोन दहशतवाद्यांना मारलं होतं. 28 मार्चलाही सुरक्षा दलाच्या जवानांनी शोपियान आणि हंदवाडामध्ये पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवानTerrorismदहशतवादterroristदहशतवादी