शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: आजचा मोर्चा हा राग दाखवण्याचा, ताकद दाखवण्याचा मोर्चा: राज ठाकरे
2
जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला...
3
8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय रे भाऊ? नवीन वेतन कसं ठरणार? जाणून घ्या
4
Retirement: स्टार खेळाडूनं चाहत्यांना दिला मोठा धक्का, अचानक केली निवृत्तीची घोषणा!
5
रोहित आर्याबाबत मोठा खुलासा! कोथरुडचा घरमालक उलटे १.७५ लाख द्यायला तयार झालेला; शेवटी...
6
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
7
पाच वर्षांत अफाट परतावा देणारे शेअर्स कोणते, गुंतवणूकदारांसाठी संकेत काय? तुमच्याकडे आहे का?
8
BCCI: "आणखी दोन-तीन दिवस वाट पाहू, जर ट्रॉफी परत मिळाली नाही तर...", बीसीसीआयची कडवी भूमिका
9
“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले... 
10
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
11
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट
12
भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
13
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
14
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
15
Mumbai Traffic Update: मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
16
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
17
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
18
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
19
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
20
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?

सुरक्षित रेल्वे; 166 वर्षाच्या इतिहासात प्रथमच एकाही प्रवाशचा झाला नाही अपघाती मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 20:34 IST

रेल्वेच्या 166 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली आहे अशी गोष्ट

नवी दिल्ली -  गेल्या काही वर्षांपासून रेल्वेचा प्रवास अधिकाधिक सुरक्षित करण्यासाठी रेल्वे मंत्रालय आणि प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून 2018-19 हे वर्ष रेल्वेसाठी आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात सुरक्षित वर्ष ठरले आहे. रेल्वेच्या 166 वर्षांच्या इतिहासात प्रथमच संपूर्ण वर्षभरात रेल्वे अपघातात एकाही प्रवाशाचा मृत्यू झालेला नाही. तसेच रेल्वे अपघातांमध्येही लक्षणीय घट झालेली आहे.  या संदर्भातीली आकडेवारी रेल्वेने नुकतीच प्रसिद्ध केली आहे. एकेकाळी दोन गाड्यांची समोरासमोर धडक होऊन, क्राँसिंगमधील गोंधळ, आग लागणे, गाडी रुळावरून घसरणे अशा अपघातांमुळे प्रवाशांना जीव गमवावा लागत असे. मात्र आता अशा अपघातांमध्ये 95 टक्क्यांनी घट झाली आहे. प्राप्त आकडेवारीनुसार 2017-18 मध्ये भारतीय रेल्वेच्या कार्यकक्षेत 73 अपघात झाले होते. मात्र यावर्षी या अपघातात अजून घट होऊन तो आकडा 59 वर आला आहे.  सुरुवातीच्या वर्षांमध्ये रेल्वे अपघातांचे प्रमाण लक्षणीय होते. तसेच त्यावेळी रेल्वे अपघातांमध्ये जीवितहानीसुद्धा मोठ्या प्रमाणात होत होती. 1990 ते 1995 या पाच वर्षांच्या काळात सुमारे 2 हजार 400 जणांचा मृत्यू झाला होता. तर 2013 ते 2018 या काळात सुमारे 990 प्रवाशांचा मृत्यू झाला होता.  दरम्यान, रेल्वेने अपघातात एकाही प्रवाशाचा मृत्यू झाला नसल्याचा दावा केला असला तरी मुंबईतील लोकल प्रवासादरम्यान होणाऱ्या मृत्यूंची आकडेवारी यात गृहित धरलेली नाही. त्यामुळे याबाबत नाराजी व्यक्त होत आहे.  

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेIndiaभारत