शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
3
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
4
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
5
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
7
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
8
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
9
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
10
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
12
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
13
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
14
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
15
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
16
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
17
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
18
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
19
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

सुरक्षित रेल्वे; 166 वर्षाच्या इतिहासात प्रथमच एकाही प्रवाशचा झाला नाही अपघाती मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 20:34 IST

रेल्वेच्या 166 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली आहे अशी गोष्ट

नवी दिल्ली -  गेल्या काही वर्षांपासून रेल्वेचा प्रवास अधिकाधिक सुरक्षित करण्यासाठी रेल्वे मंत्रालय आणि प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून 2018-19 हे वर्ष रेल्वेसाठी आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात सुरक्षित वर्ष ठरले आहे. रेल्वेच्या 166 वर्षांच्या इतिहासात प्रथमच संपूर्ण वर्षभरात रेल्वे अपघातात एकाही प्रवाशाचा मृत्यू झालेला नाही. तसेच रेल्वे अपघातांमध्येही लक्षणीय घट झालेली आहे.  या संदर्भातीली आकडेवारी रेल्वेने नुकतीच प्रसिद्ध केली आहे. एकेकाळी दोन गाड्यांची समोरासमोर धडक होऊन, क्राँसिंगमधील गोंधळ, आग लागणे, गाडी रुळावरून घसरणे अशा अपघातांमुळे प्रवाशांना जीव गमवावा लागत असे. मात्र आता अशा अपघातांमध्ये 95 टक्क्यांनी घट झाली आहे. प्राप्त आकडेवारीनुसार 2017-18 मध्ये भारतीय रेल्वेच्या कार्यकक्षेत 73 अपघात झाले होते. मात्र यावर्षी या अपघातात अजून घट होऊन तो आकडा 59 वर आला आहे.  सुरुवातीच्या वर्षांमध्ये रेल्वे अपघातांचे प्रमाण लक्षणीय होते. तसेच त्यावेळी रेल्वे अपघातांमध्ये जीवितहानीसुद्धा मोठ्या प्रमाणात होत होती. 1990 ते 1995 या पाच वर्षांच्या काळात सुमारे 2 हजार 400 जणांचा मृत्यू झाला होता. तर 2013 ते 2018 या काळात सुमारे 990 प्रवाशांचा मृत्यू झाला होता.  दरम्यान, रेल्वेने अपघातात एकाही प्रवाशाचा मृत्यू झाला नसल्याचा दावा केला असला तरी मुंबईतील लोकल प्रवासादरम्यान होणाऱ्या मृत्यूंची आकडेवारी यात गृहित धरलेली नाही. त्यामुळे याबाबत नाराजी व्यक्त होत आहे.  

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेIndiaभारत