शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा 'मे'च्या मध्यावर 'उद्रेक' होणार; राष्ट्रीय समितीनं यापूर्वीच केंद्राला दिला होता इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 09:26 IST

Coronavirus Updates : मे महिन्याच्या मध्यापर्यंत कोरोनाचा उद्रेक होऊ शकतो, असा इशारा सरकारला तज्ज्ञांनी २ एप्रिल रोजीच दिला होता अशी माहिती आता समोर आली आहे.

ठळक मुद्देसुरूवातीला तज्ज्ञांनी १२-१५ मे या कालावधीत रुग्णसंख्या वाढण्याचा वर्तवला होता अंदाजकेंद्रानं दीर्घकालिन उपायांऐवजी अल्पकालिन उपायांवर लक्ष दिल्याचं तज्ज्ञांचं मत

देशात सध्या मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. अशा परस्थितीत आरोग्य व्यवस्थेवरही मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. दरम्यान, कोरोनाबाधितांची संख्या तेजीनं वाढत आहे आणि मे महिन्याच्या मध्यापर्यंत त्याचा उद्रेक होऊ शकतो, असा इशारा सरकारला तज्ज्ञांनी २ एप्रिल रोजीच दिला होता अशी माहिती आता समोर आली आहे. १५ मे ते २२ मे या कालावधीत कोरोनाचा पीक असेल असं केंद्र सरकारला सांगण्यात आलं होतं. परंतु यानंतर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पीक असेल असं सांगण्यात आलं, अशी माहिती आयआयटी हैदराबादचे प्राध्यापक आणि कोविड-१९ सुपरमॉडेल समितीचे प्रमुख डॉ.एम. विद्यासागर यांनी एनडीटीव्हीशी बोलताना दिली. "१३ मार्चपर्यंत कोरोनाच्या प्रकरणांचा आलेख वर जात होता हे कोणीही पाहू शकेल. परंतु तेव्हा आमच्याकडे इतका डेटाही नव्हता की आम्ही कोणती भविष्यवाणी करू शकू," असं ते म्हणाले. २ एप्रिल रोजी अधिकृतरित्या १५ ते २२ मे दरम्यान दररोज १.२ लाख नवे रुग्ण दररोज सापडू शकतात असं सांगण्यात आलं होतं. परंतु भारतात यापेक्षा अधिक प्रमाणात रुग्णांची नोंद झाली. सध्या देशात दररोज ३.५ लाखांच्या जवळपास रुग्ण सापडत आहेत. तर दुसरीकडे आयआयटी कानपूरच्या एका अभ्यासात दररोज वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या ८ मे पर्यंत पीक वर जाऊ शकते, असं सांगण्यात आलं होतंय यामध्ये १४ ते १८ मे दरम्यान देशात अॅक्टिव्ह केसेस ३८ ते ४४ लाखांच्या दरम्यान असू शकतात असंही म्हटलं होतं. "केंद्र सरकारनं दीर्घकालिन किंवा मध्यम कालावधीच्या योजनांव्यतिरिक्त अल्पकालिन योजनांवर लक्ष केंद्रीत केलं. परंतु गेल्या काही घटनांवर लक्ष दिलं तर ही पावलं यशस्वी ठरली नसल्याचंच दिसून येतं," असं विद्यासागर म्हणाले.केंद्राला माहिती होती का?कोरोनाचा इतक्या मोठ्या प्रमाणात विस्फोट होईल याची केंद्राला माहिती होती का असा प्रश्न या अभ्यासात उपस्थित करण्यात आला होता. जर असं होतं तर त्यांनी दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यासाठी काय पावलं उचलली असंही विचारण्यात आलं. "सुरुवातीला १५ ते २२ मे बा कालावधी वर्तवण्यात आला होता. तसंच अशात काही उपाययोजना लागू केल्या गेल्या असत्या. परंतु यासाठी ३-४ महिन्यांचा कालावधी लागला असता. आमच्याकडे वेळ नव्हती. आम्हाला जे काही करायचं होतं ते ३-४ आठवड्यांत करायचं होतं," असं विद्यासागर म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतGovernmentसरकार