शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
2
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
3
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
4
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
5
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
6
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
7
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
8
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
9
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
10
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
11
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
12
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
13
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
14
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
15
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
16
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
17
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
18
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
19
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
20
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा 'मे'च्या मध्यावर 'उद्रेक' होणार; राष्ट्रीय समितीनं यापूर्वीच केंद्राला दिला होता इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 09:26 IST

Coronavirus Updates : मे महिन्याच्या मध्यापर्यंत कोरोनाचा उद्रेक होऊ शकतो, असा इशारा सरकारला तज्ज्ञांनी २ एप्रिल रोजीच दिला होता अशी माहिती आता समोर आली आहे.

ठळक मुद्देसुरूवातीला तज्ज्ञांनी १२-१५ मे या कालावधीत रुग्णसंख्या वाढण्याचा वर्तवला होता अंदाजकेंद्रानं दीर्घकालिन उपायांऐवजी अल्पकालिन उपायांवर लक्ष दिल्याचं तज्ज्ञांचं मत

देशात सध्या मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. अशा परस्थितीत आरोग्य व्यवस्थेवरही मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. दरम्यान, कोरोनाबाधितांची संख्या तेजीनं वाढत आहे आणि मे महिन्याच्या मध्यापर्यंत त्याचा उद्रेक होऊ शकतो, असा इशारा सरकारला तज्ज्ञांनी २ एप्रिल रोजीच दिला होता अशी माहिती आता समोर आली आहे. १५ मे ते २२ मे या कालावधीत कोरोनाचा पीक असेल असं केंद्र सरकारला सांगण्यात आलं होतं. परंतु यानंतर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पीक असेल असं सांगण्यात आलं, अशी माहिती आयआयटी हैदराबादचे प्राध्यापक आणि कोविड-१९ सुपरमॉडेल समितीचे प्रमुख डॉ.एम. विद्यासागर यांनी एनडीटीव्हीशी बोलताना दिली. "१३ मार्चपर्यंत कोरोनाच्या प्रकरणांचा आलेख वर जात होता हे कोणीही पाहू शकेल. परंतु तेव्हा आमच्याकडे इतका डेटाही नव्हता की आम्ही कोणती भविष्यवाणी करू शकू," असं ते म्हणाले. २ एप्रिल रोजी अधिकृतरित्या १५ ते २२ मे दरम्यान दररोज १.२ लाख नवे रुग्ण दररोज सापडू शकतात असं सांगण्यात आलं होतं. परंतु भारतात यापेक्षा अधिक प्रमाणात रुग्णांची नोंद झाली. सध्या देशात दररोज ३.५ लाखांच्या जवळपास रुग्ण सापडत आहेत. तर दुसरीकडे आयआयटी कानपूरच्या एका अभ्यासात दररोज वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या ८ मे पर्यंत पीक वर जाऊ शकते, असं सांगण्यात आलं होतंय यामध्ये १४ ते १८ मे दरम्यान देशात अॅक्टिव्ह केसेस ३८ ते ४४ लाखांच्या दरम्यान असू शकतात असंही म्हटलं होतं. "केंद्र सरकारनं दीर्घकालिन किंवा मध्यम कालावधीच्या योजनांव्यतिरिक्त अल्पकालिन योजनांवर लक्ष केंद्रीत केलं. परंतु गेल्या काही घटनांवर लक्ष दिलं तर ही पावलं यशस्वी ठरली नसल्याचंच दिसून येतं," असं विद्यासागर म्हणाले.केंद्राला माहिती होती का?कोरोनाचा इतक्या मोठ्या प्रमाणात विस्फोट होईल याची केंद्राला माहिती होती का असा प्रश्न या अभ्यासात उपस्थित करण्यात आला होता. जर असं होतं तर त्यांनी दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यासाठी काय पावलं उचलली असंही विचारण्यात आलं. "सुरुवातीला १५ ते २२ मे बा कालावधी वर्तवण्यात आला होता. तसंच अशात काही उपाययोजना लागू केल्या गेल्या असत्या. परंतु यासाठी ३-४ महिन्यांचा कालावधी लागला असता. आमच्याकडे वेळ नव्हती. आम्हाला जे काही करायचं होतं ते ३-४ आठवड्यांत करायचं होतं," असं विद्यासागर म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतGovernmentसरकार