शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

पु्न्हा भूकंप, नेपाळ व उत्तर भारत हादरला

By admin | Published: May 12, 2015 12:59 PM

मंगळवारी दुपारी बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे नेपाळ व उत्तर भारत हादरला असून नेपाळमध्ये २९ तर भारतात १७ जण ठार झाले.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १२ - नेपाळमध्ये अवघ्या दोन आठवड्यांपूर्वी आलेल्या  भूकंपाच्या कटू आठवणी ताज्या असतानाच मंगळवारी दुपारी नेपाळ व उत्तर भारत पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले असून नेपाळमध्ये २९ तर बारतात १७ जण ठार झाल्याचे वृत्त आहे. नेपाळमधील कोडारी येथे भूकंपाचा केंद्रबिंदू असून या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.४ एवढी होती. तेथे सुमारे ९८१ जण जखमी झाले आहेत. नेपाळमध्ये नुकत्याच झालेल्या भूकंपात सात हजाराहून अधिक जण ठार तर १५ हजारांहून अधिक जखमी झाले होते. नेपाळवासी त्या धक्‌यातून सावरत असतानाच आज त्यांना पुन्हा मोठा धक्का बसला.

मंगळवारी दुपारी १२.३५ मिनीटांनी व १२.३८ मिनीटांनी नेपाळमध्ये मोठ्या तीव्रतेचे धक्के बसले. यातील पहिला भूकंपाचा केंद्रबिंद कोडारी येथे होता तर दुसरा भूकंपाचा केंद्रबिंदूही नेपाळ - चीन सीमारेषेजवळ होता. पहिला भूकंप ७.१ तर दुसरा भूकंप ७.४ रिश्टर स्केल ऐवढा तीव्रतेचा होता. यानंतर आणखी एक भूकंपाचा धक्का बसला. लागोपाठ आलेल्या तीन भूकंपाचे धक्के  उत्तर व पूर्व भारतातील दिल्ली, पश्चिम बंगाल, पंजाब, आसाम, ओदिशा अशा अनेक राज्यांमध्येही जाणवले. गुजरातमधील अहमदाबादपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले आहे. अफगाणस्तानमध्येही भूकंपाचा धक्का बसल्याचे वृत्त आहे. या भूकंपात जीवितहानी व वित्तहानी झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही. मात्र या भूकंपामुळे पुन्हा एकदा घबराटीचे वातावरण पसरले आहे. भूकंपानंतर नेपाळचे काठमांडू विमानतळ पूर्णपणे बंद करण्यात आले असून भारतातही खबरदारी म्हणून दिल्ली, कोलकाता येथील मेट्रो सेवा बंद करण्यात आली. तर सुप्रीम कोर्टाचे कामकाजही काही वेळ थांबवण्यात आले होते. येत्या ३० मे पर्यंत नेपाळमधील सर्व शाळाही बंद राहणार आहेत.

केंद्रीय गृहमंत्रालय भूकंपाविषयीची माहिती घेत असून नागरिकांनी घाबरु नये असे आवाहन गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे.