शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

आधी जागावाटप, नंतरच चर्चा! निवडणुका होताच अखिलेश यादवांनी काँग्रेसला सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 21:28 IST

इंडिया आघाडीच्या काँग्रेसने ६ डिसेंबरला बोलविलेल्या बैठकीला नितीश कुमार, ममता बॅनर्जी यांच्यासह अखिलेश यादव यांनी देखील येण्यास नकार दिला होता.

मध्य प्रदेश निवडणुकीत काँग्रेसने इंडिया आघाडीतील पक्षांना सोबत घेतले नाही. अखिलेश यादव यांच्या सपाची काही ठिकाणी ताकद होती, तरीही त्यांना काँग्रेसने भाव दिला नव्हता. यामुळे या अनुभवावरून अखिलेश यांनी काँग्रेसला चांगलेच सुनावले आहे. काँग्रेसने आघाडीची ६ डिसेंबरला बैठक बोलावली होती, त्यावरून अखिलेश यांनी आधी जागावाटप नंतर पुढची चर्चा अशी अटच घातल्याने काँग्रेससमोर पेच निर्माण झाला आहे. 

इंडिया आघाडीच्या काँग्रेसने ६ डिसेंबरला बोलविलेल्या बैठकीला नितीश कुमार, ममता बॅनर्जी यांच्यासह अखिलेश यादव यांनी देखील येण्यास नकार दिला होता. यावर आता ही बैठक १७ डिसेंबरला घेण्याचे लालू प्रसाद यादव यांनी जाहीर केले आहे. काँग्रेस स्थानिक पक्षांना भाव देत नसल्याने व पाच राज्यांतील निवडणुकीत काँग्रेसने सपाटून मार खाल्ल्याने या पक्षांनी काँग्रेसला कोंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे. 

अखिलेश यांनी आधी जागा वाटप करावे, त्याशिवाय पुढे चर्चा करणार नसल्याची अटच घातली आहे. ज्या पक्षाची ताकद जास्त असेल त्या ठिकाणी त्या पक्षाला इतर पक्षांनी मदत करावी, त्या पक्षाचा उमेदवार द्यावा असे इंडिया आघाडीच्या बैठकीत सुरुवातीला ठरले होते. याच सुत्रावर आघाडीला पुढे जावे लागेल असे अखिलेश यांनी म्हटले आहे. यापूर्वी अखिलेश यांनी काहींचे गर्वहरण झाले असेल असा टोला काँग्रेसला लगावला होता. 

अखिलेश यादव उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस पक्षाला जास्त जागा देण्याच्या मन:स्थितीत नाहीएत. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस पक्षाची स्थिती अमेठी आणि रायबरेलीपेक्षा चांगली  नाही. अशा स्थितीत काँग्रेस पक्षाला आता फक्त त्या मतदारसंघांपुरतेच मर्यादित राहावे लागणार आहे, असे सपा प्रवक्ते फखरुल हसन चंद यांनी सांगितले होते. 

भाजपाचा मुकाबला करण्यासाठी २६ पक्ष एकत्र-लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि पंतप्रधान मोदींचा मुकाबला करण्यासाठी काँग्रेस, TMC, RJD, JDU, AAP, SP, DMK असे २६ विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. या विरोधी पक्षांच्या युतीला 'इंडिया' युती असे नाव देण्यात आले आहे. 'इंडिया' आघाडीची पहिली बैठक पाटणा येथे झाली. दुसरी बैठक बेंगळुरू येथे तर तिसरी बैठक मुंबईत झाली. यानंतर खर्गेंनी यांनी ६ डिसेंबर रोजी दिल्लीत चौथी बैठक बोलावली होती.

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवcongressकाँग्रेस