शहरं
Join us  
Trending Stories
1
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
2
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
3
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
4
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
6
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
7
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
8
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
9
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
10
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
11
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
12
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
13
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
14
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
15
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
16
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
17
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
18
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
19
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
20
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   

वैज्ञानिक उत्कृष्टतेला चालना हवी

By admin | Updated: January 4, 2017 02:39 IST

शिक्षण संस्थांसह सर्व भागधारकांत वैज्ञानिक उत्कृष्टतेला चालना देण्यासाठी प्रमुख वैज्ञानिक संस्थांनी उद्योजकीय सामाजिक दायित्वाच्या (सीएसआर) धर्तीवर वैज्ञानिक

तिरुपती : शिक्षण संस्थांसह सर्व भागधारकांत वैज्ञानिक उत्कृष्टतेला चालना देण्यासाठी प्रमुख वैज्ञानिक संस्थांनी उद्योजकीय सामाजिक दायित्वाच्या (सीएसआर) धर्तीवर वैज्ञानिक सामाजिक दायित्व (एसएसआर) योजना सुरू करावी, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे केली. मूलभूतपासून उपयोजितपर्यंत विज्ञानाच्या विविध शाखांना साहाय्य, तसेच नाविन्यपूर्णतेवर भर देण्याप्रतीची सरकारची बांधिलकी अधोरेखित करतानाच विध्वंसक तंत्रज्ञानावर नजर ठेवण्याचे, तसेच देशाच्या वृद्धीसाठी तडफेने काम करण्याचे आवाहनही त्यांनी शास्त्रज्ञांना केले. भारतीय विज्ञान काँग्रेसच्या १०४ व्या अधिवेशनाच्या उ्घाटनप्रसंगी ते बोलत होते. संशोधन आणि विकासाच्या मूलभूत पायाभूत सुविधा, मनुष्यबळ आणि कुशलता निर्माण करून देशाला भक्कम बनविणे आवश्यक आहे, असे सांगून ते म्हणाले, आपल्या प्रमुख संस्थांना शाळा व महाविद्यालयांसह सर्व भागधारकांशी जोडण्यासाठी उद्योजकीय सामाजिक दायित्वाच्या धर्तीवर वैज्ञानिक सामाजिक दायित्व ही संकल्पना राबविण्याची गरज आहे. आमच्या तरुणांना विज्ञान आणि तंत्रज्ञानातील उच्चकोटीचे प्रशिक्षण मिळाल्यास, स्पर्धात्मक युगात नोकरी मिळविण्यास ते सक्षम होऊ शकतील. सायबर फिजिकल तंत्राचा वेगवान जागतिक उदय या क्षेत्राकडे विशेष लक्ष पुरविण्याची गरज आहे. रोबोट विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल उत्पादन, आकडेवारीचे विश्लेषण, सखोल अभ्यास, क्वांटम दूरसंचार आणि इंटरनेटमध्ये संशोधन, प्रशिक्षण आणि कौशल्य याद्वारे आपण याचे मोठ्या संधीत रूपांतर करू शकतो. तंत्रज्ञानाचा विकास करून त्यांचा उपयोग सेवा आणि उत्पादन, कृषी क्षेत्रासह जल, ऊर्जा आणि वाहतूक व्यवस्थापन, आरोग्य, पर्यावरण, सुरक्षा, पायाभूत सुविधा आणि भू माहिती प्रणाली, आर्थिक प्रणाली आणि गुन्हेगारीविरुद्धच्या लढ्यात करू शकतो. अकॅडमिक, स्टार्ट अप्स, उद्योग आणि संशोधन आणि विकास प्रयोगशाळांना उपलब्ध होऊ शकेल, अशी विज्ञान व तंत्रज्ञानाची भक्कम पायाभूत सुविधा उभारण्यास सरकारचे प्राधान्य आहे. वैज्ञानिक संस्थांतील महागड्या उपकरणांची प्रतिरूपे तयार करणे, अतिरेकी वापर, सहज उपलब्धता, देखभाल आदी समस्या सोडविण्याची गरज आहे, असेही पंतप्रधान म्हणाले. (वृत्तसंस्था)‘संशोधक’ शिक्षकांनी विद्यापीठांशी संलग्न व्हावे- शहरी भागातील प्रयोगशाळा, संशोधन संस्था आणि विद्यापीठांनी केंद्र म्हणून काम करण्यासाठी स्वत:ला इतर संस्थांशी जोडून घेतले पाहिजे. - संशोधनाची पार्श्वभूमी असलेले महाविद्यालयीन शिक्षक नजीकची विद्यापीठे आणि संशोधन आणि विकास संस्थांशी संलग्न होऊ शकतात.- या संस्थांनी शाळा, महाविद्यालये आणि तंत्रनिकेतन महाविद्यालयांपर्यंत पोहोचून प्रशिक्षण उपक्रम सुरू केल्यास विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात कुशल मनुष्यबळ निर्मितीला चालना मिळेल. तसेच शालेय विद्यार्थ्यांत कल्पना आणि नाविन्यपूर्णतेचे बीजारोपण केल्यामुळे नविनीकरणाच्या पायाची व्याप्ती वाढून देशाचे भवितव्य सुरक्षित राहील, असेही ते म्हणाले.