शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
4
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
5
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
6
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
7
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
8
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
9
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
10
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
11
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
12
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
13
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
14
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
15
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
16
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
17
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
18
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
19
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
20
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी

विज्ञान आणि गणित विद्यार्थ्यांचे नावडते विषय

By admin | Published: May 16, 2016 10:09 AM

गणित आणि विज्ञान विषय शिकवण्याच्या त्याच त्याच जुनाट पद्धतीमुळे माध्यमिक शालेय विद्यार्थ्यांचा या दोन विषयांमधील रस कमी होत चालल्याचे एका अहवालातून समोर आले आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १६ - गणित आणि विज्ञान विषय शिकवण्याच्या त्याच त्याच जुनाट पद्धतीमुळे माध्यमिक शालेय विद्यार्थ्यांचा या दोन विषयांमधील रस कमी होत चालल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या समितीने हे निरीक्षण नोंदवले आहे. 
 
गणित आणि विज्ञान विषयात रुची नसल्यामुळे विद्यार्थी पुढे मानवविज्ञान आणि कॉमर्स या विषयांकडे वळत असल्याचेही समितीने म्हटले आहे. गणित, विज्ञान या दोन विषयात दर्जेदार आणि चांगल्या शिक्षकांची कमतरता असल्याचेही या समितीने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाला पाठवलेल्या अहवालात म्हटले आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी नव्याने योजना आखण्यासाठी विशेष कार्यदलाची स्थापना करण्याची सूचना समितीने आपल्या अहवालात केली आहे. 
 
गणित-विज्ञान शिकवण्याच्या कौशल्यात सुधारणा करण्याबाबत शिक्षकही तितके गंभीर नसल्याचे समितीने म्हटले आहे. समितीने दिल्ली, महाराष्ट्र, तेलंगण, त्रिपुरा आणि उत्तरप्रदेशमधील शाळांना प्रत्यक्ष भेटी दिल्या तसेच विविध माहितींचा अभ्यास करुन हा अहवाल तयार केला आहे. 
 
विज्ञान आणि गणित विषयाची विद्यार्थ्यांमध्ये रुची निर्माण करण्यासाठी केंद्रीय पातळीवरुन झालेले  सर्व प्रयत्न अयशस्वी ठरल्याचे या अहवालात नमूद केले आहे. विज्ञान विषय शाळेमध्ये वैज्ञानिक संशोधनाची रुची निर्माण होईल अशा दृष्टीकोनातून शिकवला गेला पाहिजे असे नरेंद्र मोदी यांचे मत आहे. त्यामुळे देशाला प्रगतीची नवी शिखरे गाठता येतील असे मोदींचे मत आहे.