शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

१२ राज्यांत शाळा उघडल्या; ६ राज्यांत मुलांमध्ये कोरोना संसर्ग वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2021 07:24 IST

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशातील काही राज्यांमध्ये शाळा सुरू होऊन सुमारे एक महिना उलटला आहे.

नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या दीड वर्षानंतर देशात काही राज्यांनी शाळा सुरू केल्या आहेत. १२ राज्यांमध्ये शाळा उघडल्यापासून मुलांमध्ये कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत आहे. यासंदर्भात, आरोग्य मंत्रालयाने राज्यांना पुन्हा एकदा कोविड नियमांचे कठोर पालन करण्याचे आदेश जारी केले आहेत. जिल्हा प्रशासनाला शाळांवर लक्ष ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशातील काही राज्यांमध्ये शाळा सुरू होऊन सुमारे एक महिना उलटला आहे. यामध्ये पंजाब अव्वल आहे कारण तिथे सर्वांत आधी शाळा सुरू झाल्या. यानंतर बिहारमध्ये १५ ऑगस्टनंतर शाळा सुरू झाल्या. दरम्यान, मध्य प्रदेश, उत्तराखंड, छत्तीसगडमध्येही मुले शाळेत जाऊ लागली आहेत.

गेल्या दोन महिन्यांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास असे दिसते की, १७ वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये काही ठिकाणी संक्रमणाचे प्रमाण वाढले आहे.  पंजाब, बिहार, मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड आणि उत्तराखंडमध्ये ही वाढ एक टक्क्याहून अधिक आहे. महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये संक्रमणाचे प्रमाण कमी झालेआहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSchoolशाळा