शिष्यवृत्ती परीक्षेची इयत्ता बदलली (पान १)
By Admin | Updated: June 25, 2015 23:51 IST2015-06-25T23:51:05+5:302015-06-25T23:51:05+5:30
शिष्यवृत्ती परीक्षेची इयत्ता बदलली

शिष्यवृत्ती परीक्षेची इयत्ता बदलली (पान १)
श ष्यवृत्ती परीक्षेची इयत्ता बदलली-आता ५ वी आणि ८वीला परीक्षा : शिक्षण हक्क कायद्यामुळे बदलमुंबई - शिक्षण हक्क कायद्यातील (आरटीआय) तरतुदी विचारात घेऊन पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या इयत्तेत बदल करण्यात आला आहे. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आता ४थी ऐवजी ५ वी तर माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा ७ वी ऐवजी ८ वी मध्ये घेण्यात येणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली.शिक्षण हक्क कायद्यानुसार शालांतस्तरावरील गट बदलण्यात आले आहेत. या नव्या बदलानुसार आता इ. १ ली ते पाचवीपर्यंत प्राथमिक, इयत्ता ६ वी ते ८वीपर्यंत उच्च प्राथमिक, तर इयत्ता ९ वी ते १० वी माध्यमिक अशी तीन गटात शालांत शिक्षणाची विभागणी करण्यात आली आहे.या बदलामुळे शालेयस्तरावरील शिष्यवृत्ती परीक्षेतही बदल करण्यात आला आहे. शिष्यवृत्तीची परीक्षा इ. ५ वी व इ. ८ वी मध्ये होणे अपेक्षित आहे. पण २०१५ -१६ या शैक्षणिक वर्षात जर ही परीक्षा घेतली तर या वर्षीच्या विद्यार्थ्यांनी इ. ४ थी आणि इ. ७ वीची शिष्यवृत्ती परीक्षा यापूर्वीच दिली आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागेल. म्हणून शैक्षणिक वर्ष २०१६-१७ मध्ये शिष्यवृत्ती परीक्षा घेणे योग्य होईल, असे तावडे यांनी केंद्र सरकारला सुचविले आहे.शिष्यवृत्ती परीक्षेच्या नावातही बदल करण्यात आला असून यापुढे पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती योजना ही आता उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती योजना या नावाने ओळखली जाणार आहे. तसेच या परीक्षा पध्दतीत व अभ्यासक्रमात काही बदल होणे गरजेचे आहे, असे अनेक शिक्षण तज्ज्ञांचे मत आहे. त्यासाठी एक शिक्षण समिती नेमण्यात येईल. त्यांच्या सूचनानुसार परीक्षाविषयक मार्गदर्शन या डिसेंबर २०१५ पयंर्त करण्यात येईल असेही तावडे यांनी स्पष्ट केले. (विशेष प्रतिनिधी)