शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मोदी सरकारचं 'दलित कार्ड'; SC-STच्या पदोन्नतीतील आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टाला साद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2018 19:03 IST

एससी-एसटी समुदाय हजार वर्षांपासून मागास असल्याची केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती

नवी दिल्ली : पदोन्नतीमधील आरक्षणाशी संबंधित 12 वर्षांपूर्वीच्या निकालावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. 2006 मधील नागराज प्रकरणात देण्यात आलेल्या निर्णयामुळे अनुसूचित जाती आणि जमातींना पदोन्नतीमध्ये मिळणारं आरक्षण थांबलं, असं केंद्र सरकारनंसर्वोच्च न्यायालयाला सांगितलं. केंद्र सरकारतर्फे महाधिवक्ते के. के. वेणुगोपाल यांनी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली. अनुसूचित जाती आणि जमातींना पदोन्नतीमध्ये आरक्षण देणं योग्य की अयोग्य, यावर केंद्र सरकारला भाष्य करायचं नाही. मात्र अनुसूचित जाती आणि जमाती 1 हजारहून अधिक वर्षांपासून अन्याय सहन करत आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं या निकालाची समीक्षा करावी, असं वेणुगोपाल यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं. 'अनुसूचित जाती आणि जमातींना आजही अन्याय सहन करावा लागतो. त्यामुळे 2006 मध्ये देण्यात आलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे. हा समाज आधीपासूनच मागासलेला असल्यानं त्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यासाठी माहितीची आवश्यकता नाही,' अशा शब्दांमध्ये महाधिवक्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात सरकारची बाजू मांडली. 

अनुसूचित जाती आणि जमातीच्या आधारे नोकरी मिळालेल्या व्यक्तींना त्याच आधारावर पदोन्नती द्यायची असल्यास पुन्हा माहिती गरज काय?, असा प्रश्न महाधिवक्त्यांनी उपस्थित केला. यावर भाष्य करताना सर्वोच्च न्यायालयानं माहिती आणि आकडेवारीची आवश्यकता असल्याचं म्हटलं. सरकारी सेवेत अनुसूचित आणि जमातींना पुरेसं प्रतिनिधीत्व मिळत नाही, हे आकडेवारीवरुन स्पष्ट होईल, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार