शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

मोदी सरकारचं 'दलित कार्ड'; SC-STच्या पदोन्नतीतील आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टाला साद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2018 19:03 IST

एससी-एसटी समुदाय हजार वर्षांपासून मागास असल्याची केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती

नवी दिल्ली : पदोन्नतीमधील आरक्षणाशी संबंधित 12 वर्षांपूर्वीच्या निकालावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. 2006 मधील नागराज प्रकरणात देण्यात आलेल्या निर्णयामुळे अनुसूचित जाती आणि जमातींना पदोन्नतीमध्ये मिळणारं आरक्षण थांबलं, असं केंद्र सरकारनंसर्वोच्च न्यायालयाला सांगितलं. केंद्र सरकारतर्फे महाधिवक्ते के. के. वेणुगोपाल यांनी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली. अनुसूचित जाती आणि जमातींना पदोन्नतीमध्ये आरक्षण देणं योग्य की अयोग्य, यावर केंद्र सरकारला भाष्य करायचं नाही. मात्र अनुसूचित जाती आणि जमाती 1 हजारहून अधिक वर्षांपासून अन्याय सहन करत आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं या निकालाची समीक्षा करावी, असं वेणुगोपाल यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं. 'अनुसूचित जाती आणि जमातींना आजही अन्याय सहन करावा लागतो. त्यामुळे 2006 मध्ये देण्यात आलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे. हा समाज आधीपासूनच मागासलेला असल्यानं त्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यासाठी माहितीची आवश्यकता नाही,' अशा शब्दांमध्ये महाधिवक्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात सरकारची बाजू मांडली. 

अनुसूचित जाती आणि जमातीच्या आधारे नोकरी मिळालेल्या व्यक्तींना त्याच आधारावर पदोन्नती द्यायची असल्यास पुन्हा माहिती गरज काय?, असा प्रश्न महाधिवक्त्यांनी उपस्थित केला. यावर भाष्य करताना सर्वोच्च न्यायालयानं माहिती आणि आकडेवारीची आवश्यकता असल्याचं म्हटलं. सरकारी सेवेत अनुसूचित आणि जमातींना पुरेसं प्रतिनिधीत्व मिळत नाही, हे आकडेवारीवरुन स्पष्ट होईल, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार