शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

SC, ST च्या बढत्यांसाठी आरक्षण: २०१८ च्या निर्णयाचा पुनर्विचार नाही: सुप्रीम कोर्टाने केले स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2021 09:17 IST

सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती; आदेश कसे लागू करायचे हे आता राज्यांनी ठरवायचे

लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली : सरकारी नोकऱ्यांमध्ये अनुसूचित जाती-जमातीच्या कर्मचाऱ्यांच्या बढती प्रक्रियेतील आरक्षणासंदर्भात २०१८ साली दिलेल्या निर्णयाचा फेरविचार करणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. 

सर्वोच्च न्यायालयाचे न्या.  नागेश्वर राव, न्या. संजीव खन्ना, न्या. भूषण गवई यांच्या खंडपीठाने यासंदर्भात तोंडी स्वरूपात मत व्यक्त केले. न्यायालयाने म्हटले आहे की, आम्ही दिलेले आदेश कसे लागू करायचे हे आता राज्यांनी ठरवायचे आहे. कोणाला मागास मानले जावे याबद्दलचे आदेश आम्ही दिले आहेत. या गोष्टींचे धोरण कसे ठरवावे या खोलात न्यायालय जाऊ इच्छित नाही. २०१८ साली जर्नेलसिंग खटल्यामध्ये दिलेल्या निकालाचा सर्वोच्च न्यायालय फेरविचार करणार नाही. 

२०१८ च्या निर्णयाची अंमलबजावणी करताना उद्भवणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी विविध राज्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत.  या निर्णयाची अंमलबजावणी करताना काही गुंते निर्माण झाले असून, त्यामुळे अनेक नियुक्त्या रखडल्या आहेत असेही विविध राज्यांनी आपल्या याचिकांत म्हटले आहे. या याचिकांची तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केंद्र व राज्य सरकारांनी केली होती. 

सर्वोच्च न्यायालयाने याआधी दिलेल्या दोन निर्णयांबद्दल मतभेद व्यक्त करणाऱ्या काही याचिका जर्नेलसिंग खटल्याच्या वेळी दाखल झाल्या होत्या. त्यातील पहिला निर्णय दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिला होता. एम. नागराजविरुद्ध केंद्र सरकार या खटल्यात २००६ साली सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या अचूकतेबद्दल तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने निर्णय दिला होता.

५० टक्क्यांची मर्यादा ओलांडू नका

- नागेश्वर खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की, सरकारी नोकरीत एससी, एसटी यांच्या बढती प्रक्रियेत राखीव जागा ठेवण्यास राज्य सरकारे बांधील नाहीत. मात्र त्यांना ही गोष्ट लागू करायची असल्यास त्या विशिष्ट समुहाच्या कर्मचाऱ्यांचे सरकारी नोकरीत अपुरे प्रमाण किती आहे याची आकडेवारी राज्यांनी सादर करायला हवी. त्यानुसार मग राखीव जागा ठेवाव्यात. त्यासाठी कलम ३५५ मधील तरतुदींचे पालन केले जावे. मात्र ते करताना राखीव जागांची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली जाणार नाही याचे भान राज्यांनी ठेवावे. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय