शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

SC, ST च्या बढत्यांसाठी आरक्षण: २०१८ च्या निर्णयाचा पुनर्विचार नाही: सुप्रीम कोर्टाने केले स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2021 09:17 IST

सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती; आदेश कसे लागू करायचे हे आता राज्यांनी ठरवायचे

लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली : सरकारी नोकऱ्यांमध्ये अनुसूचित जाती-जमातीच्या कर्मचाऱ्यांच्या बढती प्रक्रियेतील आरक्षणासंदर्भात २०१८ साली दिलेल्या निर्णयाचा फेरविचार करणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. 

सर्वोच्च न्यायालयाचे न्या.  नागेश्वर राव, न्या. संजीव खन्ना, न्या. भूषण गवई यांच्या खंडपीठाने यासंदर्भात तोंडी स्वरूपात मत व्यक्त केले. न्यायालयाने म्हटले आहे की, आम्ही दिलेले आदेश कसे लागू करायचे हे आता राज्यांनी ठरवायचे आहे. कोणाला मागास मानले जावे याबद्दलचे आदेश आम्ही दिले आहेत. या गोष्टींचे धोरण कसे ठरवावे या खोलात न्यायालय जाऊ इच्छित नाही. २०१८ साली जर्नेलसिंग खटल्यामध्ये दिलेल्या निकालाचा सर्वोच्च न्यायालय फेरविचार करणार नाही. 

२०१८ च्या निर्णयाची अंमलबजावणी करताना उद्भवणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी विविध राज्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत.  या निर्णयाची अंमलबजावणी करताना काही गुंते निर्माण झाले असून, त्यामुळे अनेक नियुक्त्या रखडल्या आहेत असेही विविध राज्यांनी आपल्या याचिकांत म्हटले आहे. या याचिकांची तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केंद्र व राज्य सरकारांनी केली होती. 

सर्वोच्च न्यायालयाने याआधी दिलेल्या दोन निर्णयांबद्दल मतभेद व्यक्त करणाऱ्या काही याचिका जर्नेलसिंग खटल्याच्या वेळी दाखल झाल्या होत्या. त्यातील पहिला निर्णय दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिला होता. एम. नागराजविरुद्ध केंद्र सरकार या खटल्यात २००६ साली सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या अचूकतेबद्दल तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने निर्णय दिला होता.

५० टक्क्यांची मर्यादा ओलांडू नका

- नागेश्वर खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की, सरकारी नोकरीत एससी, एसटी यांच्या बढती प्रक्रियेत राखीव जागा ठेवण्यास राज्य सरकारे बांधील नाहीत. मात्र त्यांना ही गोष्ट लागू करायची असल्यास त्या विशिष्ट समुहाच्या कर्मचाऱ्यांचे सरकारी नोकरीत अपुरे प्रमाण किती आहे याची आकडेवारी राज्यांनी सादर करायला हवी. त्यानुसार मग राखीव जागा ठेवाव्यात. त्यासाठी कलम ३५५ मधील तरतुदींचे पालन केले जावे. मात्र ते करताना राखीव जागांची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली जाणार नाही याचे भान राज्यांनी ठेवावे. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय