शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

विजय मल्ल्याप्रकरणी हलगर्जीपणा केल्याचा एसबीआयने केला इन्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2018 23:26 IST

फेब्रुवारी २0१६ मध्ये सर्वोच्च न्यायालयात जाऊन विजय मल्ल्या याच्या विदेश गमनावर कायदेशीर बंधन आणण्याचा सल्ला एसबीआयला देण्यात आला होता.

नवी दिल्ली : आर्थिक घोटाळा करून फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्याच्या मालकीच्या किंगफिशर एअरलाइन्सला दिलेल्या कर्जाशी संबंधित खटल्यात आपल्याकडून कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा झाल्याचा स्टेट बँक आॅफ इंडियाने (एसबीआय) इन्कार केला आहे.किंगफिशर एअरलाइन्सला कर्ज देणाऱ्या बँक समूहाचे नेतृत्व एसबीआयनेच केलेले आहे. किंगफिशरचे कर्ज थकल्यानंतर विजय मल्ल्या विदेशात पळून जाऊ शकतो, अशी भीती त्यावेळी जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत होती. याची दखल घेत फेब्रुवारी २0१६ मध्ये सर्वोच्च न्यायालयात जाऊन विजय मल्ल्या याच्या विदेश गमनावर कायदेशीर बंधन आणण्याचा सल्ला एसबीआयला देण्यात आला होता. परंतु तो सल्ला एसबीआयने मानला नाही.२ मार्च २0१६ रोजी विजय मल्ल्याने भारत सोडला. तो विदेशात पळून गेल्यानंतर चार दिवसांनी बँकेने या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका करून त्याला विदेशी जाण्यापासून रोखण्यात यावे, अशी विनंती केली. एसबीआयच्या या भूमिकेकडे संशयाच्या नजरेतून पाहिले जात आहे.याप्रकरणी एसबीआयने एक निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. त्यात म्हटले आहे की, किंगफिशर एअरलाइन्ससह विजय मल्ल्यायांच्या विरोधातील सर्व कर्ज थकबाकीच्या प्रकरणात बँकेकडून अथवा बँकेच्या अधिकाºयांकडून कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा झालेला नाही. विजय मल्ल्याने भारतातील १७ बँकांच्या समूहाचे तब्बल ९ हजार कोटी रुपयांचे कर्ज थकविले आहे. त्यावरून त्याच्याविरुद्ध अनेक खटले सुरू आहेत.थकबाकी असताना कर्ज कसे दिले?विजय मल्ल्या यांनी कर्जाच्या थकबाकीस आपण एकटेच जबाबदार नसून कर्ज देणाºया बँकाही जबाबदार आहेत, असा आरोप केला आहे. आपल्या कंपन्यांची स्थिती बँकांना माहिती होती.तरीही कर्जथकबाकीप्रकरणी आपल्याला एकट्यालाच जबाबदार धरून बँकांनी आपल्याला ‘पोस्टर बॉय’ केले आहे, असे मल्ल्या यांनी म्हटले आहे. दरम्यान, मल्ल्या यांना कर्ज दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानेही बँकांवर ताशेरे आढले आहेत. आधीची कर्जे थकलेली असताना मल्ल्या यांना पुन्हा कर्ज कसे काय दिले गेले, असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला आहे.

टॅग्स :Vijay Mallyaविजय मल्ल्याSBIएसबीआय