शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

चीनचे नाव घेऊन सांगतो, घाबरत नाही; परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 08:20 IST

जर तुम्ही माहितीपट पाहत असाल तर १९८४ मध्ये दिल्लीत बरेच काही घडले होते.

नवी दिल्ली : चीनचे नाव घेऊन सांगतो, आम्ही घाबरत नाही. जर घाबरत असतो तर सीमेवर सैन्य तैनात केले नसते. हे सैन्य राहुल गांधींनी नव्हे तर नरेंद्र मोदींनी तैनात केले आहे, असे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटले आहे. काँग्रेसने पाहावे की १९६२ मध्ये काय झाले होते. लडाखमधील पँगाँगजवळील परिसर १९६२ पासून चीनने जबरदस्तीने बळकावला असल्याचेही त्यांनी म्हटले.

एका मुलाखतीत जयशंकर म्हणाले की, तुम्ही विचार करा. अचानक इतके अहवाल का येत आहेत, हे सर्व आधी का होत नव्हते. जर तुम्ही माहितीपट पाहत असाल तर १९८४ मध्ये दिल्लीत बरेच काही घडले होते. त्या घटनेवरचा माहितीपट का बघायला मिळाला नाही. सर्व काही षडयंत्र रचू्न केले जात आहे. बीबीसी डॉक्युमेंटरी आणि जॉर्ज सोरोस यांच्या विधानाची वेळ योगायोग नाही. याचा सरळ अर्थ असा की, भारतात निवडणुकीचा हंगाम सुरू झाला नसला तरीही लंडन आणि न्यूयॉर्कमध्ये निवडणूक हंगाम आला आहे.

‘पाकिस्तानात जे काही चाललेय, त्याला भारत जबाबदार नाही’पाकिस्तानची आर्थिक स्थिती बिघडली आहे, त्याचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला असता ते म्हणाले की, पाकिस्तानचे भवितव्य त्यांच्या स्वतःच्या कृती आणि निवडीनुसार ठरवले जाईल. अशा परिस्थितीत कोणीही अपघाताने पोहोचत नाही. त्यांच्यावर अशी वेळ का आली हे समजून घेणे त्यांचे काम आहे. सध्या पाकिस्तानमध्ये काय चालले आहे, त्याचा भारताशी काहीही संबंध नाही.

टॅग्स :chinaचीनIndiaभारत