शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

चीनचे नाव घेऊन सांगतो, घाबरत नाही; परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 08:20 IST

जर तुम्ही माहितीपट पाहत असाल तर १९८४ मध्ये दिल्लीत बरेच काही घडले होते.

नवी दिल्ली : चीनचे नाव घेऊन सांगतो, आम्ही घाबरत नाही. जर घाबरत असतो तर सीमेवर सैन्य तैनात केले नसते. हे सैन्य राहुल गांधींनी नव्हे तर नरेंद्र मोदींनी तैनात केले आहे, असे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटले आहे. काँग्रेसने पाहावे की १९६२ मध्ये काय झाले होते. लडाखमधील पँगाँगजवळील परिसर १९६२ पासून चीनने जबरदस्तीने बळकावला असल्याचेही त्यांनी म्हटले.

एका मुलाखतीत जयशंकर म्हणाले की, तुम्ही विचार करा. अचानक इतके अहवाल का येत आहेत, हे सर्व आधी का होत नव्हते. जर तुम्ही माहितीपट पाहत असाल तर १९८४ मध्ये दिल्लीत बरेच काही घडले होते. त्या घटनेवरचा माहितीपट का बघायला मिळाला नाही. सर्व काही षडयंत्र रचू्न केले जात आहे. बीबीसी डॉक्युमेंटरी आणि जॉर्ज सोरोस यांच्या विधानाची वेळ योगायोग नाही. याचा सरळ अर्थ असा की, भारतात निवडणुकीचा हंगाम सुरू झाला नसला तरीही लंडन आणि न्यूयॉर्कमध्ये निवडणूक हंगाम आला आहे.

‘पाकिस्तानात जे काही चाललेय, त्याला भारत जबाबदार नाही’पाकिस्तानची आर्थिक स्थिती बिघडली आहे, त्याचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला असता ते म्हणाले की, पाकिस्तानचे भवितव्य त्यांच्या स्वतःच्या कृती आणि निवडीनुसार ठरवले जाईल. अशा परिस्थितीत कोणीही अपघाताने पोहोचत नाही. त्यांच्यावर अशी वेळ का आली हे समजून घेणे त्यांचे काम आहे. सध्या पाकिस्तानमध्ये काय चालले आहे, त्याचा भारताशी काहीही संबंध नाही.

टॅग्स :chinaचीनIndiaभारत