शहरं
Join us  
Trending Stories
1
२०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा
2
आजचे राशीभविष्य २१ ऑक्टोबर २०२५ : धनप्राप्ती होईल, लक्ष्मी पुजनाच्या दिवशी कोणाच्या राशीत काय लिहिलेय...
3
लष्करातील समन्वयामुळे पाकिस्तानने गुडघे टेकले; PM मोदी यांचे भारतीय सैन्याबद्दल कौतुकोद्गार
4
भारत नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाच्या उंबरठ्यावर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास
5
आता उद्धव ठाकरे म्हणाले... मी पुन्हा येईन, महापालिकेवर भगवा फडकवीन; मतांची चोरी पकडली
6
'हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं'... डायलॉग अजरामर करणारे अभिनेते असरानी कालवश
7
महसूलमधील ‘पदोन्नती’चा अनुशेष तीन महिन्यांत भरणार; ४७ अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट
8
महाराष्ट्र देशात अव्वल; पण ‘माहितीचा अधिकार’ अधांतरी, चार लाखांहून अधिक अपिले रखडली
9
बिहार निवडणूक २०२५: काँग्रेसची विचित्र स्थिती, उमेदवारी वाटपात गोंधळ; जुनी पोस्ट व्हायरल, अन्…
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली पुन्हा धमकी; रशियाकडून तेल आयात थांबवा अन्यथा...
11
मुंबईमध्ये दिवाळीच्या धामधुमीत ३ दिवसांत आगीच्या २५ घटना; वाहन बॅटरीचा स्फोट, एकाचा मृत्यू
12
ऐन दिवाळीत थंडी गायब; अजून काही दिवस उष्म्याचे, इतक्यात तरी पारा घसरायची चिन्हे नाहीत! 
13
लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला चांदी एक हजाराने स्वस्त; सोनेही घटले 
14
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
15
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
16
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
17
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
18
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
19
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
20
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा

"देश वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करायला हवे"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2019 06:41 IST

सोनिया गांधी । काँग्रेसचे विराट मेळाव्याद्वारे राजधानीत शक्तिप्रदर्शन

नवी दिल्ली : अर्थव्यवस्था, कायदा सुव्यवस्था, बेरोजगारी या परिस्थितीमुळे देशातील वातावरण ‘अंधेर नगरी चौपट राजा’प्रमाणे झाले आहे. त्यामुळे देश वाचविण्यासाठी लोकांनी घराबाहेर येऊ न आंदोलन करायला हवे, असे आवाहन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी शनिवारी दिल्लीच्या रामलीला मैदानात केले. काँग्रेसने आयोजित केलेल्या ‘भारत बचाव’ मेळाव्याला देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो लोक आले होते.

‘तरुणांच्या नोकºयाही जात आहेत. शेतकºयाचे जगणे कठीण झाले आहे, असे सांगून त्या म्हणाल्या की, पंतप्रधान मोदींच्या चुकीच्या धोरणांमुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. देशाचा खजिना रिकामा आहे, तरीही मोदी-शहा हेच ‘अच्छे दिन’ असल्याचे सांगतात. ‘सबका साथ, सबका विकास’ कुठे आहे? मजबूत अर्थव्यवस्था कुठे आहे? काळा पैसा कुठे गेला? या सर्वांची चौकशी व्हायला हवी.यावेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमल नाथ, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेशबघेल यांच्यासह सर्व नेते उपस्थित  होते. मुकुल वासनिक यांच्या नेतृत्वाखाली मेळाव्याचे आयोजन केले होते. उपस्थितांनी राहुल गांधी यांचा जल्लोष केला. ती गर्दी, घोषणा पाहून त्यांनी मुकुल वासनिक यांना पुढे बोलावून त्यांचे कौतुक केले.भारताच्या शत्रूंनी नव्हे, तर पंतप्रधानांनी अर्थव्यवस्थेचे तीनतेरा वाजविले आहेत. त्यांनी पंधरा ते वीस मोठ्या उद्योगपतींचे ६० हजार कोटींचे कर्ज माफ केले. जनतेच्या खिशाला कात्री लावायची आणि दुसरीकडे उद्योगपतींचे कर्ज माफ करायचे, असे मोदींचे धोरण आहे. - राहुल गांधीमोदी यांनी २०२४पर्यंत भारतात ‘५ ट्रिलीयन’ अर्थव्यवस्था असेल, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढेल आणि दोन कोटी नव्या नोकºया देऊ, अशी आश्वासने त्यांनी दिली, पण कुठलेही आश्वासन ते पूर्ण करू शकले नाहीत. - डॉ. मनमोहन सिंगसध्याच्या परिस्थितीत लढा न देणाºया लोकांना भविष्यात भ्याड ठरविले जाईल. राज्यघटना धोक्यात असताना आपल्याला आवाज उठवावाच लागेल. देशावर प्रेम असेल, तर आवाज बुलंद करा. आज शांत बसलो, तर उद्या राज्यघटनेचे अस्तित्व नष्ट झालेले दिसेल. देशाचे विभाजन सुरू होईल आणि भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या पापासाठी आपण जबाबदार ठरू.- प्रियांका गांधी

 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेस