शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

Satyapal Malik : PM नरेंद्र मोदींचा मार्ग योग्यच, सत्यपाल मलिकांनी घेतला यु-टर्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 14:56 IST

Satyapal Malik : मलिक यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना मोदींसंदर्भातील विधानावरुन युटर्न घेतला आहे. मोदी हे योग्य मार्गावर आहेत, असे म्हणत शेती विधेयक परत घेतल्याच्या निर्णयाचे स्वागत करत असल्याचे सत्यपाल मलिक यांनी म्हटले

ठळक मुद्देमलिक यांच्या विधानानंतर आरोप-प्रत्यारोपांना सुरूवात झाली. या भेटीनंतर काय झाले, त्याविषयीही त्यांनी सांगितले. मी नेहमीच पंतप्रधानांचे म्हणणे, विचार जनतेपर्यंत पोहोचवत आलोय.

नवी दिल्ली - शेतकऱ्यांचे आंदोलन वर्षभर सुरु होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत (PM Narendra Modi) माझी भेट झाली तेव्हा ते खूप अहंकारात होते. ५ मिनिटांत माझ्यात आणि त्यांच्यात वाद झाला. ते खूप गर्विष्ठ आहेत. जेव्हा मी त्यांना सांगितले आमचे ५०० जण मृत्यू पावलेत, तेव्हा माझ्यासाठी मेलेत का? असा प्रश्न त्यांनी केला, असे खळबळजनक विधान मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी केला होता. मलिक यांनी आता आपल्या विधानावरुन सारवासारव केली आहे. 

मलिक यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना मोदींसंदर्भातील विधानावरुन युटर्न घेतला आहे. मोदी हे योग्य मार्गावर आहेत, असे म्हणत शेती विधेयक परत घेतल्याच्या निर्णयाचे स्वागत करत असल्याचे सत्यपाल मलिक यांनी म्हटले. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आणि अमित शहांचे संबंध अतिशय चांगले आहेत, शहा यांनी मोदींबाबत काहीही विधान केले नाही. शहांनी मोदींबद्दल केलेल्या विधानाच्या, माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला, असेही मलिक यांनी म्हटले. दरम्यान, सत्यपाल यांनी अमित शहांची भेट घेतल्यानंतर, मोदींना काही लोकांनी चुकीची माहिती दिली आहे, आपण त्यांना भेटत जावे, एकदिवस त्यांना सर्वकाही समजेल, असे अमित शहांनी बोलताना म्हटल्याचे मलिक यांनी सांगितले होते. मात्र, आता त्यांनी युटर्न घेतला आहे. 

मलिक यांच्या विधानानंतर आरोप-प्रत्यारोपांना सुरूवात झाली. या भेटीनंतर काय झाले, त्याविषयीही त्यांनी सांगितले. मी नेहमीच पंतप्रधानांचे म्हणणे, विचार जनतेपर्यंत पोहोचवत आलोय. जेव्हा मी त्यांना भेटलो. तेव्हा ते खूप हट्टीपणा दाखवत होते. पंतप्रधान मोदींच्या सांगण्यावरून मी अमित शाह यांना भेटलो. अमित शाह पंतप्रधान मोदींचा खूप सन्मान आणि आदर करतात, असे म्हणाले. 

मोदींना भेटायची हिंमत झाली नाही

पंतप्रधान मोदी यांच्या भेटीत झालेल्या प्रकारानंतर पुन्हा त्यांना भेटायची माझी हिंमत झाली नाही. तुम्ही आमच्यासाठी योग्य व्यक्ती नाही, असे मला सांगितले असते, तर एका मिनिटात राज्यपालपद सोडले असते. तशी मनाची तयारी मी केली होती, असे सत्यपाल मलिक यांनी स्पष्ट केले. भाजप नेत्यांचे गावागावांमध्ये जाणे कठीण झाले होते. उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात कोणताही मंत्री जाऊ शकत नव्हता. तेथील जनता पंतप्रधानांचा खूप आदर करते, ही बाब वेगळी आहे. मात्र, हरियाणामध्ये तर मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर उतरू दिले नाही.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरीAmit Shahअमित शाह