शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

‘संस्कारांचे मोती’ हवाई सफर : प्रथमच विमानात बसण्याचा विद्यार्थ्यांचा अविस्मरणीय अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 04:46 IST

उंचच उंच आकाशात झेपावण्याची उत्सुकता. एरव्ही जमिनीवरून छोटे वाटणारे भव्य विमान प्रत्यक्षात डोळ्यात साठविण्याची लगबग.

नवी दिल्ली : उंचच उंच आकाशात झेपावण्याची उत्सुकता. एरव्ही जमिनीवरून छोटे वाटणारे भव्य विमान प्रत्यक्षात डोळ्यात साठविण्याची लगबग. मुंबईहून दिल्लीपर्यंतची हवाई सफर. विमानात बसल्यावर खिडकीतून दिसणारे ढगांचे अपूर्व आकार. सारे काही डोळ्यात सामावून घेत होतो आम्ही. विमान उड्डाण घेताना नि उतरताना थोडीशी भीतीही वाटली. दिल्लीत राष्ट्रपती भवन पाहिले, मोठ्या नेत्यांना भेटलो; पण आम्हाला सर्वात अविस्मरणीय अनुभव होता- आयुष्यात पहिल्यांदा विमानात बसण्याचा.लोकमत ‘संस्कारांचे मोती’ हवाई सफर स्पर्धेतील विजेते विद्यार्थी हेच अनुभव अतीव उत्साहाने संयोजकांना सांगत होते. ‘लोकमत’च्या आगळ्यावेगळ्या संस्कारांचे मोती सफरीचे केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी, मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी कौतुक केले.वाणिज्य मंत्रालयातील अतिरिक्त महासंचालक मोनादीपा मुखर्जी (आयआयएस) यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मोबाईल हे शस्त्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाती तलवार आली, त्यांनी स्वराज्य उभारले. माकडाच्या हाती तलवार आली, तर तो स्वत:चाच नाश करतो. त्यामुळे लहान वयात मुलांना मोबाईल देणे योग्य नसल्याचे त्या म्हणाल्या. विशेष म्हणजे हवाई सफरीतील सर्व विद्यार्थ्यांकडे मोबाईल होते. त्यावर मुखर्जी म्हणाल्या, या वयात मोबाईल वापरणे चूक आहे. पालकांनीदेखील आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. गाव व नावासह त्यांनी विद्यार्थ्यांची ओळख करून घेतली.हवाई सफरीचे नियोजन लोकमतचे सहायक उपाध्यक्ष (वितरण) वसंत आवारे, विजय काळसेकर, संजय पाटील, गजेंद्र बैस, सचिन देवधरे, गंगाधर पठाडे यांनी केले. हवाई सफरीतील विजेत्यांनी राष्ट्रपती भवन, इंडियागेट, इंदिरा गांधी स्मृती भवन, वॉर मेमोरिअल आणि रेल्वे संग्रहालयास भेट दिली.समस्या सोडविण्यासाठी काम करा -गडकरीमहाराष्ट्र व गोवा राज्यांतील कानाकोपऱ्यातून आलेल्या या विद्यार्थ्यांनी दिल्लीत विविध ठिकाणांना भेट दिली. लोकमतवरील अतीव विश्वासामुळेच आम्हाला पालकांनी इतक्या दूर दिल्लीला हवाई सफरीसाठी पाठविल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. त्यांचे अनुभव ऐकल्यावर नितीन गडकरी यांनी ‘लोकमत’च्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.छोट्या गावातील मुला-मुलींना हवाई सफरीचे बक्षीस मिळवून देणाºया लोकमत ‘संस्कारांचे मोती’ उपक्रमाची त्यांनी माहिती घेतली व या उपक्रमास शुभेच्छाही दिल्या. देशाच्या विकासासाठी सदैव प्रयत्न करा. आपल्या सभोवतालच्या समस्या समजून घ्या, त्या सोडविण्यासाठी काम करा, असा संदेश केंद्र्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी विद्यार्थ्यांना दिला.यशाची त्रिसूत्रीचारित्र्य, कठोर परिश्रम व प्रामाणिकपणाला पर्याय नाही. यशस्वी होण्याची हीच तीन सूत्रे असल्याचा कानमंत्र केंद्रीय दूरसंचार, तसेच मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी मुलांना दिला. जे काम कराल ते उत्तम करा, सचोटीने करा, असे आवाहनही त्यांनी केले. 

टॅग्स :Studentविद्यार्थीMaharashtraमहाराष्ट्र