शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
2
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
5
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
6
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
7
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
8
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
9
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
10
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
11
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
12
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
13
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
14
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
15
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
16
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
17
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
18
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
19
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
20
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

संदेशखाली प्रकरण: उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात बंगाल सरकारची सर्वोच्च न्यायालयात धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 17:23 IST

संदेशखाली येथे ईडीच्या अधिकाऱ्यांवर ५ फेब्रुवारीला हल्ला झाला होता

Mamata Banerjee, Sandeshkhali Case in Supreme Court: संदेशखाली प्रकरणातील सीबीआय तपासाच्या कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात दाखल करण्यात आलेल्या अपीलवर पश्चिम बंगाल सरकारने सर्वोच्च न्यायालयात लवकर सुनावणी घेण्याची मागणी केली. राज्य सरकारतर्फे ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात मांडला. या प्रकरणाची तातडीने सुनावणी झाली पाहिजे, असे ते म्हणाले. संदेशखाली येथे ईडीच्या अधिकाऱ्यांवर ५ फेब्रुवारी रोजी झालेल्या हल्ल्याचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने दिला होता. या निर्णयाला पश्चिम बंगाल सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

सीबीआय तपासाविरोधात याचिका

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी याचिकाकर्त्याला सांगितले की, अर्ज दाखल करण्यात आला आहे. सरन्यायाधीश लंच समन्सवर लवकर सुनावणीसाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे या याचिकेवर सुनावणीचे आदेश देणार आहेत. तत्पूर्वी, सिंघवी यांनी या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात राज्य सरकारच्या अपीलावर तातडीने सुनावणी करण्याची गरज असल्याचा युक्तिवाद केला. मंगळवारी, राज्य सरकारच्या अर्जावर, सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला हे प्रकरण रजिस्ट्रारसमोर मांडण्यास सांगितले होते.

तात्काळ सुनावणीसाठी नकार

मंगळवारी सुप्रीम कोर्टात पश्चिम बंगाल सरकारच्या वतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर हा मुद्दा मांडला होता. सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याची गरज असल्याचे आवाहन केले. सर्वोच्च न्यायालयाने तातडीच्या सुनावणीसाठी हे प्रकरण यादीत घेण्यास नकार दिला आणि राज्य सरकारचे वकील सिंघवी यांना रजिस्ट्रारसमोर या प्रकरणाचा उल्लेख करण्यास सांगण्यात आले.

दरम्यान, या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. ईडी आणि पश्चिम बंगाल सरकारने उच्च न्यायालयाच्या एकल खंडपीठाच्या आदेशाला आव्हान देत उच्च न्यायालयाच्या मोठ्या खंडपीठाकडे धाव घेतली. एकल खंडपीठाने ईडी अधिकाऱ्यांवर जमावाने केलेल्या हल्ल्याची चौकशी करण्यासाठी सीबीआय आणि राज्य पोलिसांच्या संयुक्त विशेष पथकाची मागणी केली होती. ईडीला फक्त सीबीआय तपास हवा होता. तर राज्य सरकारला राज्य पोलिसांकडून तपास हवा होता. उच्च न्यायालयाने ईडीची विनंती मान्य केली होती. पण आता हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले आहे.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीSupreme Courtसर्वोच्च न्यायालयHigh Courtउच्च न्यायालय