शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

एकाच वेळी 36 वार, अशी आहे एस-400 ची विध्वंसक मारक क्षमता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2018 12:48 IST

भारत आणि रशियामध्ये एस-400 मिसाईल डिफेन्स सिस्टीमच्या खरेदी व्यवहाराबाबत करार होणार आहे. अत्यंत मारक क्षमता असलेली ही मिसाईल डिफेन्स सिस्टिम एकाच वेळी 36 वार करण्यास सक्षम आहे.

नवी दिल्ली - भारत आणि रशियामध्ये एस-400 मिसाईल डिफेन्स सिस्टीमच्या खरेदी व्यवहाराबाबत करार होणार आहे. अत्यंत मारक क्षमता असलेली ही मिसाईल डिफेन्स सिस्टिम एकाच वेळी 36 वार करण्यास सक्षम आहे. त्यामुळे या प्रणालीला जगातील सर्वात अत्याधुनिक मिसाइल डिफेन्स सिस्टीम मानले जाते. भारत या मिसाइल डिफेन्स सिस्टीमच्या पाच रेजिमेंट्सची खरेदी करणार आहे. त्यासाठी सुमारे 5 अब्ज डॉलर म्हणजेच 40 हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. भारत आणि रशियामध्ये होणारा हा करार भारताच्या सर्वात मोठ्या खरेदी करारांपैकी एक ठरणार आहे.  काय आहे एस-400 क्षेपणास्त्र प्रणाली ?एस-400 ही जगातील अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली असून, या प्रणालीमध्ये शत्रूची विमानांना अचूकरीत्या लक्ष्य करण्याचं सामर्थ्य आहे.  एस-400 ला रशियाची अत्याधुनिक लांब पल्ल्याती जमिनीवरून हवेत मारा करणारी मिसाईल डिफेन्स सिस्टीम मानले जाते. ही प्रणाली शत्रूची क्रूझ, विमाने आणि बॅलेस्टिक मिसाईल टिपण्यात सक्षम आहे.  ही प्रणाली रशियाच्याच एस-300 प्रणालीचे आधुनिक रुप आहे. अल्माज आंटे या शास्त्रज्ञाने ही प्रणाली विकसित केली होती. तसेच 2007 पासून एस 400 मिसाईल डिफेन्स सिस्टीम रशियाच्या सेवेत आहे. एकाच वेळी 36 वार करण्याची क्षमता हे या प्रणालीचे वैशिष्ट्य आहे.  गेल्या अनेक वर्षांपासून भारत आणि रशियामध्ये शस्त्रास्त्र करार होत असून, भारत रशियाकडून अत्याधुनिक शस्त्रास्त्र खरेदी करत असतो. काही दिवसांपूर्वी झालेल्या अमेरिकेबरोबर टू प्लस टू बैठकीत एस-400च्या खरेदी व्यवहाराला परवानगी मिळावी, यासाठी भारत प्रयत्नशील होता. परंतु अमेरिकेनं त्याला अजून अधिकृतरीत्या परवानगी दिलेली नाही. मात्र भारत या करारासाठी ठाम आहे. कारण लढाऊ विमानांच्या कमतरतेमुळे भारताची संरक्षण क्षमता कमी झाली आहे. त्या पार्श्वभूमीवरी एस-400 करार भारतासाठी बुस्टर डोसचे काम करेल, असे हवाई दल प्रमुख बी.एस. धनोआ यांनी म्हटले होते.  

टॅग्स :Indiaभारतrussiaरशिया