शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
2
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
3
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
4
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
5
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
6
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
7
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
8
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
9
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
10
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
11
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
12
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
13
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
14
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
15
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
16
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
17
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
18
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
19
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
20
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका

४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 11:34 IST

UP Sambhal Jama Masjid Violence : परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. यासह परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना जारी केली आहे.

UP Sambhal Jama Masjid Violence : उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात रविवारी सकाळी झालेल्या हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. संभल जिल्ह्यातील जामा मशिदीचा सर्व्हे होत असताना हा हिंसाचार झाला. यावेळी संतप्त जमावाने वाहनांची जाळपोळ करण्याचा प्रयत्न केला, तसेच पोलिसांवर दगडफेक केली. यात उपजिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यासह २० जण जखमी झाले आहेत. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि लाठीचार्जही केला. 

परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. यासह परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये कोणत्याही बाहेरील व्यक्ती, सामाजिक संस्था किंवा लोकप्रतिनिधींना अधिकाऱ्यांच्या आदेशाशिवाय परिसरात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी ३० नोव्हेंबरपर्यंत लागू करण्यात आली आहे. एवढेच नाही तर संभल आणि परिसरातील शाळा २५ नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत.

संभलमध्ये उसळलेल्या हिंसाचारात चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये नईम, बिलाल अन्सारी, नौमान आणि मोहम्मद कैफ अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. दरम्यान, काही समाजविघातक घटकांनी गोळीबार केला. पोलिस अधीक्षकांच्या जनसंपर्क अधिकाऱ्याच्या पायाला गोळी लागली आहे. तर या हिंसाचारात १५ ते २० पोलीस जखमी झालेत, असे मुरादाबादचे विभागीय आयुक्त अंजनेय कुमार सिंह यांनी सांगितले. तसेच, एका हवालदाराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तर उपजिल्हाधिकाऱ्याचा पाय फ्रॅक्चर झाल्याचेही त्यांनी सांगितले. 

भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद संभलला भेट देणार!एकीकडे संभलमध्ये प्रशासनाने बाहेरील व्यक्तींना प्रवेश बंदी घातली आहे. दुसरीकडे, नगीना खासदार आणि भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी जाहीर केले आहे की, ते सोमवारी म्हणजेच आज संभल येथे जाऊन हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना भेटणार आहे. तसेच, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत याप्रकरणी सरकारवर निशाणा साधला आहे.

गोळीबार करून आमच्या लोकांचे प्राण घेतले - चंद्रशेखर आझादचंद्रशेखर आझाद यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत लिहिले की, "सरकारी गोळ्या थेट बहुजनांवर डागल्या आहेत. ही एक मिथक नाही, तर एक कटू सत्य आहे, जे आपल्यापेक्षा चांगले कोणीही समजू शकत नाही. एससी-एसटी आंदोलन असो, शेतकऱ्यांचे आंदोलन असो किंवा सीएए विरोधी आंदोलन असो - प्रत्येक वेळी सरकारच्या इशाऱ्यावर पोलिसांनी नि:शस्त्र आंदोलकांवर थेट गोळीबार करून आमच्या लोकांचे प्राण घेतले आहेत. मी संभलला जाईन आणि या हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना भेटणार आहे. आम्ही आमच्या पीडित कुटुंबांना एकटे सोडणार नाही. संसदेच्या आगामी अधिवेशनात मी सरकारच्या डोळ्यात डोळे घालून म्हणेन की, आपल्या लोकांचा जीव इतका स्वस्त नाही.

काय आहे हे प्रकरण?कैलादेवी मंदिराचे महंत ऋषिराज गिरी महाराज यांनी दावा केला होता की, संभलची शाही मशीद हीच हरिहर मंदिर आहे. महंत ऋषी राज गिरी महाराज यांनी १९ नोव्हेंबरला सिव्हिल कोर्टात एक याचिका दाखल करून मशिदीचा सर्व्हे करण्याची मागणी केली होती. त्यावर न्यायालयाने सात दिवसांच्या आत सर्व्हे करण्याचा आदेश दिला होता. तसेच, सर्व्हे करणाऱ्या टीमला व्हिडिओ आणि फोटोग्राफीसह अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, रविवारी सर्व्हे करणारी टीम मशिदीत पोहोचली होती. त्यावेळी मशिदीच्या बाहेर जमलेल्या जमावाने अचानक पोलिसांवर दगडफेक केली. त्यामुळे याठिकाणी तणाव निर्माण झाला.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशMosqueमशिदPoliceपोलिस