शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

"ICU मध्ये सपा-काँग्रेस, जनता ऑक्सिजन द्यायला तयार नाही..."; भाजपाचा जोरदार पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 15:48 IST

राहुल आणि अखिलेश यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. यावर आता उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी पलटवार केला आहे.

उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. यावेळी राहुल आणि अखिलेश यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. यावर आता उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी पलटवार केला आहे. ते म्हणाले की, राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या पक्षांनी 2017 ची विधानसभा निवडणूक एकत्र लढवली होती, त्यावेळी त्यांची स्थिती चांगली होती, पण आज दोन्ही पक्ष आयसीयूमध्ये आहेत.

केशव केशव प्रसाद मौर्य पुढे म्हणाले की, जनता सपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना ऑक्सिजन द्यायला तयार नाही. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीतील त्यांची विधानं निराधार आहेत. पीएम मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असल्याचे सर्वांनीच स्पष्ट केले आहे. यावेळी केशव मौर्य यांनीही लोकांनी पीएम मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे. 

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने गुरुवारी गाझियाबादमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेतली. याच दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला. राहुल यांनी 15-20 दिवसांपूर्वी मी विचार करत होतो की भाजपा 180 जागा जिंकेल, परंतु आता मला वाटते की त्यांना 150 जागा मिळतील. आम्हाला प्रत्येक राज्यातून रिपोर्ट मिळत आहेत की इंडिया ब्लॉक मजबूत होत आहे. उत्तर प्रदेशमध्ये आमची आघाडी खूप मजबूत आहे आणि आम्ही चांगली कामगिरी करू असं म्हटलं आहे. 

अखिलेश यादव म्हणाले की, यूपीचे लोक आमचं चांगलं स्वागत करतात. यावेळी पाठवणीही अतिशय चांगल्या पद्धतीने होणार आहे. इंडिया आघाडी ही नवी आशा आहे. आपल्या जाहीरनाम्यात गरिबी हटवण्याचे व्हिजन सांगितले आहे. इंडिया आघाडी MSP ची गॅरंटी देण्याचं आश्वासन देत आहेत. पण ज्या दिवशी केंद्र सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवेल, त्याच दिवशी गरिबी कमी होण्यास सुरुवात होईल. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Rahul Gandhiराहुल गांधीAkhilesh Yadavअखिलेश यादवBJPभाजपा