शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Akhilesh Yadav : "जोपर्यंत निवडणुका आहेत, तोपर्यंत भाजपापासून सावध राहा, ते काहीही करू शकतात..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2024 18:17 IST

Akhilesh Yadav : अखिलेश यादव यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने केलेल्या अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे.

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव हे समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांची भेट घेण्यासाठी सीतापूर जेलमध्ये पोहोचले. सपा नेत्याची भेट घेतल्यानंतर अखिलेश यादव यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने केलेल्या अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे. अखिलेश यादव म्हणाले की, "हे सर्व आघाडीला बदनाम करण्यासाठी आणि कमकुवत करण्यासाठी आहे. मात्र इंडिया आघाडीचे सर्व सदस्य ताकदीने लढतील आणि जनतेला न्याय मिळवून देतील."

"भाजपा घाबरली आहे, त्यांना माहीत आहे की जनता त्यांना यावेळी सत्तेवरून दूर करेल. ते घाबरून कारवाई करत आहेत. ते यासाठी ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स याचा वापर करत आहे. जोपर्यंत निवडणुका आहेत, तोपर्यंत भाजपापासून सावध राहा, ते काहीही करू शकतात."

"भाजपा खोट्या खटल्यांचा वर्ड रेकॉर्ड नाही तर ब्रह्मांड रेकॉर्ड करत आहे. फक्त पीडीए जिंकेल, पीडीए एनडीएला हरवेल. सरकार पीडीएला घाबरली आहे. मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये पाठवून त्यांचा लोकशाहीत विजय होणार नाही. हे लोकशाहीला कमकुवत करत आहेत."

"शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले का? महागाई कमी झाली का? तरुणांना रोजगार दिला का? यूपीमध्ये लोक सुरक्षित आहेत का?, वेळ खूप मजबूत आहे आणि अशी वेळ येईल की जनता भाजपालाही धडा शिकवेल. जनता मतदान करण्याचीची संधी मिळण्याची वाट पाहत आहे. मुख्यमंत्र्यांना तुरुंगात पाठवून, बातम्यांवर नियंत्रण ठेवून ते जिंकणार नाहीत" असं अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवArvind Kejriwalअरविंद केजरीवालBJPभाजपाPoliticsराजकारण