शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

सॅल्यूट ! SP मॅडमने रात्री १२ वाजता स्थलांतरीत महिलांसाठी स्वत:च्या घरीच बनवलं जेवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2020 17:52 IST

गावाकडं निघालेले लाखो प्रवासी मजूर हे गाडीचा वाट न पाहता चालतच मैलों मैल अंतर कापत आहेत. एका राज्यातून दुसऱ्या राज्यातील तिसऱ्या जिल्ह्याचा प्रवास पायीच पूर्ण करण्याचा प्रयत्न होत आहे.

हैदराबाद - कोरोनानंतर देशभरात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे पदोपदी माणूसकीचं दर्शन घडत आहे. अगदी निरक्षर अडाणी माणसांपासून ते उच्चविद्याविभूषित व्यक्तीही कोरोनाच्या लढाईत जोमानं काम करताना दिसून येत आहेत. कोरोनामुळे देशात आता ३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आलं आहे. म्हणजे, जवळपास २ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लॉकडाऊनचा होणार आहे. या लॉकडाऊनमुळे देशाचं आर्थिक गणित बिघडलंय, तर लाखो मजूरांना हाल-अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. शहरात हाताला काम नसल्याने उपासमारीची वेळ मजुरांवर आली आहे. त्यामुळे या कामगारांनी आपला घरचा रस्ता धरला आहे. 

गावाकडं निघालेले लाखो प्रवासी मजूर हे गाडीचा वाट न पाहता चालतच मैलों मैल अंतर कापत आहेत. एका राज्यातून दुसऱ्या राज्यातील तिसऱ्या जिल्ह्याचा प्रवास पायीच पूर्ण करण्याचा प्रयत्न होत आहे. आंध्र प्रदेशातील नेल्लर जिल्ह्यातून अशाच काही महिला विजयनगर येथे पायी जात होत्या. उपाशीपोटीच या महिलांचा प्रवास सुरु होता, जवळ खायलाही काही नव्हते. त्यामुळे, या महिलांनी विजयनगरच्या एसपी बी राजा कुमारी यांना फोन केला. या महिलांचा फोन आल्यानंतर, राजा कुमारी यांनी स्वत:च्या घरी या महिलांसाठी भोजन बनवलं. लेमन राईस बनवून या महिलांना स्वत: भेटून त्यांची भूक भागविण्याचं काम एसपी मॅडमने केले. 

साधारण रात्री १२ च्या सुमारास मला अननोन नंबरवरुन फोन आला. त्यावेळी, संबंधित महिलांनी, त्या गेल्या २-३ दिवसांपासून चालत असल्याचं मला सांगितलं. तसेच, पोटात अन्नाच कण नसून आम्ही ११ जण विजयनगरच्या चेकपोस्टवर आल्याचं त्यांनी सांगितलं. त्यावेळी, मी माझ्या पोलीस अधिकाऱ्यांना फोन करुन जेवणाची काही व्यवस्था होतेय का ते पाहा, असे सांगितले. त्यावर, लॉकडाऊनमुळे शक्यता कमी आहे, पण आम्ही ब्रेड भेटेल का ते पाहतो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर, ब्रेडही भेटल याची शाश्वती नसल्याने मी घरातच लेमन राईस बनवून चेकपोस्ट नेला, असे राजा कुमारी यांनी सांगितले. 

चेक पोस्टजवळील एका क्वारंटाईन सेंटरमध्ये या महिला थांबल्या होत्या. या ११ जणांना मी लेमन राईस दिला, त्यांनी जेवण केलं. मग, त्यांची सोय पाहून मी पहाटे ३ ते  ४ वाजता घरी पोहोचले. गावातील कुणीतरी या महिलांना माझा नंबर दिला होता. काही अडचण असेल तर यांना कॉल करण्याचे सांगितले होते. त्यामुळे या महिलांना थेट मला कॉल केल्याचेही कुमारी यांनी म्हटले. एसपी मीरा कुमारी यांच्या या संवेदनशीलतेचं विजयनगरमध्ये कौतुक होत आहे. विजयनगर पोलिसांनी यासंदर्भात आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन फोटो शेअर करत माहिती दिली.  

टॅग्स :Policeपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्याMigrationस्थलांतरणAndhra Pradeshआंध्र प्रदेशWomenमहिला