शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

3 कोटी खासगी कर्मचाऱ्यांसाठी 'अच्छे दिन'; मोदी सरकार आणणार 'ही' महत्त्वाकांक्षी योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 09:22 IST

Narendra Modi: खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

ठळक मुद्देखासगी क्षेत्रात कार्यरत सुमारे 3 कोटी कर्मचाऱ्यांचा पगार दर 6 महिन्यांनी वाढेलकेंद्र सरकारने महागाईचा सामना करण्यासाठी ही योजना तयारवर्षभरातून दोनदा होणार पगारवाढ

नवी दिल्ली - प्रत्येक सर्वसामान्य नोकरदार वर्षातून एकदा होणाऱ्या पगारवाढीकडे मोठ्या आशेने बघत असतो. पण आता वर्षभराची वाट न बघता 6 महिन्यात तुम्हाला पगारवाढ मिळाली तर? पण हे खरं आहे. मोदी सरकारने खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदारांना अच्छे दिन आणण्यासाठी नवीन योजना आणली आहे. 

या योजनेतंर्गत वर्षातून दोनदा म्हणजेच दर 6 महिन्यांनी पगार वाढेल. त्यामुळे खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारने महागाईचा सामना करण्यासाठी ही योजना तयार केली आहे. ज्या अंतर्गत कर्मचार्‍यांवर वाढत्या महागाईचा बोजा कमी करण्यासाठी मदत होईल. नवीन महागाई निर्देशांकानुसार ही वेतनवाढ निश्चित केली जाईल.

नियमानुसार, महागाई वाढल्यामुळे खासगी क्षेत्रात कार्यरत सुमारे 3 कोटी कर्मचाऱ्यांचा पगार दर 6 महिन्यांनी वाढेल. बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार, सरकारच्या उच्चस्तरीय समितीने औद्योगिक क्षेत्रातील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ग्राहक मूल्य निर्देशांकासाठी एक नवीन अहवाल तयार केला आहे, ज्याचा महागाई भत्ता या महागाई निर्देशांकात जोडला जाईल.

मागील महिन्याच्या 27 तारखेला मुख्य कामगार व रोजगार सल्लागार बी.एन. नंदा यांच्या नेतृत्वात एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. ज्यामध्ये औद्योगिक क्षेत्रातील कर्मचार्‍यांसाठी ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय-आयडब्ल्यू) ची नवीन योजना मंजूर झाली. यासाठी 2016 हे साधारण आधार असणार आहे. 

3 कोटी कर्मचार्‍यांना लाभमोदी सरकारच्या या निर्णयामुळे संघटित औद्योगिक क्षेत्रातील 3 कोटी कर्मचार्‍यांना या निर्णयाचा फायदा होईल. केंद्र सरकार आणि खासगी क्षेत्रातील कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्याचे मूल्यांकन दर 6 महिन्यांनी केले जाते. हे काम करण्यासाठी सीपीआय-आयडब्ल्यूचा आधार घेतला जातो.

किमान निवृत्ती वेतनात वाढ होण्याची दाट शक्यतादरम्यान, आज कर्मचारी भविष्य निधी संघटना (ईपीएफओ) किमान मासिक निवृत्ती वेतन दुप्पट करुन ते २ हजार रुपये करण्याचा निर्णय घेऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्थ मंत्रालयानं कामगार मंत्रालयाला निवृत्ती वेतनातल्या वाढीसाठी काही प्रस्ताव दिले आहेत. यातल्या एका प्रस्तावावर आज शिक्कामोर्तब होऊ शकतं. त्यामुळे नरेंद्र मोदी सरकारच्या या दोन निर्णयामुळे नोकरदारांसाठी अच्छे दिन येणार असल्याचं बोललं जातंय. 

टॅग्स :Employeeकर्मचारीNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार