शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

साक्षी महाराजांचे भाजपला 'अल्टीमेटम'; उमेदवारी न दिल्यास पराभव अटळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 21:13 IST

माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार भाजपकडून आगामी लोकसभा निवडणुकीत अनेक विद्यमान खासदारांचे नाव कापण्यात येणार आहे.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊन दोन दिवसही झाले नसताना उमेदवारांनी तिकीट कापले जाण्याच्या भितीने पक्षाला अल्टीमेटम द्यायला सुरुवात केली आहे. त्यामध्ये भाजपाचे उन्नाव येथील खासदार साक्षी महाराज आघाडीवर आहेत. साक्षी महाराज यांनी पत्रातून राज्यातील पक्ष नेतृत्वाला अल्टीमेटम दिला आहे.

माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार भाजपकडून आगामी लोकसभा निवडणुकीत अनेक विद्यमान खासदारांचे नाव कापण्यात येणार आहे. यामध्ये साक्षी महाराज यांचेदेखील नाव असल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर साक्षी महाराज यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष महेंद्र नाथ पांडेय यांना पत्र लिहिले की, मी उन्नावमध्ये येण्यापूर्वी जिल्ह्यात मागील दहा वर्षांत भाजपचा एकही विधानसभा सदस्य नव्हता. परंतु, आज भाजपचे सहा आमदार आणि एक विधान परिषद सदस्य आहे. पक्षाने आपल्याविरुद्ध काही निर्णय घेतल्यास, याचा देश आणि राज्यातील लाखो कार्यकर्त्यांवर मोठा परिणाम होईल, ज्याचा परिणाम नक्कीच चांगला नसेल, असे साक्षी महाराज यांनी म्हटले आहे. उन्नावमधून मला पुन्हा एकदा उमेदवारी द्यावी. यावेळी मी महायुतीच्या उमेदवाराला पाच लाखांहून अधिक मतांनी मात देईल, असंही साक्षी महाराज यांनी पत्रात म्हटले आहे. यावेळी साक्षी महाराज यांनी जिल्ह्यातील मतदारांची जातीनिहाय आकडेवारी पक्ष नेतृत्वाला दिली आहे. 

दरम्यान, आपल्या बेताल वक्तव्यामुळे साक्षी महाराज नेहमीच चर्चेत असतात. तसेच भाजपाकडून एखाद्या मुद्द्यावर वादग्रस्त वक्तव्य करणारे आणि त्याचे समर्थन करणारे म्हणूनही साक्षी महाराज यांनी ओळख आहे. 

टॅग्स :Sakshi Maharajसाक्षी महाराजBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेशLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक