शहरं
Join us  
Trending Stories
1
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
2
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
3
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
4
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
5
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
6
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
7
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
8
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
9
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
10
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
11
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
12
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
13
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
14
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
15
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
16
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
17
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
18
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
19
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
20
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...

साक्षी महाराजांचे भाजपला 'अल्टीमेटम'; उमेदवारी न दिल्यास पराभव अटळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 21:13 IST

माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार भाजपकडून आगामी लोकसभा निवडणुकीत अनेक विद्यमान खासदारांचे नाव कापण्यात येणार आहे.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊन दोन दिवसही झाले नसताना उमेदवारांनी तिकीट कापले जाण्याच्या भितीने पक्षाला अल्टीमेटम द्यायला सुरुवात केली आहे. त्यामध्ये भाजपाचे उन्नाव येथील खासदार साक्षी महाराज आघाडीवर आहेत. साक्षी महाराज यांनी पत्रातून राज्यातील पक्ष नेतृत्वाला अल्टीमेटम दिला आहे.

माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार भाजपकडून आगामी लोकसभा निवडणुकीत अनेक विद्यमान खासदारांचे नाव कापण्यात येणार आहे. यामध्ये साक्षी महाराज यांचेदेखील नाव असल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर साक्षी महाराज यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष महेंद्र नाथ पांडेय यांना पत्र लिहिले की, मी उन्नावमध्ये येण्यापूर्वी जिल्ह्यात मागील दहा वर्षांत भाजपचा एकही विधानसभा सदस्य नव्हता. परंतु, आज भाजपचे सहा आमदार आणि एक विधान परिषद सदस्य आहे. पक्षाने आपल्याविरुद्ध काही निर्णय घेतल्यास, याचा देश आणि राज्यातील लाखो कार्यकर्त्यांवर मोठा परिणाम होईल, ज्याचा परिणाम नक्कीच चांगला नसेल, असे साक्षी महाराज यांनी म्हटले आहे. उन्नावमधून मला पुन्हा एकदा उमेदवारी द्यावी. यावेळी मी महायुतीच्या उमेदवाराला पाच लाखांहून अधिक मतांनी मात देईल, असंही साक्षी महाराज यांनी पत्रात म्हटले आहे. यावेळी साक्षी महाराज यांनी जिल्ह्यातील मतदारांची जातीनिहाय आकडेवारी पक्ष नेतृत्वाला दिली आहे. 

दरम्यान, आपल्या बेताल वक्तव्यामुळे साक्षी महाराज नेहमीच चर्चेत असतात. तसेच भाजपाकडून एखाद्या मुद्द्यावर वादग्रस्त वक्तव्य करणारे आणि त्याचे समर्थन करणारे म्हणूनही साक्षी महाराज यांनी ओळख आहे. 

टॅग्स :Sakshi Maharajसाक्षी महाराजBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेशLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक