शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
2
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
3
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
4
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
5
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
6
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
7
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
8
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
9
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
10
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
11
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
12
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल
13
राजा रघुवंशीची हत्या, सोनम झालेली बेपत्ता; एकाच वेळी १२० पोलीस करत होते 'ऑपरेशन हनिमून'!
14
सॉफ्टवेअर इंजिनिअर झटक्यात कोडिंग करायला गेले अन् चॅटजीपीटी बंद पडले! भारतीय युजर वैतागले 
15
CM फडणवीसांची नितेश राणेंना कठोर शब्दांत समज; म्हणाले, “तुमच्या मनात काही असले तरी...”
16
...अन् १४ चिनी नागरिकांचा जीव वाचला; चीननं मानले भारतीय नौदल आणि मुंबई कोस्ट गार्डचे आभार
17
बालपणीचे मित्र, इंदूरमधला कॅफे...राजाच्या हत्येसाठी राजने ३ मित्रांना कसं तयार केले?
18
जग बेलआऊटवर बेलआऊट पॅकेज देतेय, पाकिस्तानी सैन्य ते पैसे खातेय; वर्ल्ड बँकेनेच पाकिस्तानला उघडे केले...
19
हनिमून ते राजाची हत्या...; मेघालय पोलिसांनी विचारलेल्या 'या' १३ प्रश्नांनी उडवली सोनमची झोप!
20
बाबो! बोल्ड फोटोज आणि व्हिडिओज विकून खुशीने कमावले तब्बल १० कोटी, म्हणाली...

Saheed Saraj Singh : मी तर मुलगा गमावलाय, सुनेला समजवताना सासूच्याही अश्रूंचा बांध फुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 13:37 IST

जम्मूच्या राजौरी जिल्ह्यातील पूँछ सेक्टरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत 5 जवानांना वीरमरण प्राप्त झाले. सारजसिंग हे 16 आर.आर राष्ट्रीय रायफल्समध्ये सहभागी होते.

ठळक मुद्देरजविंदरची आई कुलवीर कौर यांनी सांगितले की, पती सारजच्या निधनाची बातमी ऐकल्यापासून रजविंदरच्या वेदना असह्य झाल्या आहेत

बरेली - मला पैसे नकोत, नोकरीही नको, सगळं काही वापस घ्या. पण, माझा पती मला परत द्या. पतीच्या निधनानंतर अश्रूंचा बांध फुटलेल्या रजविंदर कौर यांचे हे शब्द ऐकून अनेकांचे डोळे पाणावले. या परिस्थितीत रजविंदर यांना सांभाळणं कठीण बनलं होतं. कारण, आपला पती आपल्याला सोडून गेल्याचं वास्तव पचवणं त्यांना शक्य नव्हतं. तर, दुसरीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी सारजसिंग यांच्याघरी भेट दिली. त्यावेळी, आईंच्या डोळ्यातील अश्रू पाहून कलेक्टर साहेबही भावूक झाले होते.  

जम्मूच्या राजौरी जिल्ह्यातील पूँछ सेक्टरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत 5 जवानांना वीरमरण प्राप्त झाले. सारजसिंग हे 16 आर.आर राष्ट्रीय रायफल्समध्ये सहभागी होते. त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर गावात शोककळा पसरली असून गावकऱ्यांनी त्यांच्या मूळगावी गर्दी केली आहे. सारजसिंग यांची पत्नी रजविंदरसिंग मंगळवारी दुपारी जवळपास 12.30 वाजता आपल्या आई-वडिलांसह सासरी पोहोचली. कारमधून उतरताच घरात शिरल्यानंतर खाटावर बसलेल्या सासूच्या गळ्यात पडून ती मोठमोठ्यानं रडू लागली. सुनेची ही दशा पाहून सासू परमजीत कौर यांनाही अश्रू अनावर झाले. पण, त्यांनी स्वत:ला सावरले. सुनेची समजूत काढत, मुली मीही माझा मुलगा हरवलाय, स्वत:ला सांभाळ असे म्हणत परमजीत यांनीच आपल्या सुनेला धीर दिला. मात्र, पतीच्या निधनाचा मोठा धक्का रजविंदर हिला बसला होता. त्यामुळेच, ती रडता रडता बेशुद्ध पडली.

रजविंदरची आई कुलवीर कौर यांनी सांगितले की, पती सारजच्या निधनाची बातमी ऐकल्यापासून रजविंदरच्या वेदना असह्य झाल्या आहेत. दु:खाचा डोंगरच तिच्यावर कोसळला आहे, त्यामुळे ती सातत्याने बेशुद्ध पडत आहे, अनेकदा तोंडावर पाणी मारून तिला जागं केलंय. पती ज्याठिकाणी तैनात होते, तेथे कमी प्रमाणातच फोनवरुन संवाद व्हायचा. तेथील परिस्थिती खराब असल्याची जाणीव रजविंदरला व्हायची. पण, पतीने सर्वकाही ठिक असल्याचं सांगितलं होतं. रविवारी शेटवचं बोलणं पती सारजसोबत झालं होतं. त्यावेळी, डिसेंबर महिन्यात मेव्हण्याचा लग्नाला कुठल्याही परिस्थितीत सुट्टी घेऊन येणार असल्याचं पतीन म्हटलं होतं. पण, आता ते कधीच येणार नाहीत, या वास्तवाने ती पूर्णत: कोलमडली आहे.   

टॅग्स :MartyrशहीदJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवानterroristदहशतवादी