शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

१२ वर्षांपूर्वी लव्ह मॅरेज, ३ मुलांची आई पुन्हा पडली प्रेमात; नवऱ्याने लावून दिलं बॉयफ्रेंडशी लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 15:20 IST

१२ वर्षांपूर्वी एका महिलेने प्रेमविवाह केला होता. मात्र आता १२ वर्षांनंतर ती महिला पुन्हा दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडली आहे.

बिहारच्या सहरसा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. १२ वर्षांपूर्वी एका महिलेने प्रेमविवाह केला होता. मात्र आता १२ वर्षांनंतर ती महिला पुन्हा दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडली आहे. हा प्रकार महिलेच्या पतीला समजल्यानंतर त्याने पत्नीचं तिच्या बॉयफ्रेंडशी लग्न लावून दिलं. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण प्रकरण सहरसा येथील बैजनाथपूर गावचं आहे. रहुआ तुलसीयाही गावातील तरुणीवर १२ वर्षांपूर्वी एका तरुणाचं प्रेम होतं. दोघांनाही लग्न करायचं होतं, पण त्यांच्या घरचे तयार नव्हते. घरच्यांच्या विरोधाला न जुमानता या दोघांनी लग्न केलं. लग्नानंतर दोघांना तीन मुलं झाली. त्यांचं आयुष्य सुरळीत चालू होतं.

याचदरम्यान गावात राहणाऱ्या तरुणावर महिलेचा जीव जडला. आंतरजातीय विवाहानंतर या तरुणाने महिलेला सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मदत केली होती. येथून या तरुणाची महिलेशी जवळीक वाढली आणि हळूहळू प्रेमप्रकरण सुरू झालं. १६ डिसेंबरच्या रात्री तरुण महिलेच्या घरी पोहोचला, त्यादरम्यान महिलेचा पती अचानक घरात आला आणि त्याने पत्नीला बॉयफ्रेंडसह रंगेहात पकडलं.

महिलेने आपलं प्रेमप्रकरण सर्वांसमोर कबूल केलं आणि बॉयफ्रेंडसोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली. यानंतर महिलेच्या पतीने महिलेचे तिच्या बॉयफ्रेंडशी लग्न लावून दिलं. दुसऱ्यांदा प्रेमविवाह केल्यानंतर महिलेने तिची तीन मुलांना आपल्यासोबत ठेवण्याची इच्छा व्यक्त केली, तर तिच्या पहिल्या पतीलाही मुलांना सोबत ठेवायचं होतं. 

पहिला नवरा आता मुलांसोबत आहे. ही महिला तिच्या बॉयफ्रेंडसोबत राहू लागली आहे. गावकऱ्यांसमोर झालेल्या या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या संपूर्ण घटनेवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. या प्रकरणी महिलेच्या पहिल्या पतीने सांगितले की, तो तिच्यावर मनापासून प्रेम करतो, मात्र तिचा आनंद आता दुसऱ्या व्यक्तीसोबत आहे. 

टॅग्स :Biharबिहारmarriageलग्न