शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

१२ वर्षांपूर्वी लव्ह मॅरेज, ३ मुलांची आई पुन्हा पडली प्रेमात; नवऱ्याने लावून दिलं बॉयफ्रेंडशी लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 15:20 IST

१२ वर्षांपूर्वी एका महिलेने प्रेमविवाह केला होता. मात्र आता १२ वर्षांनंतर ती महिला पुन्हा दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडली आहे.

बिहारच्या सहरसा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. १२ वर्षांपूर्वी एका महिलेने प्रेमविवाह केला होता. मात्र आता १२ वर्षांनंतर ती महिला पुन्हा दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडली आहे. हा प्रकार महिलेच्या पतीला समजल्यानंतर त्याने पत्नीचं तिच्या बॉयफ्रेंडशी लग्न लावून दिलं. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण प्रकरण सहरसा येथील बैजनाथपूर गावचं आहे. रहुआ तुलसीयाही गावातील तरुणीवर १२ वर्षांपूर्वी एका तरुणाचं प्रेम होतं. दोघांनाही लग्न करायचं होतं, पण त्यांच्या घरचे तयार नव्हते. घरच्यांच्या विरोधाला न जुमानता या दोघांनी लग्न केलं. लग्नानंतर दोघांना तीन मुलं झाली. त्यांचं आयुष्य सुरळीत चालू होतं.

याचदरम्यान गावात राहणाऱ्या तरुणावर महिलेचा जीव जडला. आंतरजातीय विवाहानंतर या तरुणाने महिलेला सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मदत केली होती. येथून या तरुणाची महिलेशी जवळीक वाढली आणि हळूहळू प्रेमप्रकरण सुरू झालं. १६ डिसेंबरच्या रात्री तरुण महिलेच्या घरी पोहोचला, त्यादरम्यान महिलेचा पती अचानक घरात आला आणि त्याने पत्नीला बॉयफ्रेंडसह रंगेहात पकडलं.

महिलेने आपलं प्रेमप्रकरण सर्वांसमोर कबूल केलं आणि बॉयफ्रेंडसोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली. यानंतर महिलेच्या पतीने महिलेचे तिच्या बॉयफ्रेंडशी लग्न लावून दिलं. दुसऱ्यांदा प्रेमविवाह केल्यानंतर महिलेने तिची तीन मुलांना आपल्यासोबत ठेवण्याची इच्छा व्यक्त केली, तर तिच्या पहिल्या पतीलाही मुलांना सोबत ठेवायचं होतं. 

पहिला नवरा आता मुलांसोबत आहे. ही महिला तिच्या बॉयफ्रेंडसोबत राहू लागली आहे. गावकऱ्यांसमोर झालेल्या या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या संपूर्ण घटनेवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. या प्रकरणी महिलेच्या पहिल्या पतीने सांगितले की, तो तिच्यावर मनापासून प्रेम करतो, मात्र तिचा आनंद आता दुसऱ्या व्यक्तीसोबत आहे. 

टॅग्स :Biharबिहारmarriageलग्न