शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मातीचा ऱ्हास थांबवण्यासाठी सद्गुरूंनी सादर केली त्रिसूत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 06:09 IST

१९५ राष्ट्रांना एक केंद्रित कृतीच्या योजनेचे केले आवाहन 

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : मातीसाठीच्या १०० दिवसांच्या ३०,००० किलोमीटर मोटारसायकल प्रवासावर असलेल्या सद्गुरूंनी आयव्हरी कोस्टमधील अबीद्जानला उड्डाण केले आणि संयुक्त राष्ट्रसंघ वाळवंटीकरण प्रतिबंधक परिषदेच्या कॉन्फरन्स ऑफ पार्टीजच्या १५ व्या सत्रात १९५ राष्ट्रांच्या प्रतिनिधींना संबोधित केले. सद्गुरूंनी त्यांच्या संबोधनात एक व्यापक उद्दिष्ट सांगितले ते  म्हणजे  शेतजमिनीत  किमान ३ ते ६% सेंद्रिय सामग्री आहे, याची खात्री करणे आणि हे साध्य करण्यासाठी त्रिसूत्री धोरण सांगितले. 

सद्गुरूंनी माती वाचवा मोहिमेत जागतिक शेतजमिनीच्या ऱ्हासावर उपाययोजना सादर केली. आयव्हरी कोस्ट येथील सत्रात जमलेल्या जगातील सर्व राष्ट्रांना संबोधित करताना ते म्हणाले की, माती नामशेष होण्याच्या उंबरठ्यावरून मानवतेला परत आणण्यासाठी ही एक महत्त्वाची संधी आहे. ज्या मातीत ३ ते ६ % सेंद्रिय सामग्री आहे, अशा मातीतून पिकवलेल्या अन्नासाठी आग्रही असायला हवे. या उपक्रमाचा परिणाम म्हणून, लोक अधिक निरोगी, अधिक कार्यक्षम होऊन त्यांची रोग प्रतिकारशक्ती वाढेल. त्यामुळे हे स्पष्ट आहे की, उच्च दर्जाच्या अन्नाच्या अशा चिन्हाला तथाकथित ‘ऑरगॅनिक’ आणि ‘नॉन ऑरगॅनिक’ उत्पादनामध्ये फरक करण्याचा सध्याच्या पद्धतीपेक्षा कितीतरी अधिक अर्थ असेल. सद्गुरूंनी ट्विटरवर शेअर केले, सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मातीला सजीव म्हणून ओळखणे आणि ती जिवंत ठेवणे. पृथ्वीवरील ८५% पेक्षा जास्त राष्ट्रे अजूनही मातीकडे निर्जीव वस्तू म्हणून पाहतात. यूएनसीसीडीचे कार्यकारी सचिव इब्राहिम थियाव यांनी त्यांच्या ट्विटमध्ये माती वाचवण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेबद्दल सद्गुरूंचे आभार मानले आहेत.

चळवळीला मिळतोय प्रचंड पाठिंबाn    २१ मार्च रोजी लंडनहून सुरू झालेला त्यांचा प्रवास पुढे सुरू ठेवण्यासाठी सद्गुरू युरोप आणि मध्य आशियामधून प्रवास करत मे महिन्यात अरब राष्ट्रांत पोहोचले, जिथे माती वाचवण्याच्या चळवळीला सरकार आणि नागरिकांकडून अनेक शुभेच्छा आणि प्रचंड पाठिंबा मिळाला.n    जगातील ३.५ अब्ज लोकांचा पाठिंबा मिळवून जगभरातल्या शासनांना मातीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी धोरणात्मक बदल करण्यासाठी प्रेरित करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.