शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्येही 'सदावर्ते', नितीशकुमारांच्या वाढीव आरक्षणाला हाय कोर्टात आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 19:53 IST

घटनात्मक तरतुदींनुसार, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांना योग्य प्रतिनिधित्व देण्यासाठी आरक्षण देण्यात आले. लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्याची तरतूद नाही, असे या याचिकेत म्हटले गेले आहे.

महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना बिहारमध्ये जातीय जनगणना करून त्या आधारे ७५ टक्के आरक्षण नितिशकुमार सरकारने दिले होते. या वाढीव आरक्षणाला पाटन्याच्या उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. एक याचिका दाखल करण्यात आली असून ती नोंदविण्यापूर्वी त्याची एक प्रत महाधिवक्त्यांच्या कार्यालयात पाठविण्यात आली आहे. 

महाराष्ट्रात मराठा आरक्षणाला अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी सर्वोच्च न्यायालयात जात आव्हान दिले होते. यामुळे राज्य सरकारने दिलेले आरक्षण रद्द झाले होते. आता पुन्हा एकदा सदावर्ते मराठा आरक्षणाविरोधात कोर्टाची पायरी चढणार आहेत. अशावेळी ज्या बिहार सरकारच्या पावलावर पाऊल देऊन महाराष्ट्र सरकार मराठ्यांना टिकणारे आरक्षण देण्याची तयारी करत आहे, त्या बिहारमध्येच दिलेले वाढीव आरक्षण धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

पाटना हाय कोर्टाच्या न्यायमूर्तींच्या परवानगीनंतर ही याचिका नोंद करून घेण्यात आली आहे. गौरव कुमार आणि नमन श्रेष्ठ यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. . बिहार विधानसभेने बिहार आरक्षण (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागास जाती) सुधारणा कायदा, 2023 आणि बिहार (शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश) आरक्षण (सुधारणा) कायदा, 2023 मंजूर केला आहे. याद्वारे आरक्षित प्रवर्गासाठी आधीच दिलेली आरक्षणाची मर्यादा ५० वरून ६५ टक्के करण्यात आली आहे. तसेच मोदी सरकारने दिलेली ईड्ब्ल्यूएसची १० टक्के मर्यादाही आहे, असे एकूण ७५ टक्के आरक्षण झाले आहे. 

जात सर्वेक्षणाच्या आधारे ही दुरुस्ती करण्यात आल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. या जाती सर्वेक्षणात या मागास जातींची टक्केवारी ६३.१३ टक्के होती, तर त्यांच्यासाठीचे आरक्षण ५० टक्क्यांवरून ६५ टक्के करण्यात आले आहे. घटनात्मक तरतुदींनुसार, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांना योग्य प्रतिनिधित्व देण्यासाठी आरक्षण देण्यात आले. लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्याची तरतूद नाही. राज्य सरकारने संमत केलेला सुधारित कायदा भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करतो. यामध्ये सरकारी नोकऱ्यांमधील नियुक्तीच्या समान अधिकाराच्या तत्त्वाचे उल्लंघन करण्यात आले आहे, असे या याचिकेत म्हणण्यात आले आहे. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारOBC Reservationओबीसी आरक्षणBiharबिहारHigh Courtउच्च न्यायालय