शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

India China FaceOff: 20 दिवसांपूर्वीच 'बाप' बनलेल्या कुंदनला वीरमरण, भारतमातेसाठी दिलं बलिदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 12:26 IST

कुंदन ओझा यांचे कुटुंब गेल्या ३० वर्षांपासून झारखंड राज्यातील साहेबगज येथे राहत आहे. मंगळवारी रात्री कुंदन यांच्या वीरमरणाचे वृत्त समजताच गावासह कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.

मुंबई – भारत आणि चीनी सैनिकांमध्ये 15 आणि 16 जून रोजी गलवान खोऱ्यात संघर्ष झाला.  भारतीय सीमेवरील गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांनी हल्ल्यात भारताच्या एका कर्नलसह तीन जवान शहीद झाले. याच हल्ल्यात भारताचे आणखी 17 जवान जखमी झाले होते. परंतु त्या परिसरात शून्याखाली असलेल्या तापमानामुळे ते वाचू न शकल्याने शहीदांची संख्या 20 झाली. चीनसोबतच्या या चकमकीत 28 वर्षीय कुंदन ओझा यांना वीरमरण प्राप्त झालंय. कुंदन यांच्या निधनाची बातमी समजतात त्यांच्या मूळ गावी शोककळा पसरली.

कुंदन ओझा यांचे कुटुंब गेल्या ३० वर्षांपासून झारखंड राज्यातील साहेबगज येथे राहत आहे. मंगळवारी रात्री कुंदन यांच्या वीरमरणाचे वृत्त समजताच गावासह कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. शेतकरी असलेल्या रविशंकर ओझा यांचे सुपुत्र कुंदन हे 10 वर्षापूर्वीच भारतीय सैन्यात भरती झाले होते.  तर, दोन वर्षांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. कुंदन यांच्या कुटुंबात 20 दिवसांपूर्वीच गुडन्यूज आली होती, त्यांच्या पत्नीने गोंडस मुलीला जन्म दिला होता. आपल्या घरी पहिली मुलगी झाल्याचा मोठा आनंद कुंदन यांना झाला होता. मात्र, आपल्या चिमुकल्या मुलीला जवळून पाहणं कुंदन यांच्या नशिबी नव्हत. कुंदन यांना गलवान सीमारेषेवर वीरमरण प्राप्त झाले. देशासाठी भारतमातेच्या सुपुत्राने आपले बलिदान दिले. दरम्यान, कुंदन यांचे सासरे दिल्लीत नोकरी करतात. कुंदन यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या सासरच्या कुटुंबावरही दु:खाचा डोंगर कोसळला.  

दरम्यान, देशासाठी मुलाने आपल्या प्राणाचे बलिदान दिले, मला त्याचा अभिमान आहे अशी भावना चीनच्या चकमकीत धारातीर्थी कोसळलेल्या कर्नल संतोष बाबू यांच्या आईने व्यक्त केली आहे. तसेच आपला एकुलता एक मुलगा आता कधीच परत येणार नाही या गोष्टीचं दु:ख देखील असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 'सुरुवातीला आम्हाल जेव्हा हे समजलं तेव्हा आमचा विश्वासच बसला नाही. खूप मोठा धक्का बसला. माझ्या मुलाने अनेक आव्हांनाचा सामना केला आहे' अशा भावना संतोष यांच्या पालकांनी व्यक्त केल्या आहेत. शहीद कर्नल संतोष यांची आई मंजुळा यांनी 'देशासाठी माझ्या मुलाने बलिदान दिले याचा मला अभिमान आहे पण एक आई म्हणून आज मी दु:खी आहे' असं म्हटलं आहे. 

टॅग्स :chinaचीनBorderसीमारेषाMartyrशहीदBiharबिहारDeathमृत्यू