शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड अमान्य: सचिन तेंडुलकर

By देवेश फडके | Updated: February 3, 2021 21:39 IST

आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहाना हिने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यापासून संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. यासंदर्भात भारताचे महान क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनीही आपले मत मांडले आहे. 

ठळक मुद्देशेतकरी आंदोलनासंदर्भात सचिन तेंडुलकर यांनी व्यक्त केले मतभारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड अमान्य - सचिन तेंडुलकरदेश म्हणून आपण सर्व जण एकत्र राहू - सचिन तेंडुलकर

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत गेल्या दोन महिन्यांपासून केंद्रीय कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांचा आवाज आता जगभर पसरत आहे. शेतकरीआंदोलनाला आता जागतिक स्तरावरून पाठिंबा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहाना हिने शेतकरीआंदोलनाला पाठिंबा दिल्यापासून संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. यासंदर्भात भारताचे महान क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनीही आपले मत मांडले आहे. 

सचिन तेंडुलकर यांनी ट्विट करत यासंदर्भात भाष्य केले आहे. भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड मान्य नाही. बाह्यशक्ती बघ्याची भूमिका घेऊ शकतात. हस्तक्षेप मात्र करू शकत नाही. भारतीयांना भारत माहिती आहे आणि त्यांनी भारतासाठी निर्णय घ्यावा. देश म्हणून आपण सर्व जण एकत्र राहू, असे ट्विट सचिन तेंडुलकर यांनी केले आहे. हे ट्विट करताना सचिन तेंडुलकर यांनी #IndiaTogether #IndiaAgainstPropaganda हे दोन हॅशटॅगही वापरले आहेत. 

पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग, पॉर्नस्टार मिया खलिफानेही शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देताना भारत सरकारवर टीका केली. आता यावरून दोन गट पडल्याचे पाहायला मिळत आहे. बॉलिवूडमधील काही कलाकारांनीही यासंदर्भात आपापली मते व्यक्त केली आहेत. 

कोणत्याही प्रकारचा दुष्प्रचार देशाचे ऐक्य तोडू शकत नाही : अमित शाह

कोणत्याही प्रकारचा दुष्प्रचार देशाचे ऐक्य तोडू शकत नाही 

कोणताही दुष्प्रचार देशाचे ऐक्य तोडू शकत नाही. कोणताही दुष्प्रचार भारताला विकासाची उंची गाठण्यापासून रोखू शकत नाही. दुष्प्रचार हा भारताचे भवितव्य ठरवू शकत नाही. केवळ विकास ते ठरवू शकतो. भारत एकसंध आहे आणि एकसंध राहूनच विकासकडे वाटचाल करेल, असे ट्विट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले आहे. 

परराष्ट्र मंत्रालयाकडूनही दखल

शेतकरी आंदोलनावर कोणत्याही प्रकारचे वक्तव्य करण्यापूर्वी तथ्य जाणून घेणे आवश्यक आहे. याबाबत अधिक समज असणेही आवश्यक आहे. या प्रकरणी प्रसिद्ध व्यक्तींकडून आणि अन्य व्यक्तींकडून सोशल मीडियावर हॅशटॅगचा होत असलेला वापर आणि जी काही वक्तव्य केली जात आहेत ती योग्य नाही आणि बेजबाबदारपणाची आहेत, असे अनुराग श्रीवास्तव यांनी ट्विट केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :Sachin Tendulkarसचिन तेंडुलकरFarmerशेतकरीagitationआंदोलनTwitterट्विटर