शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
5
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
6
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
7
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
8
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
9
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
10
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
11
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
12
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
13
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
14
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
15
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
16
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
17
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
18
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
19
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
20
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2024 18:35 IST

Jaishankar on China गलवान घाटीत भारतीय आणि चीनी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीनंतर दोन्ही देशातील संबंध चिघळले आहेत.

S Jaishankar on China : भारत आणि चीनमध्ये सीमावादाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. अशातच लडाखच्या गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीनंतर तर दोन्ही देशांमधील संबंध चांगलेच चिघळले आहेत. त्या घटनेनंतर दोन्ही देशांदरम्यान अनेक शांतता बैठका झाल्या, मात्र त्यावर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. आता भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी या संबंधावर महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

...तरच संबंध सुधारतीलपीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत जयशंकर म्हणाले की, चीनसोबत आपले संबंध सामान्य नाहीत, कारण सीमाभागातील शांतता भंग पावली आहे. पीएम मोदींनी स्पष्टपणे म्हटले आहे की, सध्याची परिस्थिती चीनच्या हिताची नाही, हे चीनने लक्षात घेतले पाहिजे. सीमेवरील परिस्थितीवर चर्चा करण्याची नितांत गरज आहे आणि भारत आणि चीनमधील शांततापूर्ण संबंध केवळ दोन देशांसाठीच नाही, तर संपूर्ण प्रदेश आणि जगासाठी महत्त्वाचे आहेत.

जयशंकर पुढे म्हणाले की, मुत्सद्देगिरी हे संयमाचे काम आहे आणि भारत चीनशी सर्व मुद्द्यांवर चर्चा करत आहे. संबंध सामान्य करायचे असतील तर सर्व समस्या सोडवायला हव्यात. आम्ही चीनसोबतच्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी उत्सुक आहोत. दोन्ही देशातील संबंध सुधारणे, हे सीमेवरील शांततेवर अवलंबून आहे. भारताला आशा आहे की, चीनसोबतचे सर्व प्रश्न सुटतील. 

 

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरIndiaभारतchinaचीनInternationalआंतरराष्ट्रीय