शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

S Jaishankar Rahul Gandhi: 'LAC वर PM मोदींनी सैन्य पाठवले, काँग्रेसने नाही', राहुल गांधींच्या वक्तव्यावर जयशंकर यांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 17:35 IST

India-China Boarder Dispute: परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मंगळवारी राहुल गांधींच्या चीनवर केलेल्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला.

S Jaishankar On Rahul Gandhi: परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मंगळवारी (21 फेब्रुवारी) राहुल गांधींच्या चीनवर केलेल्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला. भारत-चीन तणावाबाबत गैरसमज पसरवले जात असल्याचे त्यांनी सांगितले. जयशंकर यांनी एएनआय या दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'ते(राहुल गांधी) भारत सरकार घाबरले आहे, असा चुकीचा समज पसरवत आहेत. भारतीय सैन्याला LAC वर कोणी पाठवले? राहुल गांधींनी नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठवले, अशी प्रतिक्रिया जयशंकर यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, मला वाटते की ते जाणीवपूर्वक परिस्थितीचे चुकीचे वर्णन करत आहेत. सीमेवरील पायाभूत सुविधांबाबत हे सरकार गंभीर आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने मोदी सरकारवर चीनबाबत प्रश्न उपस्थित करत आहेत. सरकार चीनचे नाव घ्यायला घाबरते, असे राहुलचे म्हणणे आहे. यावर एस जयशंकर यांनी जाहिररित्या चीनचे नाव घेऊन त्यांना उत्तर दिले.

ते पुढे म्हणतात, मी सर्वाधिक काळ चीनचा राजदूत होतो आणि सीमाप्रश्न हाताळत होतो. मी असे म्हणणार नाही की मला सर्वात जास्त ज्ञान आहे, परंतु मी असे म्हणेन की मला या (चीन) विषयावर बरेच काही माहित आहे. जर त्यांना (राहुल गांधी) चीनबद्दल माहिती असेल तर मी त्यांच्याकडून शिकण्यास तयार आहे. जी विचारधारा आणि राजकीय पक्ष भारताबाहेर आहेत, तत्सम विचारधारा आणि पक्ष भारतातही आहेत आणि दोघेही एकत्र काम करत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

काय म्हणाले होते राहुल गांधी?अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये भारतीय लष्कर आणि चिनी लष्करामध्ये झालेल्या चकमकीबाबत राहुल गांधी यांनी अलीकडेच चीन युद्धाच्या तयारीत असल्याचे म्हटले होते. मोदी सरकार याबाबत गंभीर नाही. त्यामुळे सरकार आमच्या प्रश्नांची उत्तरेही देत ​​नाही. केंद्र सरकार चर्चेपासून पळ काढत असल्याचा दावा त्यांनी केला होता.

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसIndian Armyभारतीय जवान