शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

भारत-कॅनडा वादावर जयशंकर यांनी मौन सोडले, उच्चायुक्तांना परत बोलवण्याचे कारण सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 21:06 IST

भारतने कॅनडातून आपले उच्चायुक्त परत बोलवण्यासारखा मोठा निर्णय का घेतला?

S. Jaishankar on Canada-India : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी भारत आणि कॅनडादरम्यान सुरू असलेल्या वादावर अखेर मौन सोडले. एका कार्यक्रमात बोलताना एस जयशंकर म्हणाले की, कॅनडानेभारतीय उच्चायुक्तांना पोलिस तपासासाठी विचारले होते. त्यामुळेच, भारताने आपले उच्चायुक्त परत बोलावण्याचा निर्णय घेतला.

कॅनडाचे उच्चायुक्त भारतात येतात आणि आपल्या लष्कर आणि पोलिसांची माहिती गोळा करतात, तेव्हा त्यांना कोणतीही अडचण नसते. पण, आपल्या उच्चायुक्तांवर निर्बंध लादले जातात, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

दोन्ही देशांमधील स्वातंत्र्य आणि परकीय हस्तक्षेप या दुहेरी धोरणांवरही जयशंकर यांनी टीका केली. ते म्हणाले, जेव्हा भारतीय पत्रकार सोशल मीडियावर टिप्पणी करतात, तेव्हा ते स्वातंत्र्याच्या श्रेणीत मानले जातात, परंतु जर कोणी म्हटले की कॅनडाचे उच्चायुक्त साऊथ ब्लॉकमधून रागाच्या भरात बाहेर पडले, तर तो परकीय हस्तक्षेप मानला जातो.

जागतिक व्यवस्था पाश्चात्य वर्चस्वापासून मुक्त होत असल्याचेही परराष्ट्रमंत्र्यांनी नमूद केले. ते म्हणाले, भारत आणि चीनसारख्या मोठ्या देशांच्या वाढत्या सहभागामुळे गेल्या 20-25 वर्षांमध्ये जगामध्ये पुनर्संतुलन निर्माण झाले आहे. ही प्रक्रिया सोपी असणार नाही आणि त्यामुळे काही वाद आणि संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. पाश्चिमात्य आणि बिगर पाश्चिमात्य देशांमधील संबंध बदलत असून, हा बदल सोपा नसेल, असेही परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले. 

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पुढे म्हणाले, "पाकिस्तानच्या दौऱ्यावर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले, "मी त्यांना (नवाज शरीफ) भेटलो नाही. मी तिथे एससीओच्या बैठकीसाठी गेलो होतो... एससीओच्या अध्यक्षपदासाठी आम्ही पाकिस्तानला खूप पाठिंबा दिला... 'तिथे पोहोचलो, सगळ्यांना भेटलो, हस्तांदोलन केले, चांगली भेट घेतली आणि परत आलो...'

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरIndiaभारतCanadaकॅनडा