शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

भारत-कॅनडा वादावर जयशंकर यांनी मौन सोडले, उच्चायुक्तांना परत बोलवण्याचे कारण सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 21:06 IST

भारतने कॅनडातून आपले उच्चायुक्त परत बोलवण्यासारखा मोठा निर्णय का घेतला?

S. Jaishankar on Canada-India : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी भारत आणि कॅनडादरम्यान सुरू असलेल्या वादावर अखेर मौन सोडले. एका कार्यक्रमात बोलताना एस जयशंकर म्हणाले की, कॅनडानेभारतीय उच्चायुक्तांना पोलिस तपासासाठी विचारले होते. त्यामुळेच, भारताने आपले उच्चायुक्त परत बोलावण्याचा निर्णय घेतला.

कॅनडाचे उच्चायुक्त भारतात येतात आणि आपल्या लष्कर आणि पोलिसांची माहिती गोळा करतात, तेव्हा त्यांना कोणतीही अडचण नसते. पण, आपल्या उच्चायुक्तांवर निर्बंध लादले जातात, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

दोन्ही देशांमधील स्वातंत्र्य आणि परकीय हस्तक्षेप या दुहेरी धोरणांवरही जयशंकर यांनी टीका केली. ते म्हणाले, जेव्हा भारतीय पत्रकार सोशल मीडियावर टिप्पणी करतात, तेव्हा ते स्वातंत्र्याच्या श्रेणीत मानले जातात, परंतु जर कोणी म्हटले की कॅनडाचे उच्चायुक्त साऊथ ब्लॉकमधून रागाच्या भरात बाहेर पडले, तर तो परकीय हस्तक्षेप मानला जातो.

जागतिक व्यवस्था पाश्चात्य वर्चस्वापासून मुक्त होत असल्याचेही परराष्ट्रमंत्र्यांनी नमूद केले. ते म्हणाले, भारत आणि चीनसारख्या मोठ्या देशांच्या वाढत्या सहभागामुळे गेल्या 20-25 वर्षांमध्ये जगामध्ये पुनर्संतुलन निर्माण झाले आहे. ही प्रक्रिया सोपी असणार नाही आणि त्यामुळे काही वाद आणि संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. पाश्चिमात्य आणि बिगर पाश्चिमात्य देशांमधील संबंध बदलत असून, हा बदल सोपा नसेल, असेही परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले. 

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पुढे म्हणाले, "पाकिस्तानच्या दौऱ्यावर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले, "मी त्यांना (नवाज शरीफ) भेटलो नाही. मी तिथे एससीओच्या बैठकीसाठी गेलो होतो... एससीओच्या अध्यक्षपदासाठी आम्ही पाकिस्तानला खूप पाठिंबा दिला... 'तिथे पोहोचलो, सगळ्यांना भेटलो, हस्तांदोलन केले, चांगली भेट घेतली आणि परत आलो...'

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरIndiaभारतCanadaकॅनडा