शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

भारत-कॅनडा वादावर जयशंकर यांनी मौन सोडले, उच्चायुक्तांना परत बोलवण्याचे कारण सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 21:06 IST

भारतने कॅनडातून आपले उच्चायुक्त परत बोलवण्यासारखा मोठा निर्णय का घेतला?

S. Jaishankar on Canada-India : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी भारत आणि कॅनडादरम्यान सुरू असलेल्या वादावर अखेर मौन सोडले. एका कार्यक्रमात बोलताना एस जयशंकर म्हणाले की, कॅनडानेभारतीय उच्चायुक्तांना पोलिस तपासासाठी विचारले होते. त्यामुळेच, भारताने आपले उच्चायुक्त परत बोलावण्याचा निर्णय घेतला.

कॅनडाचे उच्चायुक्त भारतात येतात आणि आपल्या लष्कर आणि पोलिसांची माहिती गोळा करतात, तेव्हा त्यांना कोणतीही अडचण नसते. पण, आपल्या उच्चायुक्तांवर निर्बंध लादले जातात, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

दोन्ही देशांमधील स्वातंत्र्य आणि परकीय हस्तक्षेप या दुहेरी धोरणांवरही जयशंकर यांनी टीका केली. ते म्हणाले, जेव्हा भारतीय पत्रकार सोशल मीडियावर टिप्पणी करतात, तेव्हा ते स्वातंत्र्याच्या श्रेणीत मानले जातात, परंतु जर कोणी म्हटले की कॅनडाचे उच्चायुक्त साऊथ ब्लॉकमधून रागाच्या भरात बाहेर पडले, तर तो परकीय हस्तक्षेप मानला जातो.

जागतिक व्यवस्था पाश्चात्य वर्चस्वापासून मुक्त होत असल्याचेही परराष्ट्रमंत्र्यांनी नमूद केले. ते म्हणाले, भारत आणि चीनसारख्या मोठ्या देशांच्या वाढत्या सहभागामुळे गेल्या 20-25 वर्षांमध्ये जगामध्ये पुनर्संतुलन निर्माण झाले आहे. ही प्रक्रिया सोपी असणार नाही आणि त्यामुळे काही वाद आणि संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. पाश्चिमात्य आणि बिगर पाश्चिमात्य देशांमधील संबंध बदलत असून, हा बदल सोपा नसेल, असेही परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले. 

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पुढे म्हणाले, "पाकिस्तानच्या दौऱ्यावर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले, "मी त्यांना (नवाज शरीफ) भेटलो नाही. मी तिथे एससीओच्या बैठकीसाठी गेलो होतो... एससीओच्या अध्यक्षपदासाठी आम्ही पाकिस्तानला खूप पाठिंबा दिला... 'तिथे पोहोचलो, सगळ्यांना भेटलो, हस्तांदोलन केले, चांगली भेट घेतली आणि परत आलो...'

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरIndiaभारतCanadaकॅनडा