शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

रशियाच्या S-400 क्षेपणास्त्राची पहिली खेप भारतात दाखल, कुठल्याही प्रकारचे हल्ले थांबवण्याची क्षमता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 13:08 IST

S-400 ची गणना जगातील सर्वात आधुनिक शस्त्रांमध्ये केली जाते. हे क्षेपणास्त्र शत्रूची लढाऊ विमाने, ड्रोन, मिसाईल आणि लपलेल्या विमानांवर मारा करण्यास सक्षम आहे.

नवी दिल्ली:भारतीय लष्कराची ताकत आता आणखी वाढणार आहे. रशियाने S-400 हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीची (S-400 Air Defence Missile System) पहिली खेप भारताकडे पाठवली आहे. कोणत्याही प्रकारच्या हवाई हल्ल्याला सामोरे जाण्यास सक्षम असलेले S-400 क्षेपणास्त्र पंजाब सेक्टरमध्ये तैनात करण्यात आले असून, तेथून चीन आणि पाकिस्तानच्या कोणत्याही हालचालींना प्रत्युत्तर दिले जाऊ शकते. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, क्षेपणास्त्र प्रणालीचे भाग हवाई आणि समुद्रमार्गे भारतात पोहोचले असून ते लवकरात लवकर नियुक्त केलेल्या ठिकाणी तैनात केले जातील. या वर्षाच्या अखेरीस भारताला क्षेपणास्त्र प्रणालीचा पहिला स्क्वाड्रनही मिळेल. त्यानंतर पूर्व आघाडींवर लक्ष केंद्रित केले जाईल.

शक्ती वाढणार

रशियाकडून मिळालेले क्षेपणास्त्र जमिनीवरून हवेत मारा करण्यास सक्षम आहे. यामुळे भारताची मारक क्षमता मजबूत होईल. S-400 मध्ये सुपरसॉनिक आणि हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे आहेत, जी लक्ष्यांवर मारा करण्यात पटाईत आहेत. S-400 ची गणना जगातील सर्वात आधुनिक शस्त्रांमध्ये केली जाते. हे क्षेपणास्त्र शत्रूची लढाऊ विमाने, ड्रोन, क्षेपणास्त्रे आणि लपलेल्या विमानांवरही मारा करण्यास सक्षम आहे. याच्या मदतीने रडारमध्ये न दिसलेली विमानेही खाली पाडता येतील.

3 सेकंदात 2 क्षेपणास्त्रे डागता येतात

S-400 चे प्रक्षेपक 3 सेकंदात 2 क्षेपणास्त्रे डागू शकते. यातून सोडलेली क्षेपणास्त्रे 5 किलोमीटर प्रति सेकंदाच्या वेगाने निघतात आणि 35 किलोमीटर उंचीपर्यंत मारा करू शकतात. हे क्षेपणास्त्र आल्यामुळे भारताच्या उत्तर, उत्तर-पूर्व आणि उत्तर-पश्चिम सीमेला सुरक्षा मिळेल. 

ऑक्टोबर 2019 मध्ये झाला करार

S-400 क्षेपणास्त्र प्रणालीसाठी भारताने ऑक्टोबर 2019 मध्ये रशियासोबत करार केला होता. या अंतर्गत 5.43 अब्ज डॉलर्स (सुमारे 40 हजार कोटी रुपये) पाच S-400 रेजिमेंट खरेदी केल्या जातील. या क्षेपणास्त्रामुळे भारताची ताकत मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

टॅग्स :russiaरशियाIndiaभारतDefenceसंरक्षण विभाग