शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

रशियाच्या S-400 क्षेपणास्त्राची पहिली खेप भारतात दाखल, कुठल्याही प्रकारचे हल्ले थांबवण्याची क्षमता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 13:08 IST

S-400 ची गणना जगातील सर्वात आधुनिक शस्त्रांमध्ये केली जाते. हे क्षेपणास्त्र शत्रूची लढाऊ विमाने, ड्रोन, मिसाईल आणि लपलेल्या विमानांवर मारा करण्यास सक्षम आहे.

नवी दिल्ली:भारतीय लष्कराची ताकत आता आणखी वाढणार आहे. रशियाने S-400 हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीची (S-400 Air Defence Missile System) पहिली खेप भारताकडे पाठवली आहे. कोणत्याही प्रकारच्या हवाई हल्ल्याला सामोरे जाण्यास सक्षम असलेले S-400 क्षेपणास्त्र पंजाब सेक्टरमध्ये तैनात करण्यात आले असून, तेथून चीन आणि पाकिस्तानच्या कोणत्याही हालचालींना प्रत्युत्तर दिले जाऊ शकते. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, क्षेपणास्त्र प्रणालीचे भाग हवाई आणि समुद्रमार्गे भारतात पोहोचले असून ते लवकरात लवकर नियुक्त केलेल्या ठिकाणी तैनात केले जातील. या वर्षाच्या अखेरीस भारताला क्षेपणास्त्र प्रणालीचा पहिला स्क्वाड्रनही मिळेल. त्यानंतर पूर्व आघाडींवर लक्ष केंद्रित केले जाईल.

शक्ती वाढणार

रशियाकडून मिळालेले क्षेपणास्त्र जमिनीवरून हवेत मारा करण्यास सक्षम आहे. यामुळे भारताची मारक क्षमता मजबूत होईल. S-400 मध्ये सुपरसॉनिक आणि हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे आहेत, जी लक्ष्यांवर मारा करण्यात पटाईत आहेत. S-400 ची गणना जगातील सर्वात आधुनिक शस्त्रांमध्ये केली जाते. हे क्षेपणास्त्र शत्रूची लढाऊ विमाने, ड्रोन, क्षेपणास्त्रे आणि लपलेल्या विमानांवरही मारा करण्यास सक्षम आहे. याच्या मदतीने रडारमध्ये न दिसलेली विमानेही खाली पाडता येतील.

3 सेकंदात 2 क्षेपणास्त्रे डागता येतात

S-400 चे प्रक्षेपक 3 सेकंदात 2 क्षेपणास्त्रे डागू शकते. यातून सोडलेली क्षेपणास्त्रे 5 किलोमीटर प्रति सेकंदाच्या वेगाने निघतात आणि 35 किलोमीटर उंचीपर्यंत मारा करू शकतात. हे क्षेपणास्त्र आल्यामुळे भारताच्या उत्तर, उत्तर-पूर्व आणि उत्तर-पश्चिम सीमेला सुरक्षा मिळेल. 

ऑक्टोबर 2019 मध्ये झाला करार

S-400 क्षेपणास्त्र प्रणालीसाठी भारताने ऑक्टोबर 2019 मध्ये रशियासोबत करार केला होता. या अंतर्गत 5.43 अब्ज डॉलर्स (सुमारे 40 हजार कोटी रुपये) पाच S-400 रेजिमेंट खरेदी केल्या जातील. या क्षेपणास्त्रामुळे भारताची ताकत मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

टॅग्स :russiaरशियाIndiaभारतDefenceसंरक्षण विभाग