शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
4
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
5
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
6
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
7
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
8
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
9
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
10
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या
11
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
12
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
13
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
14
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
15
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
16
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
17
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
18
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
19
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
20
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं

5 गोळ्या लागल्या पण 'तो' हिंमत नाही हारला; युक्रेनहून परतल्यावर सांगितली थरकाप उडवणारी गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 16:12 IST

Russia Ukraine War And Harjot Singh : हरजोत म्हणाला, पहिली गोळी लागली तेव्हा असं वाटलं की आता जीव जाईल. पण दुसरी गोळी लागल्यावर धीर आला आणि मनात ठरवलं की आता काहीही झालं तरी बाहेर पडायचंच.

नवी दिल्ली - युक्रेनमध्ये गोळी लागल्याने जखमी झालेला हरजोत (Harjot Singh) आता भारतात आल्यानंतर आपल्या घरी परतला आहे. हरजोत 7 मार्च रोजी युक्रेनमधून भारतात परतला, त्यानंतर त्याला लष्कराच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. आता तो उपचारानंतर  आपल्या घरी पोहोचला आहे. तब्बल 21 दिवसांनी त्याला आर्मी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. 27 फेब्रुवारीची घटना आठवल्य़ावर हरजोतल आजही भीती वाटते आणि संपूर्ण प्रसंग आठवून त्याच्या डोळ्यात पाणी येतं. हरजोतला दुसरं आयुष्य मिळाल्याबद्दल तो देवाचे आभार मानतो आणि त्याच वेळी तो भारत सरकारचंही आभार मानतो, ज्यामुळे तो आपल्या कुटुंबाकडे आपल्या देशात परतला आहे. हरजोतनं ही संपूर्ण घटना शेअर केली आहे. एबीपी न्यूजनं या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.

हरजोत म्हणाला, पहिली गोळी लागली तेव्हा असं वाटलं की आता जीव जाईल. पण दुसरी गोळी लागल्यावर धीर आला आणि मनात ठरवलं की आता काहीही झालं तरी बाहेर पडायचंच. हरजोत 7 मार्च रोजी भारतात आला मात्र तो आपल्या घरी गेला नव्हता आणि धौलकुआन येथील लष्करी हॉस्पिटलमध्ये पोहोचला. येथे त्याला 21 दिवस ठेवण्यात आलं आणि 28 मार्च रोजी त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. जेव्हा तो त्याच्या घरी पोहोचला तेव्हा कुटुंबामध्ये पोहोचल्यानंतर तो खूप आनंदी दिसत होता. 27 फेब्रुवारीच्या रात्री नेमकं काय घडलं ते सांगितलं आगेय  

हरजोतने दिलेल्या माहितीनुसार, तो कीव्हमध्ये होता आणि तेथे युद्ध सुरू झालं होतं. एक-दोन दिवसांपूर्वी तेथील मॉलसह सर्व काही बंद करण्यात आलं होतं. हरजोतला युक्रेन सोडणे जास्त योग्य वाटलं. हरजोत जेव्हा इतर लोकांप्रमाणे मेट्रो स्टेशनवर पोहोचला तेव्हा त्याला आत प्रवेश दिला गेला नाही. यानंतर त्यानं कशी तरी कॅबची व्यवस्था केली, जी 1000 डॉलर्समध्ये बुक केली होती. हरजोतसोबत इतर दोन लोकंही ही कॅब शेअर करत होते, जे वेगवेगळ्या देशातील होते. सर्वांना युद्धापासून बचाव करण्यासाठी युक्रेनमधून बाहेर पडायचं होतं.

हरजोतनं सांगितलं की, अंधार पडला होता. त्याच्या कॅबनं दोन चेकपोस्ट ओलांडले होते, पण त्याला तिसऱ्या चेकपोस्टच्या पुढे जाण्याची परवानगी नव्हती. त्याला परत जाण्यास सांगण्यात आले. त्यांना सांगण्यात आलं की, युद्ध सुरू झालं आहे. अंधारात जाणं योग्य होणार नाही. त्यामुळे सकाळ झाली की पुढे प्रवास करावा. हरजोत कॅबमध्ये असताना अचानक दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला. त्यानंतर हरजोत आणि कॅबमधील इतर खाली वाकले, पण दोन्ही बाजूंनी गोळ्या कारला लागल्या होत्या. पहिली गोळी त्याच्या उजव्या हाताला लागली, जी छातीच्या आत घुसली. 

हरजोत म्हणला की, गोळी लागताच खूप त्रास होऊ लागला. जे असह्य झाल. तो स्वत:चा बचाव करत राहिला, पण गोळ्यांचा वर्षाव सुरूच होता. शरीरातून रक्त वाहत होते आणि वेदना वाढत होत्या. हरजोतनं सुमारे अर्धा तास वेदना सहन करत मेल्याप्रमाणे स्वतःला ठेवलं. कदाचित रशियन सैनिक तेथून निघून जातील या आशेवर, पण तसं झालं नाही. गोळ्यांचा वर्षाव सुरूच होता. त्यानंतर हरजोतला वाटलं की असे मरण्यापेक्षा बाहेर पडणं चांगले आणि मग काय होईल ते बघता येईल. हरजोत गाडी आणि भिंतीच्या मध्ये होता. बाहेर येताच त्याच्या डाव्या पायाला गोळी लागली. गोळी लागल्यावर त्याच्या वेदना अधिक असह्य झाल्या. यानंतर आणखी 3 गोळ्या त्याच्या शरीरावर लागल्या. 

हरजोत बेशुद्ध पडला होता, त्याला काहीच आठवत नव्हते. तो बेशुद्ध होण्याआधी, त्याने एवढंच पाहिलं की त्याच्या आजूबाजूला जमिनीवर रक्त पडलेलं होतं. सुमारे 3 दिवसांनी हरजोत शुद्धीवर आला आणि तो एका खोलीत सापडला. आजूबाजूला दिवे लागले होते, मशीन्स बसवले होते. त्याला काहीच समजत नव्हतं. तेव्हा त्याला सांगण्यात आलं की, तो कीव्हच्या हॉस्पिटलमध्ये आहे, त्याला 5 गोळ्या लागल्या आहेत. त्याला असंही सांगण्यात आले की, या हॉस्पिटलमध्ये आणण्यापूर्वी त्याला इतर दोन हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं. मात्र त्याला 5 गोळ्या लागल्या होत्या, त्यामुळे त्याला मोठ्या हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं जेथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

हरजोतचा मोबाईल त्याच्याकडे होता त्यानंतर त्याने घरच्यांशी बोलला. हरजोत सांगतो की, जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा पहिला विचार त्याच्या कुटुंबाचाही आला. युक्रेनमधील भारतीय दूतावासाला फोन केला असता त्याला योग्य प्रतिसाद मिळाला नाही, असेही हरजोत सांगतात. त्याने 170 हून अधिक कॉल केले होते, मात्र जेव्हा त्याची माहिती भारतातील मीडियाद्वारे पोहोचली तेव्हा युक्रेनमधील भारतीय दूतावासानंही त्याची काळजी घेतली. हरजोत सांगतो की, त्याला रुग्णवाहिकेनं युक्रेन आणि पोलंडच्या सीमेवर आणलं होतं. तेथून पुन्हा दुसऱ्या रुग्णवाहिकेतून विमानात आणून नंतर विमानातून भारतात आणलं. यादरम्यान जनरल व्हीके सिंग यांनी त्यांची अनेकदा भेट घेतली. त्याला कुटुंबासारखे वातावरण देण्यात आले. त्यांनी त्यांना प्रोत्साहन दिलं आणि विमान भारतात पोहोचले तेव्हाही जनरल व्ही के सिंग त्याला भेटले. हरजोत भारत सरकारचे आभार मानले आहेत.  

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाIndiaभारत