शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
3
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
4
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
5
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
6
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
7
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
9
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
10
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
11
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
12
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
13
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
14
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
15
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
16
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
17
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
18
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
20
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा

Russia Ukraine War: रशिया-यूक्रेन युद्धात भारतच मध्यस्थी करू शकतो; रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 21:45 IST

दोन्ही देशांमधील युद्ध थांबवण्याचे आतापर्यंतचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत असं रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी म्हटलं आहे.

नवी दिल्ली – यूक्रेनवर हल्ला करण्यापूर्वी रशियानं विचारही केला नसेल की हे युद्ध जवळपास महिनाभर चालेल. बलाढ्य रशियानं यूक्रेनवर हल्ला केला. त्यानंतर काही दिवसांत यूक्रेन रशियाच्या ताब्यात येईल असं म्हटलं जात होतं. परंतु यूक्रेनच्या नागरिकांचा कडवट प्रतिकार आणि झेलेन्स्की यांचा विश्वास या बळावर यूक्रेननं रशियाला अद्याप थोपवून धरलं आहे. त्यामुळे रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचं गणित बिघडलं आहे. त्यात अमेरिकेसह नाटो देश प्रत्यक्षात या युद्धात उतरले नसले तरी त्यांनी यूक्रेनला पाठिंबा देत रशियावर आर्थिक निर्बंध लादले आहेत.

यूक्रेनवर हल्ला करण्याची मोठी किंमत रशियाला चुकवावी लागत आहे. निर्बंधामुळे रशियावर आर्थिक संकट येण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे आता रशिया यूक्रेनबाबत नरमाईची भूमिका घेत असल्याचं दिसून येत आहे. यूक्रेनसोबत युद्ध संपवण्यासाठी रशियानं भारतासारख्या मित्राचा पर्याय पुढे आणला आहे. भारताशिवाय अन्य कुणीही रशिया-यूक्रेन युद्धात तडजोड करू शकत नाही. त्यामुळे भारताने युद्धात समोरासमोर आलेल्या देशांमध्ये मध्यस्थीची भूमिका करावी असं रशियानं म्हटलं आहे.

या बदल्यात रशिया आपले भारतासोबतचे संबंध नव्या उंचीवर नेण्याच्या मनस्थितीत आहे. हा बदल विशेषतः व्यावसायिक क्षेत्रात होऊ शकतो. ऐतिहासिकदृष्ट्या दोन्ही देश आपापल्या चलनात व्यापाराला प्रोत्साहन देऊ शकतात (India Russia Trade) रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. युक्रेनसोबतच्या युद्धादरम्यान रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी ही भेट दिली. त्यांना भारताकडून खूप आशा आहेत हे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट होते. यामध्ये व्यवसायापासून युद्धातील सलोख्यापर्यंतच्या अपेक्षा असल्याचं समोर येते. मॉस्को आणि कीव्हमध्ये भारत मध्यस्थी करू शकतो असं रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

 

सर्गेई लावरोव यांचं म्हणणे महत्त्वाचं आहे कारण दोन्ही देशांमधील युद्ध थांबवण्याचे आतापर्यंतचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. त्यांनी भारत हा एक महत्त्वाचा देश आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये मध्यस्थाची भूमिका बजावू शकतो. या युद्धात भारत तटस्थ राहिला आहे. कोणत्याही टप्प्यावर त्यांनी रशियावर टीका करणे टाळले आहे. आजवर संयुक्त राष्ट्रात रशियाच्या विरोधात जे काही ठराव आले त्यातही भारताने सहभाग घेतलेला नाही. रशियाने भारताच्या भूमिकेचे कौतुक केले आहे. भारतावर अमेरिकेच्या दबावामुळे त्यांच्या परस्पर संबंधांवर परिणाम होणार असल्याचं रशियाने स्पष्टपणे नाकारले आहे. भारत आणि रशिया यांच्यातील संबंध अतूट असल्याचे लावरोव यांनी म्हटलं आहे. यावर कोणाचाही दबाव चालणार नाही. तसेच युक्रेनमध्ये युद्ध नसून स्पेशल ऑपरेशन असल्याचं रशियानं म्हटलं आहे.

टॅग्स :IndiaभारतRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया