शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात बुडालो'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
3
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
4
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
5
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
6
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
7
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
8
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
9
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
10
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
11
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
12
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
13
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
14
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
15
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना
16
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
17
Robert Kiyosaki Alert: 'लाखो लोक उद्ध्वस्त होतील, एक मोठा विनाश येणार...' ‘या’ दिग्गजाचा भयानक इशारा, सुटण्याचा मार्ग काय?
18
माजी क्रिकेट प्रशिक्षकाची हत्या, हल्लेखोरांनी पत्नी आणि सुनेसमोरच झाडल्या गोळ्या  
19
प्रियकरासमोरच गाडीतून खेचत नेलं, विमानतळाजवळ सामूहिक अत्याचार; पोलिसांकडून आरोपींचा एन्काऊंटर
20
मेट्रोत पुन्हा तांत्रिक बिघाड; प्रवाशांना गाडीतून उतरवले; कार्यालय सुटण्याच्या वेळीच गोंधळ

Russia Ukraine War: रशिया-यूक्रेन युद्धात भारतच मध्यस्थी करू शकतो; रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 21:45 IST

दोन्ही देशांमधील युद्ध थांबवण्याचे आतापर्यंतचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत असं रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी म्हटलं आहे.

नवी दिल्ली – यूक्रेनवर हल्ला करण्यापूर्वी रशियानं विचारही केला नसेल की हे युद्ध जवळपास महिनाभर चालेल. बलाढ्य रशियानं यूक्रेनवर हल्ला केला. त्यानंतर काही दिवसांत यूक्रेन रशियाच्या ताब्यात येईल असं म्हटलं जात होतं. परंतु यूक्रेनच्या नागरिकांचा कडवट प्रतिकार आणि झेलेन्स्की यांचा विश्वास या बळावर यूक्रेननं रशियाला अद्याप थोपवून धरलं आहे. त्यामुळे रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचं गणित बिघडलं आहे. त्यात अमेरिकेसह नाटो देश प्रत्यक्षात या युद्धात उतरले नसले तरी त्यांनी यूक्रेनला पाठिंबा देत रशियावर आर्थिक निर्बंध लादले आहेत.

यूक्रेनवर हल्ला करण्याची मोठी किंमत रशियाला चुकवावी लागत आहे. निर्बंधामुळे रशियावर आर्थिक संकट येण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे आता रशिया यूक्रेनबाबत नरमाईची भूमिका घेत असल्याचं दिसून येत आहे. यूक्रेनसोबत युद्ध संपवण्यासाठी रशियानं भारतासारख्या मित्राचा पर्याय पुढे आणला आहे. भारताशिवाय अन्य कुणीही रशिया-यूक्रेन युद्धात तडजोड करू शकत नाही. त्यामुळे भारताने युद्धात समोरासमोर आलेल्या देशांमध्ये मध्यस्थीची भूमिका करावी असं रशियानं म्हटलं आहे.

या बदल्यात रशिया आपले भारतासोबतचे संबंध नव्या उंचीवर नेण्याच्या मनस्थितीत आहे. हा बदल विशेषतः व्यावसायिक क्षेत्रात होऊ शकतो. ऐतिहासिकदृष्ट्या दोन्ही देश आपापल्या चलनात व्यापाराला प्रोत्साहन देऊ शकतात (India Russia Trade) रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. युक्रेनसोबतच्या युद्धादरम्यान रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी ही भेट दिली. त्यांना भारताकडून खूप आशा आहेत हे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट होते. यामध्ये व्यवसायापासून युद्धातील सलोख्यापर्यंतच्या अपेक्षा असल्याचं समोर येते. मॉस्को आणि कीव्हमध्ये भारत मध्यस्थी करू शकतो असं रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

 

सर्गेई लावरोव यांचं म्हणणे महत्त्वाचं आहे कारण दोन्ही देशांमधील युद्ध थांबवण्याचे आतापर्यंतचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. त्यांनी भारत हा एक महत्त्वाचा देश आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये मध्यस्थाची भूमिका बजावू शकतो. या युद्धात भारत तटस्थ राहिला आहे. कोणत्याही टप्प्यावर त्यांनी रशियावर टीका करणे टाळले आहे. आजवर संयुक्त राष्ट्रात रशियाच्या विरोधात जे काही ठराव आले त्यातही भारताने सहभाग घेतलेला नाही. रशियाने भारताच्या भूमिकेचे कौतुक केले आहे. भारतावर अमेरिकेच्या दबावामुळे त्यांच्या परस्पर संबंधांवर परिणाम होणार असल्याचं रशियाने स्पष्टपणे नाकारले आहे. भारत आणि रशिया यांच्यातील संबंध अतूट असल्याचे लावरोव यांनी म्हटलं आहे. यावर कोणाचाही दबाव चालणार नाही. तसेच युक्रेनमध्ये युद्ध नसून स्पेशल ऑपरेशन असल्याचं रशियानं म्हटलं आहे.

टॅग्स :IndiaभारतRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया