शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

Russia Ukraine War: भारताचे उपकार विसरणार कसे? जामनगरच्या महाराजांमुळे पोलंड आज करतोय भारतीय विद्यार्थ्यांना मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 15:31 IST

Digvijay Singh Jadeja Role in World War 2 Poland: दुसऱ्या महायुद्धात जर्मनीने सोव्हिएत संघाशी हातमिळवणी केली होती. 1939 मध्ये जर्मनीने पोलंडवर हल्ला केला, त्यानंतर १६ दिवसांतच रशियानेही हल्ला केला. यामुळे पोलंडवर दुहेरी संकट कोसळले होते. हजारो सैनिक मारले गेले होते.

युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना तातडीने युक्रेन सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. युक्रेनच्या आजुबाजुच्या चार देशांत या विद्यार्थ्यांना नेण्यात येत आहे. या देशांत पोलंड आघाडीवर आहे. जवळपास आठ दशकांपूर्वी भारतातील एका महाराजांनी पोलंडची पुढची पिढी सांभाळली होती. दुसऱ्या महायुद्धात पोलंडवर रशियाने आक्रमण केले होते. हजारो लोक मारले गेले होते. तेव्हाच्या उपकारांची परतफेड पोलंड आज करत आहे. 

तेव्हाच्या नवानगर आणि आताच्या जामनगरचे राजा दिग्विजय सिंहजी जडेजा यांनी पोलंडमध्ये युद्धात अनाथ झालेल्या हजारावर मुलांना पालकत्व दिले होते. त्यांना ब्रिटिशांच्या मदतीने त्यांनी या मुलांना भर युद्धात जामनगरला आणले होते. त्यांना लहानाचे मोठे केले. यासाठी एकही रुपया त्यांनी पोलंड सरकारकडून घेतले नाहीत. पोलंडहून एक फुटबॉल प्रशिक्षक पाठविण्यात आला होता. तसेच त्यांची पोलंडशी नाळ तुटू नये म्हणून पोलिश पुस्तकांची लायब्ररी उघडली होती. 

दिग्विजय सिंहजी जडेजा यांचे जेव्हा निधन झाले तेव्हा पोलंडच्या सरकारने त्यांना मरणोत्तर सर्वोच्च नागरिक सम्मान कमांडर्स क्रॉस ऑफ दि ऑर्डर ऑफ मेरिट प्रदान करण्यात आला. एवढेच नाही तर पोलंडमध्ये उद्यान, रस्ते, शाळांनाही महाराजांचे नाव देण्यात आले आहे. 

काय घडलेले तेव्हा...दुसऱ्या महायुद्धात जर्मनीने सोव्हिएत संघाशी हातमिळवणी केली होती. 1939 मध्ये जर्मनीने पोलंडवर हल्ला केला, त्यानंतर १६ दिवसांतच रशियानेही हल्ला केला. यामुळे पोलंडवर दुहेरी संकट कोसळले होते. हजारो सैनिक मारले गेले होते. हजारो मुले अनाथ झाली होती. या मुलांना सैनिकी कॅम्पमध्ये ठेवण्यात आले होते. परंतू दोन वर्षांनी रशियाने हे कॅम्प रिकामे करण्याचे आदेश दिले. तेव्हा या मुलांना कुठे हलवावे, या विषयावर ब्रिटनमध्ये वॉर कैबिनेटची बैठक झाली. या बैठकीला महाराजा उपस्थित होते. युरोप दुसऱ्या महायुद्धात पेटलेला. मुलांना बाहेर पाठवावे लागणार होते. तेव्हा राजांनी कोणताही विचार न करता तयारी दाखविली. ब्रिटिश सरकारनेही मान्यता दिली आणि त्यासाठी तयारी सुरु करण्यास सांगितले.  सुरुवातीला १८० मुले जामनगरला आणण्यात आली. महाराजांनी बालाचाड़ी हे गाव या मुलांसाठी दिले. 

तेव्हा महाराजा दिग्विजय सिंहांनी पोलंड सरकारला एक शब्द दिला होता. तुमची मुले माझी संपत्ती आहे. तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा त्यांना तुम्ही मायदेशी घेऊन जाऊ शकता. 1945 ला महायुद्ध संपल्यावर पोलंड सोव्हिएत संघात विलिन झाले. तेव्हा पोलंडच्या सरकारने मुलांना मायदेशी नेली. 1966 ला महाराजांचे निधन झाले. सोव्हिएतपासून पोलंड 1989 ला स्वतंत्र झाले. महाराजांच्या उपकारांना ४३ वर्षे उलटून गेली होती. पोलंड हे उपकार विसरले नव्हते. त्यांनी चौक, शाळा आणि उद्यानाला महाराजांचे नाव दिले. ही मुले त्यांच्या वृद्धापकाळात २०१३ मध्ये जामनगरला आली होती. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशिया