शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Russia-Ukraine War: मोदींच्या सांगण्यावरुन रशियाने युद्ध थांबवले होते का? अधिकारी हसत हसत उत्तरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 23:12 IST

रशियाने 6 तास युद्ध थांबवल्याचे वृत्त निराधार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. 

नवी दिल्ली - रशिया आणि युक्रेनमध्ये पेटलेल्या युद्धाला आता आठवडा उलटला आहे. यादरम्यान, भारत सरकारने युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना माघारी आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी हवाई दलाचीही मदत घेतली जात आहे. दरम्यान भारत सरकारने रशियासोबत एक महत्त्वपूर्ण करार केला आहे. खारकिव्हमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी रशियाने सहा तास युद्ध थांबवण्याची तयारी दर्शवल्याचे वृत्त माध्यमांत झळकले होते. मात्र, हे वृत्त निराधार असल्याचे पराराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. 

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय लोकांना खारकीव्ह येथून बाहेर काढत युक्रेनशेजारील देशांच्या सीमेपर्यंत पोहोचवण्यासाठी हे युद्ध 6 तास थांबविण्यात आल्याचे वृत्त होते. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्लादीमीर पुतीन यांची चर्चा झाल्याचेही या वृत्तात म्हटले होते. मात्र, रशियाने 6 तास युद्ध थांबवल्याचे वृत्त निराधार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. 

''आम्हालाही काही मीडिया रिपोर्ट्समधून हे वृत्त समोर आले. मात्र, ते निराधार आहे. आपल्या सांगण्यावरुन युद्ध थांबवले असे म्हटले तर, पुन्हा आपल्याच सांगण्यावरुन बॉम्बहल्ले सुरू केले, असेच म्हणावे लागेल. मात्र, याबाबत मी अधिक टिपण्णी करू इच्छित नाही,'' असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले. भारत सरकारकडून खारकीव्ह आणि सूमी येथून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी आम्ही युक्रेन आणि रशियन अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. आमच्या अंदाजानुसार आपल्या कसोशीच्या प्रयत्नानंतरही अद्याप 100 भारतीय कारकीव्हमध्ये आहेत, असेही परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. 

काय होते युद्ध थांबवल्याचे निराधार व्हायरल वृत्त

युक्रेनच्या खारकीव्ह शहरामध्ये अद्यापही शेकडो विद्यार्थी अडकलेले आहेत, अशी माहिती मिळत आहे. भारतीयांना तिथून बाहेर पडू दिले जात नाही आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी रात्री रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी चर्चा केली होती. त्यावेळी मोदींनी युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी पुतीन यांनी या विद्यार्थ्यांना बाहेर आणण्यासाठी रशिया भारताला मदत करेल, असे सांगितले होते. दरम्यान, खारकिव्हमध्ये युक्रेनच्या सैन्याकडून भारतीय विद्यार्थ्यांचा वापर मानवी ढालीसारखा केला जात असल्याचा दावा केला जात आहे.

व्लादिमीर पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगितले की, भारतीय विद्यार्थ्यांना युद्धक्षेत्रातून सुखरुप बाहेर काढण्यासाठी सर्व आवश्यक आदेश देण्यात आले आहेत. रशियन सैन्य याबाबत सर्वतोपरी प्रयत्न करेल. त्यांनी सांगितले की, रशियन सैन्याकडून खारकिव्हपासून रशियापर्यंत एक सुरक्षित कॉरिडॉर तयार करण्यात येण्याबाबत संकेत दिले होते. त्याच्याच पुढच्या दिवशी रशिया सहा तास युद्ध थांबवण्यासही तयार झाला आहे. दरम्यान, भारतीय दूतावासाने बुधवारी विद्यार्थ्यांसह सर्व नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टीने खारकिव्ह सोडण्याची सूचना दिली होती. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाStudentविद्यार्थीrussiaरशियाwarयुद्ध