शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
4
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
5
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
6
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
7
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
8
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
9
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
10
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
11
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
12
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
13
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
14
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
15
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
16
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
17
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
18
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
19
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

रशिया-युक्रेन, इस्रायल-इराण, क्वाड अन् ब्रिक्स; भारताचे सर्वांशी सलोख्याचे संबंध- एस जयशंकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 21:41 IST

भारताच्या परराष्ट्र धोरणाबाबत केंद्रीय मंत्री एस जयशंकर यांनी महत्वाची माहिती दिली.

S. Jainshankar : सध्या जगभरात अस्थिरतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. काही देशांमद्ये थेट युद्ध सुरू आहे, तर काही देशांमध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा कठीण काळात भारताने सर्व देशांशी चांगले संबंध ठेवून, स्वतःला मजबूत स्थितीत ठेवले आहे. दरम्यान, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी भारताची डिप्लोमसी आणि इतर देशांशी असलेल्या संबंधांवर महत्वाची प्रतिक्रिया दिली.

बिझनेस टुडेचा एका कार्यक्रमात बोलताना जयशंकर यांनी भारताची आर्थिक धोरणे आणि जगाचा बदलता मूड, व्यवसाय, राजकीय परिस्थिती आणि आव्हानांवर स्पष्टपणे भाष्य केले. ते म्हणाले की, सध्याच्या भू-राजकीय गोंधळाच्या काळात भारत अशा काही देशांपैकी एक आहे, जो युक्रेन आणि रशिया, तसेच इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांशी संवाद साधू शकतो. 'सबका साथ, सबका विकास' हा मंत्र परराष्ट्र धोरणालाही लागू होतो. आजच्या ध्रुवीकरणाच्या युगात रशिया आणि युक्रेन, इस्रायल आणि इराण, क्वाड आणि ब्रिक्स या देशांशी जोडले जाऊ शकणाऱ्या काही देशांपैकी भारत आहे.

सबका साथ, सबका विकास...जयशंकर पुढे म्हणतात, 'सबका साथ, सबका विकास' ही घोषणा परराष्ट्र धोरणातही लागू होते. पाश्चात्य आणि युरोपीय देशांप्रमाणे भारताने युक्रेन-रशिया युद्धात कोणत्याही बाजूचे समर्थन केले नाही आणि नेहमीच शांततेचा पुरस्कार केला आहे. भारताची भूमिका नेहमीच शांततेसाठी आहे. 2023 मध्ये इस्रायलवर हमासच्या अचानक हल्ल्यामुळे निर्माण झालेल्या मध्यपूर्वेतील संघर्षांदरम्यान भारताने इराण आणि इस्रायलशी आपल्या धोरणात्मक संबंधांमध्ये संतुलन राखले. इस्त्राईल भारताला एक प्रमुख संरक्षण पुरवठादार म्हणून उदयास आला आहे, तर इराणकडून कच्चे तेल भारताच्या गरजा पूर्ण करते.

जगाची राजकीय परिस्थिती समजून घेणे महत्त्वाचे आपले म्हणणे पुढे नेत जयशंकर म्हणतात, आजच्या काळात जगातील राजकीय परिस्थिती समजून घेणे पूर्वीपेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. यामुळे संधी आणि आव्हाने, दोन्ही येतात. आपण इथे व्यवसायाबद्दल बोलत असू, पण प्रत्यक्षात ही गोष्ट रोजगार निर्माण करण्याची आणि देशाला पुढे नेण्याची आहे. जेव्हा व्यवसाय यशस्वी होतात, मग ते देशात असो किंवा परदेशात, आपल्याकडे 'विकसित भारत'चे स्वप्न साकार करण्यासाठी आवश्यक असलेली ताकद, तंत्रज्ञान आणि संधी उपलब्ध होते.

गेल्या काही वर्षांत जागतिक अर्थव्यवस्थेने अनेक वादळे पाहिली आहेत. कोविडने पुरवठा साखळीवर परिणाम पाडला, युक्रेनच्या संकटामुळे अन्नपदार्थ, इंधन आणि खतांबद्दल चिंता वाढली. ऑक्टोबर 2023 पासून पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या गोंधळामुळे सागरी व्यापार ठप्प झाला असून, आशिया-युरोप व्यापारावर परिणाम झाला आहे. हवामान आणि राजकीय तणावाने डिजिटल आणि तंत्रज्ञान जगालाही हादरवून सोडले.

'हील इन इंडिया'ची वेळ टेक आणि सेवांनी परिपूर्ण भविष्यासाठी आपल्याला आपल्या तरुणांना जगासाठी योग्य बनवायचे आहे. अनेक देशांमध्ये कामाची गरज आणि लोकसंख्या यांच्यातील समन्वय बिघडला आहे. भारताने याला संधीत रूपांतरित केले आणि मोबिलिटी भागीदारीद्वारे आपली प्रतिभा जगासमोर नेली. आपल्या लोकांच्या सुरक्षित प्रवासासाठी सर्व मदतीची व्यवस्था करण्यात आली. आता पर्यटन हा केवळ प्रवासाचा विषय राहिला नसून ते अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे साधन बनले आहे. 'हील इन इंडिया'ची वेळ आली आहे आणि ही आपच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरIndiaभारतRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाIranइराणIsraelइस्रायल