शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Russia-Ukraine Crisis : रशिया-युक्रेन संघर्षात भारताच्या भूमिकेवर रशिया खूश; कौतुक करत म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 08:01 IST

युक्रेन-रशिया तणावाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत बोलताना भारताने सर्व पक्षांना संयम बाळगण्याचे आवाहन केले होते.

युक्रेन संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत घेतलेल्या स्वतंत्र भूमिकेचे रशियाने स्वागत केले आहे. नवी दिल्ली येथे बुधवारी पत्रकारांशी बोलताना रशियन मिशनचे उपप्रमुख रोमन बाबूश्किन म्हणाले, भारत एक जबाबदार जागतिक शक्ती म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. तसेच, भारताने जागतिक घडामोडींमध्ये “मुक्त आणि संतुलित” दृष्टिकोन स्वीकारला आहे, जो प्रशंसनीय आहे.

युक्रेन-रशिया तणावाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत बोलताना भारताने सर्व पक्षांना संयम बाळगण्याचे आवाहन केले होते. भारताने वैध सुरक्षा हित लक्षात घेत तणाव कमी करण्यासंदर्भात सर्व देशांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले होते. भारताच्या या स्वतंत्र आणि पारदर्शक भूमिकेचे रशियाने बुधवारी कौतुक केले.

भारत आणि रशिया यांच्यात अतूट विश्वास -बाबुश्किन म्हणाले, रशिया आणि भारत यांच्यातील संबंध मजबूत आणि भक्कम पायावर आधारलेले आहेत आणि दोन्ही देशांमध्ये अतूट विश्वास आहे. भारत-रशिया संबंध असेच टिकून राहतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. तसेच, आमचे सहकार्य कुणासाठीही धोक्याचे नाही आणि याच वेळी आम्ही न्याय आणि समानतेवर आधारित बहुध्रुवीय जगाची स्थापना करण्यासाठी खांद्याला खांदा लावून चालत आहोत, असेही बाबुश्किन म्हणाले.

युक्रेन संकटासंदर्भात बोलताना रशियन डिप्लोमॅट म्हणाले, पाश्चात्य शक्ती या प्रदेशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि रशियावरील पाश्चात्य निर्बंधांमुळे जागतिक अर्थव्यवस्थेत अस्थिरता निर्माण होईल. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाIndiaभारतunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ