शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
3
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
4
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
5
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
6
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
7
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
8
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
9
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
10
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
11
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
12
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
13
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
14
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
15
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
16
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
17
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
18
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
19
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
20
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...

तेलंगाणा काँग्रेसमध्ये बंडाचे वारे, १० आमदारांची गुप्त बैठक, सरकार संकटात? CM रेवंत रेड्डी अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 14:18 IST

Telangana Congress News: काँग्रेसची स्वबळावर सत्ता असलेल्या तेलंगाणामध्ये पक्षात अंतर्गत धुसफूस सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. पक्षाच्या १० आमदारांनी बंद खोलीमध्ये बैठक घेतली आहे. त्यामुळे पक्षनेतृत्वासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे.

काँग्रेसची स्वबळावर सत्ता असलेल्या तेलंगाणामध्ये पक्षात अंतर्गत धुसफूस सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. पक्षाच्या १० आमदारांनी बंद खोलीमध्ये बैठक घेतली आहे. त्यामुळे पक्षनेतृत्वासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. तसे पक्षातील आमदारांमध्ये वाढत असलेला असंतोष शमवण्यासाठी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हे सरकारमधील सर्व मंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. दरम्यान, पक्षातील काही आमदार हे मंत्री पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी यांच्याबाबत नाराज असल्याचे सांगितले जात आहे.

या पार्श्वभूमीवर मंत्री पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी यांनी मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीत सहभाग घेण्यासाठी आपला दौरा रद्द केला आहे. मुख्यमंत्री रेड्डी यांनी अधिकाऱ्यांना या बैठकीत सहभागी न होण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पक्षामधील असंतोष अधिकच गंभीर पातळीवर पोहोचल्याचं बोललं जात आहे. या नाराजीमुळे आगामी विधान परिषद निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जनतेमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो, अशी चिंता पक्ष नेतृत्वाला लागली आहे.

तेलंगाणामधील काँग्रेसच्या १० आमदारांनी आमदार अनिरुद्ध रेड्डी यांच्या फार्महाऊसमध्ये गुप्त बैठक घेतली. त्यामुळे पक्षामध्ये अंतर्गत मतभेद असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या बैठकीत सहभागी झालेल्या आमदारांमध्ये नैनी राजेंदर रेड्डी, भूपती रेड्डी, येनम श्रीनिवास रेड्डी, मुरली नाईक, कुचुकुल्ला राजेश रेड्डी, संजीव रेड्डी, अनिरुद्ध रेड्डी, लक्ष्मीकांत, दोंती माधव रेड्डी आणि बीरला इलैय्या यांचा समावेश होता. काँग्रेसच्या काही आमदारांनी गुप्त बैठकीनंतर अंतकलहाच्या चर्चा लपवण्याचा प्रयत्न करताना नागरकर्नूलचे खासदार मल्लू रवी यांनी सांगितले की, ही केवळ डिनर मिटिंग होती. विरोधी पक्षांनी विनाकारण हे प्रकरण वाढवण्याचा प्रयत्न केला, असा दावाही त्यांनी केला.

नवी दिल्लीमध्ये प्रसासमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, काँग्रेसच्या आमदारांची ही बैठक कुठल्याही फार्म हाऊसमध्ये नाही तर आयटीसी कोहिनूरमध्ये झाली होती. तसेच या बैठकीत १० आमदार सहभागी होणार होते. मात्र प्रत्यक्षात केवळ ८ जणच सहभागी झाले.  काँग्रेसचे खासदार मल्लू रवी यांनी सांगितले की, मी सर्व आमदारांसोबत वैयक्तिकरीत्या चर्चा केली आहे. तसेच पक्षामध्ये कुठलेही बंड होण्याची शक्यता नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :congressकाँग्रेसTelanganaतेलंगणाMLAआमदार