शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

राज ठाकरेंच्या भाषणाचा उत्तर प्रदेशात इफेक्ट; भोंग्याबाबत योगी सरकारनं जारी केली नियमावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 14:05 IST

पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी मंदिर, मशिदी यांचा आढावा घेतला. त्यानंतर आता लाऊडस्पीकरच्या वापराबाबत नियमावली जारी करत कुठल्याही परिस्थितीत त्याचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत

नोएडा – मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी गुढी पाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंग्याबाबत आक्रमक भूमिका घेत ३ मे पर्यंत भोंगे हटवण्याचा इशारा दिला होता. राज ठाकरेंच्या या भाषणामुळे महाराष्ट्रासह देशभरात या मुद्द्याला पुन्हा वाचा फुटली. गोवा, कर्नाटक, उत्तर प्रदेशात राज ठाकरेंच्या भाषणानंतर मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी विविध हिंदू संघटना पुढे आल्या. मात्र आता उत्तर प्रदेशात लाऊडस्पीकरच्या मुद्द्यावरून योगी सरकारनं नवी नियमावली जारी केली आहे.

मुख्यमंत्री योगी यांच्या आदेशानंतर नोएडात ६०२ मंदिरे आणि २६५ मशिदींना पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी मंदिर, मशिदी यांचा आढावा घेतला. त्यानंतर आता लाऊडस्पीकरच्या वापराबाबत नियमावली जारी करत कुठल्याही परिस्थितीत त्याचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलिसांनी आतापर्यंत ६२१ मंदिरांपैकी ६०२ मंदिरे, २६८ मशिदींपैकी २६५ मशिदी आणि १६ अन्य धार्मिक स्थळांच्या धर्मगुरू आणि कमिटीला नोटीस जारी केली आहे. हायकोर्टाने दिलेल्या ध्वनी प्रदुषणच्या रोखण्याच्या नियमांचे पालन करावं असं बजावण्यात आले आहे. आवाजाची मर्यादा ओलांडली तर त्यांच्यावर कारवाई होईल असंही पोलिसांनी सांगितले आहे.

त्याचसोबत नोएडा येथे आता धार्मिक जुलूस किंवा शोभायात्रा काढण्यासाठी सुरुवातीला प्रतिज्ञापत्र सादर करावे लागेल. ज्यात कार्यक्रमात कुठल्याही प्रकारे भडकाऊ भाषण आणि प्रदर्शन होणार नाही. अथवा जर असे झाले तर दोषींवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी असं लिहिलं आहे. लाऊडस्पीकरवरून उत्तर प्रदेशातही वातावरण पेटलं आहे. त्यामुळे या प्रकरणात योगी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. योगी सरकारनं नियमावली जारी करत लाऊडस्पीकरच्या वापराबाबत लोकांना मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यास सांगितले आहे.

उत्तर प्रदेश सरकारची नियमावली

माइक, साऊंड सिस्टमचा वापर केला जावा परंतु याचा आवाज धार्मिक परिसराच्या बाहेर जाणार नाही याची काळजी घ्यावी

आवाजाचा कुठलाही त्रास अन्य लोकांना होता कामा नये.

नवीन स्थळांवर लाऊडस्पीकर लावण्यासाठी परवानगी घ्यावी.

कुठल्याही परवानगीशिवाय शोभायात्रा किंवा जुलूस काढू नये, परवानगी देण्यापूर्वी शांतता आणि सलोखा राखला जाईल यासाठी प्रतिज्ञापत्र सादर करावं लागेल.

जे पारंपारिक सण, उत्सव आहेत किंवा धार्मिक यात्रा आहेत तेव्हाच परवानगी दिली जाईल. अनावश्यक कारणासाठी परवानगी दिली जाणार नाही.

मुस्लीम धर्मगुरूंनीही योगी सरकारच्या निर्णयाचं स्वागत केले आहे. रामनवमी आणि हनुमान जयंती यावेळी घडलेल्या हिंसाचारानंतर योगी सरकारनं आगामी उत्सावात कुठलीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी काळजी घेत आहे. कायदा सुव्यवस्था पाळण्यासाठी योगी सरकारनं व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक घेतली. त्यावेळी या नियमावलीचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथ